महाराष्ट्र

स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालयात कु.गायत्री गायकवाड हिचा सत्कार
महाराष्ट्र

स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालयात कु.गायत्री गायकवाड हिचा सत्कार

रिसोड प्रतिनिधी शंकर सदार: रिसोड इथून जवळच असलेल्या धोडप बु. येथील स्व. नरसिंगराव बोडखे विद्यालयात कु.गायत्री संतोषराव गायकवाड हिचा मुंबई येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय सेवायोजनेतून पथसंचालनामध्ये तिची निवड झाल्याने शाळेच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक सज्जनराव बाजड प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य दिगंबररावजी मवाळ, प्राचार्य विनोद पाटील नरवाडे संस्थेचे सचिव संतोषराव गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संस्थेचे सचिव संतोषराव गायकवाड यांनी आज स्पर्धेच्या युगात प्रत्येक जण मेडिकल व इंजीनियरिंग च्या मागे लागलेला आहे पण मुलांना काय आवडते ते...
ब्रह्माकुमारीज परिवाराच्या वतीने पत्रकारांचा सपत्नीक सत्कार
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, सामाजिक

ब्रह्माकुमारीज परिवाराच्या वतीने पत्रकारांचा सपत्नीक सत्कार

रिसोड/प्रतिनिधी शंकर सदार :- स्थानिक सिव्हिल लाईन स्थित ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने रिसोड शहरासह तालुक्यातील अधिकृत प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मिडीयात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पत्रकारांचा आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जयंती व पत्रकार दीना निमित्ताने ब्रह्माकुमारीज मीडिया विंग सदस्य रवि अंभोरे यांच्या पुढाकाराने व ब्रह्माकुमारीज सेवा केंद्राच्या संचलिका ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांच्या मार्गदर्शनाखाली 6 जानेवारी शनिवारी सकाळी 9 वाजता पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारी ज्योती दीदी तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर तर सत्कार मुर्ती म्हणून सर्व प्रतिष्ठित पत्रकार उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तहसीलदार तेजनकर, ब्रह्माकुमारी ज्योती दीदी,...
छत्रपती चषक खडकी सदार येथील स्पर्धेचे थाटात उद्धाटन
क्राईम, महाराष्ट्र

छत्रपती चषक खडकी सदार येथील स्पर्धेचे थाटात उद्धाटन

रिसोड: गेल्या सत्तावीस वर्षापासून क्रिडा प्रेमीच्या मनावर अधीराज्य गाजवणाऱ्या स्पर्धेचे भुमीपुत्र शेतकरी संघटनेने संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या हस्ते उद्धाटन सोहळा पार पडला आहे. यावेळी डॉ. जितेंद्र गवळी, राम देशमुख, राजुभाऊ खाबलकर, सचिन खरात, रविंद्र चोपडे, विकास झुंगरे, बननराव सानप, परमेश्वर हेदरे, रामेश्वर देवकर, अर्जुन पाटील खरात, माणिकराव खरात, पुरुषोत्तम रंजवे, भगनवाराव चोपडे, रियाज भाई, घनश्याम मापारी, कैलास लांडगे, प्रभाकर रंजवे, गजानन गव्हाणे, साजिद भाई, शिवाजी सदार, गजानन उगले, गंगाराम सुरुशे, विकास आवले, गजानन सदार, प्रदीप सदार, प्रदीप खुशालराव सदार, रमेशराव सदार, लोडजी सदार, चंदू भाऊ सदार रामकिसन बाजड, प्रकाश धांडे आत्माराम सदार, अशोक धांडे, शिवाजी सदार गणपत सदार आदी मंडळी उपस्थीत होते. मागील सत्तावीस वर्षापासून छत्रपती चषक स्पर्धेचे अविरत आयोजन करण्या...
पत्रकार दिनानिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया रिसोडच्या वतीने विविध उपक्रम
महाराष्ट्र, सामाजिक

पत्रकार दिनानिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया रिसोडच्या वतीने विविध उपक्रम

रिसोड (शंकर सदार) : - सहा जानेवारी या दिवशी महाराष्ट्रात पत्रकार दिन साजरा केला जातो. 1832 साली याच दिवशी बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' वृत्तपत्राला सुरुवात केली होती. त्यानिमित्ताने व्हॉईस ऑफ मीडिया रिसोडच्या वतीने 5 जानेवारी रोजी पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर, जेष्ठ पत्रकारांचा सत्कार आदी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रिसोड येथील पत्रकार कार्यालयात सदर कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष विनोद पाटील बोडखे यांनी दिली आहे. तसेच यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसिलदार प्रतिक्षा तेजनकर भूषविणार आहेत.तर बाजार समितीचे सभापती संजय शिंदे, गट विकास अधिकारी प्रमोद बदरखे, ठाणेदार देवेंद्र सिंह ठाकुर, रजिस्ट्रार अधिकारी श्री सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श...
Hari Narke : पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला; विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन
महाराष्ट्र, ताज्या घडामोडी, मोठी बातमी

Hari Narke : पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला; विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

पुणे (लोकमराठी न्यूज) : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. Asian Heart Hospital मध्ये घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 60 व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समता परिषदेच्या उद्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी हरी नरके आजच पहाटे पुण्याहून मुंबईला येत होते. येताना पहाटे त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला त्यामुळे बीकेसीच्या एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासन...
Nanded : उपवास करून वाईट प्रवृत्तीचा केला निषेध
महाराष्ट्र

