विशेष लेख

HOLIDAY : कामावरून साप्ताहिक सुट्टी घेणे का? गरजेचे आहे
विशेष लेख

HOLIDAY : कामावरून साप्ताहिक सुट्टी घेणे का? गरजेचे आहे

आजच्या ताणतणावपूर्ण आणि धावपळीच्या जीवनात कामावरून साप्ताहिक सुट्टी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये कामाच्या विश्रांतीला महत्त्व दिलं जातं, कारण मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने साप्ताहिक सुट्टी घेणं खूप फायदेशीर असू शकतं. विविध कारणांमुळे साप्ताहिक सुट्टी महत्त्वाची आहे, आणि त्याचं महत्व समजून घेतल्यास आपल्या कामकाजातील कार्यक्षमता आणि जीवनातील आनंद वाढवता येतो. १. मानसिक विश्रांती आणि ताण कमी करणे साप्ताहिक सुट्टी घेतल्याने मानसिक विश्रांती मिळते. सतत काम करणं हे मानसिक ताण, थकवा आणि चिंतेला वाढवू शकतं. सुट्टी घेतल्याने कामाचा दबाव कमी होतो आणि मेंदूला आराम मिळतो. या विश्रांतीमुळे आपण नव्या उत्साहाने कामावर परत येऊ शकतो. ताणामुळे होणारी मानसिक धकधक, नैराश्य किंवा कामावरून सुट्टी न घेतल्याने होणारी बर्नआऊट परिस्थिती टाळली जाऊ शकते. २. शारीरिक...
Cyclostyle : सायक्लोस्टाईल केलेल्या प्रश्नपत्रिका पूर्वी शाळेत दिल्या जायच्या; काय होते हे तंत्र
विशेष लेख

Cyclostyle : सायक्लोस्टाईल केलेल्या प्रश्नपत्रिका पूर्वी शाळेत दिल्या जायच्या; काय होते हे तंत्र

विलास स्वादी१ - स्टेनसिल - हां एक फूलसकेप आकाराचा टिश्यू पेपर सारखा स्क्रीन असे. या वर स्टेनसिल पेन वापरून मजकूर लिहिला जायचा किवां टाइपराइटर / टंक लिखित केला जायचा. स्क्रीन वर टंक लेखन करण्या साठी - टाइपराइटर मधील रिबन काढून ठेवावी लागे. मग नेहमी प्रमाणे टंकखन करत. या प्रकारात अक्षर सरळ स्क्रीन वरच उमटावाली जात. अक्षराच्या वळणा प्रमाणे स्क्रीन वर ठसा उमटला जाई. टाइपराइटर कीती जोराने बड़वायाचा याचे भान राखावे लागे. अक्षर चुकीचे उमटवल्यास चूक सुधारण्या साठी लाल रंगाचे सोलुशन ब्रश ने चुकीच्या अक्षरावर हल्केच लावावे लागे. हे सोलुशन ठसा भरून टाके. नंतर त्याच जागेवर योग्य अक्षर हळू वार पणे उमटावे लागे. एकन्दर टंक लेखन कौशल्याचा कस लागेल असे ते काम होते. ज्याना ते जमे ते ऑफिस मधे रुबाब दाखवत. यात घाई गड़बडीत एखाद दुसरी ओळ दुसऱ्या पानावर घ्यावी लागे. काही वरिष्ठ या वरुन शेरेबाजी करतच. ...
Family disputes : पती-पत्नी जेव्हा मुलांसमोर भांडण करतात, त्याचा मुलांवर काय परिणाम होतो?
विशेष लेख

Family disputes : पती-पत्नी जेव्हा मुलांसमोर भांडण करतात, त्याचा मुलांवर काय परिणाम होतो?

पती-पत्नी यांचे एकमेकांशी असलेले संबंध घरातील वातावरणावर मोठा परिणाम करतात. जेव्हा हे दोन्ही सहकारी आपसात भांडतात, तर त्याचा थेट मुलांवर परिणाम होतो. मुलांच्या मनोविकासात आणि भावनिक स्थितीत असं महत्त्वाचं बदल घडवू शकतो. यावर विचार करताना, मुलांवर होणाऱ्या परिणामांचे विविध पैलू समजून घेणं महत्त्वाचं आहे. १. भावनिक असुरक्षितता मुलं आपली सुरक्षा, प्रेम आणि संरक्षण यासाठी पालकांवर अवलंबून असतात. जेव्हा पती-पत्नी एकमेकांशी वाद घालतात, तर मुलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. मुलं आपल्याला घरात सुरक्षितता नाही असं समजू शकतात, ज्यामुळे त्यांचं मानसिक ताण वाढतो. २. चिंता आणि ताण भांडणामुळे मुलांना मानसिक ताण आणि चिंता निर्माण होऊ शकते. त्यांना पालकांच्या भांडणामुळे त्यांचं भविष्य, घराचं वातावरण आणि इतर गोष्टींविषयी भीती वाटू शकते. हे मुलांच्या दैनंदिन जीवनात नक...
Santosh Deshmukh : प्रिय संतोष देशमुख, तुमच्या खूनाचे फोटो मी बघितलेच नाहीत - हेरंब कुलकर्णी
विशेष लेख

