विशेष लेख

जागतिक दिव्यांग दिन विशेष : अंधारामध्ये आपण मिळून आणू प्रकाश : “सप्तर्षी फाउंडेशन”
विशेष लेख

जागतिक दिव्यांग दिन विशेष : अंधारामध्ये आपण मिळून आणू प्रकाश : “सप्तर्षी फाउंडेशन”

✪ इंटीग्रेटेड वन स्टॉप सोल्युशन ✪ बौद्धिक अक्षम मुलाकडून मिळालेली प्रेरणा ✪ बेवारसांचे वारस आम्ही ✪ जोडीने जाऊ पुढे ✪ संवेदनशीलतेची क्षमता ✪ आमच्यासाठी आम्ही एक दिवसही काढला नव्हता ✪ एक दिवस संस्थेचीही गरज उरू नये ३ डिसेंबर म्हणजे जागतिक दिव्यांग दिवस. दिव्यांग ही तशी खूप व्यापक संकल्पना आहे. त्यामध्ये २१ प्रकारच्या दिव्यांग किंवा विविध प्रकारे विकलांग (differently abled) व्यक्तींचा समावेश होतो. त्यात अंध, मूकबधिर, शरीराने अधू असे शारीरिक दिव्यांग आणि बौद्धिक अक्षम असलेले, स्वमग्नता (ऑटीझम), सेरेब्रेल पाल्सी, डाऊन्स सिंड्रोम, अध्ययन अक्षमता असलेले (Learning disabilities), बहुविकलांग अशा बौद्धिक दिव्यांगांचा व इतरही प्रकारांचा समावेश होतो. आजचा दिवस ह्या सर्वांचे कष्ट आठवण्याचा, त्यांच्याबद्दल संवेदना जागी करण्याचा व ह्यांच्या भल्यासाठी काम करणा-या संस्था व व्यक्ती...
महात्मा गांधी समज गैरसमज 
विशेष लेख

महात्मा गांधी समज गैरसमज

संकेत मुनोत विवेचनातील मुद्दे जागतिक प्रभाव स्वातंत्र्य फक्त गांधींमुळे मिळालं का? गांधीजी -जात आणि धर्म भगतसिंग आणि क्रांतिकारकांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न गांधींना महापुरुषाबद्दल आदर देशाच्या फाळणीला गांधींचा विरोध गांधीहत्येचे कारण पाकिस्तानला पैसे देण्यासाठी आंदोलन नव्हते गांधींचे आध्यात्म नेहरू की पटेल पंतप्रधान स्त्रियांचे सक्षमीकरण मुस्लिमांवरील प्रभाव आज गांधी जयंती ज्या माणसाला लहाणपणी मी टकल्या, म्हातार्या, मजबूरी वगैरे काय काय म्हणायचो त्याच्याविषयी थोडेसे. प्रेयसीवर अँसिड फेकणाऱ्या तरुणाला जर प्रेमवीर म्हणायचं असेल तर गांधीजीचा खुन करणाऱ्या नथुरामलाही देशभक्त म्हणता येईल. सध्या सोशल मीडियावर नथुराम आणि गांधी हत्त्या या संदर्भात विपर्यस्त मजकूर नथुरामभक्त मोठ्या प्रमाणात पोस्ट करीत असून त्याद्वारे राष्ट्र...
PM VISHWAKARMA YOJANA : एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसे मिळवायचे? जाणून घ्या
विशेष लेख

PM VISHWAKARMA YOJANA : एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसे मिळवायचे? जाणून घ्या

लोकमराठी न्यूज नेटवर्क : विश्वकर्मा योजनेला १७ सप्टेंबर सुरुवात झाली आहे. पारंपारिक कौशल्य असलेल्या लोकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने १६ ऑगस्ट २०२३ रोजी मंजुरी दिली असून योजनेसाठी १३,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही योजना २०२३-२०२४ ते या पाच वर्षांसाठी असेल. या योजनेचा उद्देश काय आहे? या योजनेसंबंधी असं म्हटलं जातंय की, गुरु-शिष्य परंपरेला चालना देणे आणि कारागिरांच्या कौटुंबिक-आधारित पारंपारिक व्यवसायाला बळ मिळेल हा यामागचा उद्देश आहे. शिवाय कारागिरांची उत्पादने आणि सेवांची गुणवत्ता सुधारणे. तसेच या कारागिरांना देशांतर्गत आणि जागतिक विक्री साखळीशी जोडणे ही या योजनेची इतर उद्दिष्टे आहेत. या योजनेअंतर्गत लोकांना काय मिळणार? पंतप्रधान विश्वकर्मा योजनेंतर्गत कारागीर आणि हस्तकला कामगारांना विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र मिळेल...
Horoscope Today 11 September 2023 : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम
विशेष लेख