Nanded : उपवास करून वाईट प्रवृत्तीचा केला निषेध

नांदेड, ता. ०२ (लोकमराठी न्यूज) : सध्या राज्यात मनोहर भिडे सह काही वाईट प्रवृत्तीचे लोक ज्या प्रकारे द्वेषाचे वातावरण तयार करत आहेत. तसेच मणिपूरमध्ये जे वाईट घटना घडली, आत्ताही जातीय दंगली चालू आहेत. त्यामुळं मनाला खूप वाईट वाटतंय. असे मत बालाजी पवार यांनी व्यक्त केले. पण आपलीही चूक आहे की आपण प्रेम आणि अहिंसा पसरवण्यात कुठे तरी कमी पडलो आहोत. त्यामुळे राज्यातील गांधी प्रेमींनीच्या वतीने मंगळवारी या प्रवृत्तीच्या विरोधात एक दिवसीय उपवास करून निषेध करण्यात आला. त्याप्रमाणे नांदेड येथे सुध्दा सकाळी पासून उपवास करण्यात आला. तसेच सकाळी अकरा वाजता गांधींजीच्या पुतळ्याला डॉ. जगदीश कदम सर यांचे हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. असे पवार यांनी सांगितले. एक दिवसीय उपवासात पीपल्स काॅलेजचे माजी उपप्राचार्य बालाजी कोम्लवार, आदित्य भांगे, नजीर शेख व बालाजी पवार सहभागी झाले होत...
मातंग समाजासाठी झटणारा तारा निखळला
महाराष्ट्र

मातंग समाजासाठी झटणारा तारा निखळला

मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय लहू शक्तीचे संस्थापक-अध्यक्ष मधुकरराव कांबळे यांचे निधन अकोला, ता. २५ (लोकमराठी न्यूज) : मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय लहू शक्तीचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री मधुकरराव कांबळे (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी (ता. २५ जुलै २०२३) अकोला येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर व समाजावर शोकाकुल पसरली आहे. त्यांच्यावर पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे. ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्षही होते. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी (ता. २६ जुलै) एक वाजता उमरी, स्मशानभूमी (रेल्वे लाईन जवळ) Akola येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तत्पुर्वी त्यांचे पार्थिव राज्यातील कार्यकर्त्यांच्या अत्यंदर्शनासाठी अकोला येथील त्यांच...
नोकरीसाठी पुण्याला निघालेल्या अवंतीवर काळाचा घाला 
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

नोकरीसाठी पुण्याला निघालेल्या अवंतीवर काळाचा घाला

लोकमराठी न्यूज नेटवर्क | १ जुलै २०२३ बुलढाणा : येथील समृद्धी महामार्गावर मध्यरात्री खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस उलटून डिझेल टँक फुटल्याने बसला आग लागली आणि झोपेतच २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात अनेकांनी आपली मुलं, नातेवाईक गमावली, तर काहींचं अख्खं कुटुंब गेलं. यापैकीच अवंती पोहनीकर ही तरुणी देखील होती. अवंतीचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला. तिच्या अशा अकाली जाण्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवंती पोहनीकर ही वर्ध्याची असून ती इंजिनीअर होती. पुण्याला जाण्यासाठई शुक्रवारी सायंकाळच्या खासगी ट्रॅव्हल्सने ती निघाली होती. परंतु मध्यरात्री बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच अवंतीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. अपघाताची माहिती मिळाली तेव्हा आपली मुलगी ठीक असेल ना, ति...
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले… 
महाराष्ट्र, मोठी बातमी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पत्र दिलं होतं, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. या पत्रावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे. हे पत्र मीच काढलं होतं अशी कबुली देतानाच दिल्लीतून वारंवार विचारणा झाल्यामुळेच मी रिफायनरीचा प्राथमिक अहवाल मागवला होता, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला. भारतीय कामगार सेनेच्या 55 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उद्धव ठाकरे संबोधित करत होते. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. या प्रसंगी खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. मी बारसूचं पत्र दिलं होतं. मी पत्र दिलं होतं तर अडीच वर्षात पोलिसांच्या बळावर मी तो प्रकल्प का राबवला नाही? उद्धव ठाकरेंचं एवढं ऐकता तर मग गद्दारी करून सरकार का पाडलं? आरेचा निर्णय का फिरवला? कांजूरचा निर्णय का फिरवला? रोज उठून किती लोक बुलेट ट्रेनने अहमद...
मयत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 25 लाखांची मदत देण्याची घोषणा – पालकमंत्री उदय सामंत
महाराष्ट्र, मोठी बातमी

मयत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 25 लाखांची मदत देण्याची घोषणा – पालकमंत्री उदय सामंत

मयत वारिसे यांच्या मुलाला कायम स्वरूपाची नोकरी देण्याची जबाबदारीही स्वीकारली रत्नागिरी, दि.12 (जिमाका) : पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबातील त्यांचा एक मुलगा आणि आजी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात येत होती. आज रत्नागिरीत रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत येथील पत्रकारांनीही पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, ही मागणी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पुन्हा मांडली. पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख व इतर माध्यमातून 15 लाख अशी मदत मयत पत्रकार वारिसे यां...