Santosh Deshmukh : प्रिय संतोष देशमुख, तुमच्या खूनाचे फोटो मी बघितलेच नाहीत - हेरंब कुलकर्णी

तुमचे ते फोटो काल सगळीकडे दाखवले जाताना बघण्याची हिम्मतच झाली नाही...बघण्याची आमची हिंमत नाही,तुम्ही ते कसे सहन केले असेल ? ती नुसती वर्णनेच मनात भीतीची वादळे आणतात...थरकाप होतो. आणि बघून तरी मी काय करू ? माझी हतबल भेकड अगतिक अवस्था मलाच लज्जित करते संतोष....असे ठिकठिकाणी घडताना आपण जिवंत आहोत आणि तितकेच असहाय आहोत याने जास्त त्रास होतो...त्यापेक्षा ते बघूच नये असे वाटते. ते अज्ञान एक बनचुकी क्षुद्र सुरक्षितता देते...केवळ कल्पनेनेच बघुन त्यातील क्रौर्य अनुभवले..क्षणभर त्या जागी स्वतःला ठेवून भयचकित झालो. मृत्यू क्षणाक्षणाला जवळ येताना आणि जीवाची काहीली होताना...सहन होत नसताना पाईप तुटेपर्यंत होणारी मारहाण...मृत्यूच सुटका करील यातून अशी अगतिक मन:स्थिती आणि अखेरच्या क्षणी बायको मुलांचे डोळे समोर येताना डोळ्यात अश्रू येताना समोर निर्लज्ज हसणारे हैवान...आणि शेवटी लायटर ने डोळे जाळल्यावर फक्त अ...
Jagtik Mahila Din 2025 : जागतिक महिला दिन का साजरा केला जातो
विशेष लेख

Jagtik Mahila Din 2025 : जागतिक महिला दिन का साजरा केला जातो

जागतिक महिला दिन (International Women's Day) दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय यशाचा सन्मान करण्यासाठी आणि महिला अधिकार, लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाच्या समर्थनासाठी समर्पित आहे. जागतिक महिला दिनाचा इतिहास: जागतिक महिला दिनाची सुरुवात २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात झाली. याची मुळे श्रमिक चळवळीत आणि महिलांच्या अधिकारांसाठी झालेल्या संघर्षात शोधता येतात. १९०८ साली, अमेरिकेमध्ये महिला कामगारांनी कामाच्या तास, वेतन आणि मतदानाच्या अधिकारासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलने केली. १९०९ मध्ये, अमेरिकेतील सोशलिस्ट पक्षाने पहिला "राष्ट्रीय महिला दिन" साजरा केला. १९१० मध्ये, कोपनहेगन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत जर्मन समाजवादी नेते क्लारा झेटकिन यांनी जागतिक महिला दिन साजरा करण्याची कल्पना मांडली. त्यानंतर,...
GB म्हणजे किती; संपूर्ण माहिती
विशेष लेख

GB म्हणजे किती; संपूर्ण माहिती

तंत्रज्ञानाच्या युगात डेटा, स्टोरेज आणि इंटरनेट स्पीड याबाबत अनेक वेळा १ जिबी (GB) हा शब्द आपण ऐकतो. पण १ जिबी म्हणजे नक्की किती आणि त्याचा आपल्या डिजिटल जगतात काय उपयोग होतो, याबाबत जाणून घेऊया. १ जिबी म्हणजे किती बाइट्स? GB म्हणजे गिगाबाइट (Gigabyte), जो डिजिटल स्टोरेज किंवा डेटा ट्रान्सफरचे प्रमाण मोजण्यासाठी वापरला जातो. मापन प्रमाण: 1 बाइट (Byte) = 8 बिट्स (Bits) 1 KB (किलोबाइट) = 1,024 बाइट्स 1 MB (मेगाबाइट) = 1,024 KB 1 GB (गिगाबाइट) = 1,024 MB याचा अर्थ,1 GB = 1,024 MB = 1,048,576 KB = 1,073,741,824 बाइट्स (सुमारे 1 अब्ज बाइट्स)! १ जिबीमध्ये काय स्टोअर करता येईल? १ GB डेटा म्हणजे किती मोठा? हे समजण्यासाठी काही उदाहरणे पाहूया: व्हिडिओ: साधारण १ जिबीमध्ये १ तासाचा 720p HD व्हिडिओ स्टोअर करता येतो. Full HD (1080p) व्हिडि...
AADHAR केवायसी करताना ओटीपी येत नाही; असू शकतात ही कारणे
विशेष लेख