Horoscope Today 11 September 2023 : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम

मेष : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल. वृषभ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल. मिथुन : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. कर्क: मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल. वृश्चिक : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. धनू : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल. मकर: आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. मीन : काहींचे ...
गॅस सिलेंडर विसरा ! बायोगॅससाठी शासन देते पैसे
विशेष लेख

गॅस सिलेंडर विसरा ! बायोगॅससाठी शासन देते पैसे

संग्रहित छायाचित्र केंद्र शासनाच्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत समाविष्ट योजना केंद्र शासनाच्या नविन व नविकरणीय ऊर्जा मंत्रालया ( MNRE) मार्फत राबविली जाते. 100 % केंद्र पुरस्कृत योजना उभारणीनंतर 5 वर्ष देखभाल दुरस्तीची जबाबदारी संबंधीतयंत्रणेची लाभार्थी यादी जिल्हा संकेतस्थळावर उपलब्ध उद्देश : ग्रामीण भागात बायोगॅस (Biogas) संयंत्रांच्या उभारणीतून स्वयंपाकासाठी इंधन व सेंद्रीय खत पुरविणे ग्रामीण भागातील स्त्रियांचे जीवनमान सुधारण्यासाठी बायोगॅस संयंत्रांस शौचालय जोडणीतून सर्वसाधारण स्वच्छता तसेच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी केंद्र शासनाने राज्यासाठी निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या अनुषंगाने शासन स्तरावरुन जिल्हानिहाय उद्दिष्टाचे वाटप अनुदान वितरण : सर्वसाधारण गटासाठी - रू. 9,000/- प्रति संयत्र अनुसूचित जाती व जमाती - रु. 11,000/- प्रति संयत्र शौचालय ज...
सुशिक्षित की फक्त शिक्षित? – जेट जगदीश
विशेष लेख

सुशिक्षित की फक्त शिक्षित? – जेट जगदीश

आज साक्षरतेचे प्रमाण वाढलेले आहे असं म्हणतात. आपल्या लक्षात येईल की, आपण साक्षर जरूर आहोत; पण अडाणी सुशिक्षित आहोत. वैज्ञानिक दृष्टीकोणाच्या अभावामुळे भाज्याफळे धुतल्यानंतरचे आणि स्वयंपाक घरातील भांडी विसळलेले पाणी पिण्यायोग्य नसले तरी झाडांना पोषक असते; ह्याची जाण नसल्यामुळे असे पाणी झाडांना देणे म्हणजे झाडांना निसत्व करणे आहे असे समजले जाते. ते पाणी डास वाढीस कारणीभूत ठरते, या समजापोटी सोसायटीतील शिक्षित मंडळी सोसायटीच्या आवारातील झाडांना ते पाणी घालण्यास विरोध करतात. विद्युत निर्मितीसाठी पाण्याची गतिज ऊर्जा वापरून टरबाईन फिरवले जातात आणि नंतर जे पाणी बाहेर पडते त्या पाण्यातील ऊर्जा काढून घेतल्यामुळे ते उर्जाहीन पाणी शेतीला देणे किंवा झाडाला देणे उपयोगाचे नाही, असे समजणे जेवढे हास्यास्पद तेवढेच सोसायटीमधील झाडांना भांडी विसळल्यानंतरचे, तांदूळ वा भाज्याफळे धुतल्यानंतरचे पाणी...
नियोजनबद्ध, सहकारीवृर्त्ती मुर्तीची अनोखी भेट
विशेष लेख

नियोजनबद्ध, सहकारीवृर्त्ती मुर्तीची अनोखी भेट

प्रा. डॉ. किरण मोहिते २००० - ०१ साली स्वामी सदानंद भारती शिक्षण शास्त्र महाविद्यालय श्रीरामपूर येथे BEd ला ऍडमिशन घेतलंल. या महाविद्यालयाच्या वर्गमित्रांनी ६ नोव्हेंबर २०२२ राजी गेट टुगेदर घेण्याच ठरवलं. त्या दिवशी रविवार होता. तब्बल वीस वर्षांनंतर BEd कॉलेजची मित्र भेटणार, गुरुवर्य भेटणार, या उत्सुकतेपोटी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून माझी निवड झाली. नियोजन केले. आठ दिवस अगोदर सरांना फोन केला. “ सर! तुम्हीं आमच्या घरी यायचं! आपण येथूनच दुसऱ्या दिवशी सकाळी गाडीने श्रीरामपूरला जाऊ " सर म्हणाले. “ घरी चर्चा करतों अन् सांगतो.” सर आपल्या घरी येणार या आशेने घरी सर्व काही नियोजन केलं. दुसऱ्या दिवशी परत सरांना फोन केला. सरांनी लगेच होकार दिला. मला म्हणाले “ मोहिते मी तुझ्या घरी मुक्कामी येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण श्रीरामपूरला जाऊ ”. ते “मोहिते” या आडनावाने मला हाक ...
राहुल गांधींचे काय चुकले? –जेट जगदीश
विशेष लेख

राहुल गांधींचे काय चुकले? –जेट जगदीश

राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेवरून वाद निर्माण करून महाराष्ट्रात भाजपेईंनी मोठ्या प्रमाणात राहुल गांधींना 'जोडे मारो' (Bharat Jodo Yatra) कार्यक्रमही राबवला. या कार्यक्रमासंबंधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात आंदोलनकर्तीने राहुल गांधींना (Rahul Gandhi) जोडे मारण्याच्या ऐवजी सावरकरांवरच जोडे मारण्यासाठी हात उगारला होता असे हास्यास्पद चित्र दिसले. बरे तर बरे, बाकीच्या कार्यकर्त्यांनी तिला ताबडतोब अडवले म्हणून. नाहीतर बिचाऱ्या सावरकरांची काही धडगत नव्हती. त्यांनाच चपलांचा मार बसला असता. याचा अर्थ भाजपने सावरकर आणि राहुल गांधी यांना ओळखता न येणारे भाडोत्रीआंदोलनकर्ते मागवले होते की काय? दुसरे म्हणजे सावरकरांच्या (V D Savarkar) विरोधात मोठ्या प्रमाणात जाहीरपणे वक्तव्य करणे केव्हा सुरू झाले याबद्दल भाजपने जरूर चिंतन करायला हवे. 2014 पूर्वी सावरकरांविषयी अशा पद्धती...
मानवतेचा महामेरू एस. एम. जोशी
विशेष लेख

मानवतेचा महामेरू एस. एम. जोशी

श्रीधर महादेव जोशी म्हणजेच एस. एम. जोशी (एस. एम) यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे १२ नोव्हेंबर १९०४ रोजी झाला. त्यांचे मूळ गाव हे कोकणमधील रत्नागिरीजवळील 'गोळप' हे होय. त्यांचे (S M Joshi) शिक्षण बी.ए., एल.एल.बी., डी.लीट. असून पुणे विद्यापीठाने त्यांना डी.लीट या पदवीने त्यांच्या देशसेवेच्या कार्याबद्दल सन्मानित केले होते. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. देशासाठी कार्य करत असताना त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्यात तुरुंगवासही त्यांच्या वाट्याला वारंवार आला. अशा या तुरुंगवासातील दिवसांमध्ये सुद्धा त्यांनी वाचनाची आवड जोपासली. या दिवसांत कार्ल मार्क्सच्या विविध ग्रंथांचे वाचन, विविध साप्ताहिकांतील अग्रलेखांचे वाचन, गुजराती कादंबऱ्यांचे वाचन, मानवेंद्रनाथ रॉय यांचे 'Tasks before us' या पुस्तकाचे वाचन. इत्यादी ग्रंथांचे वाचन त्यांनी केले होते. याव्यतिरिक्त तुरुं...
उदारमतवादी व पुरोगामी निर्माण देणारे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश
विशेष लेख

उदारमतवादी व पुरोगामी निर्माण देणारे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश

जयश्री इंगळे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आज भारताच्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त झालेत. त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2024 पर्यंत म्हणजे अजून दोन वर्षे असणार आहे. गेल्या काही वर्षातील सरन्यायाधीशांचा कार्यकाळ अल्प होता. त्यातही या पदापर्यंत पोहोचण्यापर्यंतची आणि पदावर असतांनाची कारकीर्द वादग्रस्त म्हणावी लागेल. (दीपक मिश्रा, बोबडे, गोगोई आणि लळीत). सरन्यायाधीश चंद्रचूड यांची देखील भूतकाळातील कारकीर्द उल्लेखनीय आहे. अलिकडच्या काळातील अनेक ऐतिहासिक निकाल देणार्‍या खंडपीठांचा ते सदस्य होते आणि त्यांचे अनेक निर्णय उदारमतवादी आणि पुरोगामी आहेत. त्यातील काही महत्त्वाचे निवाडे खालीलप्रमाणे: 1) 20 ते 24 आठवडे गर्भवती असलेल्या अविवाहित महिलांना विवाहित महिलांप्रमाणे सुरक्षित गर्भपात करण्याचा अधिकार देणे. 2) वैवाहिक बलात्कार हा गुन्हा ठरवणे. 3) ...