AADHAR केवायसी करताना ओटीपी येत नाही; असू शकतात ही कारणे

लोकमराठी न्यूज नेटवर्क : आधार Aadhar केवायसी करताना ओटीपी न येण्याची अनेक कारणं असू शकतात. काही संभाव्य कारणं आणि त्यांचे निराकरण खालीलप्रमाणे आहेत: १. मोबाईल नंबर: आधार कार्डमध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबर: तुम्ही जो मोबाईल नंबर वापरत आहात तो आधार कार्डमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ओटीपी केवळ नोंदणीकृत मोबाईल नंबरवरच पाठवला जातो. मोबाईल नंबर चालू असणे: तुमचा मोबाईल नंबर चालू असणे आणि त्यावर नेटवर्क उपलब्ध असणे आवश्यक आहे. SMS सेवा: तुमच्या मोबाईल नंबरवर SMS सेवा सुरू असणे आवश्यक आहे. २. नेटवर्क समस्या: तुमच्या परिसरात खराब नेटवर्क असल्यास ओटीपी येण्यास विलंब होऊ शकतो किंवा ओटीपी येऊ शकत नाही. नेटवर्कमध्ये व्यत्यय: तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरच्या नेटवर्कमध्ये काही समस्या असल्यास ओटीपी delivery मध्ये अडचण येऊ शकते. ३. UIDAI सर्व्हर समस्या: UIDAI सर्व्हर डाउन: UIDAI सर्व्हर डाउन...
राजमाता जिजाऊ यांच्या चरित्रातून काय शिकावे?
विशेष लेख

राजमाता जिजाऊ यांच्या चरित्रातून काय शिकावे?

अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता.विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफ़ुन स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणार्या राजमाता जिजाऊ माता यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे. त्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य,शौर्य,प्रचंड आत्मविश्वास,इच्छाशक्ती आणि गरीबांप्रति प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंडखेडराजा (जि.बुलढाणा) येथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यातील लखूजीराजे जाधव म्हाळसाराणी या राजघराण्यात झाला. लखुजीराजेंनी आपल्या मुलांबरोबरच मुलीला म्हणजेच जिजाऊला देखील राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. जिजाऊंनी राजघराण्याचा व्रुथा अभिमान न बाळगता युद्धकला राजनीती यामध्ये प्रावीण्य मिळवले.आज आपण ज...
शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं – डॉ. तारा भवाळकर
विशेष लेख

शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं – डॉ. तारा भवाळकर

‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार २०२४’ च्या मानकरी डॉ. तारा भवाळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणातील महत्त्वाचा संकलित अंश… 1) सांगलीमध्ये काही डॉक्टर, काही निरनिराळ्या क्षेत्रामधील मंडळी एकत्र येऊन आम्ही एक मासिक पत्रिका चालवतो. त्याच्यामध्ये जुन्या काळातलं चांगलं काय आणि ते ‘सायंटिफिक’ कसंय. आपल्याला वैज्ञानिक वगैरे असं म्हटलं की कळणं अवघड होतं. पण ‘सायंटिफिक’ म्हटलं की, अभिजात मराठीत पटकन कळतं. तर ते ‘सायंटिफिक’ कसंय हे सांगण्याचा प्रयत्न एक सद्गृहस्थ करत होते लेखनातून. आणि त्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलं होतं की, कुंकू लावणं हे कसं ‘सायंटिफिक’ आहे. आपण सुज्ञ आहात. मला काय म्हणायचंय ते आपल्या लक्षात येईल. कुंकू लावलं की… भ्रूमध्यामध्ये अमूक एक बिंदू कसा असतो आणि वैज्ञानिक दृष्टीने तो दाबबिंदू कसा असतो. त्यामुळे स्त्रियांचं मानसिक संतुलन वगैरे वगैरे कसं राहतं. माझं ड...
'तर्कटपंजरी' : तर्काच्या आधारावर विवेकवादी समाज घडवण्याची क्षमता असलेले पुस्तक
विशेष लेख

'तर्कटपंजरी' : तर्काच्या आधारावर विवेकवादी समाज घडवण्याची क्षमता असलेले पुस्तक

जगदीश काबरे हे जग पुरुषांचे आहे या चालीवर म्हणता येईल की हे जग अस्तिकांचे आहे. ज्याप्रमाणे पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते त्याचप्रमाणे या अस्तिकांच्या जगातसुद्धा नास्तिकांना दुय्यम स्थान दिले जाते. स्त्री म्हणजे पापयोनी समजणारे नास्तिक म्हणजे दुर्जन समजत असतात. पण मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यात स्त्रियांनी शेतीचा शोध लावून माणसाच्या सामाजिक प्रगतीचा मार्ग खुला केला त्याचप्रमाणे चार्वकांनी देव आणि पारलौकिता नाकारून वैदिक धर्माला आव्हान दिले आणि वैज्ञानिक प्रगतीचा पाया घातला. पण माणसाला अज्ञाताची भीती असल्यामुळे कुठल्यातरी फसव्या का होईना पण आधाराची गरज लागते. ती गरज सहजपणे देवाची संकल्पना पूर्ण करते. म्हणून त्याला माहीत नसलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर 'देवाची करणी आणि नारळात पाणी' या पद्धतीचे स्वीकारणे सोयीचे जाते. माणसाला विचार करण्याचा आळस असतो. तसेच तो ...