
पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड, किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्यांची अवस्था बिकट झाली आहे. बुरुज, तटबंदी ढासळत आहेत, त्यांचे जतन करणे आणि ही संपत्ती पुढच्या पिढीला सुपूर्द करणे गरजेचे आहे. यासाठी महाराज ग्रुप गडसंवर्धन पिंपरी चिचवड तर्फे रविवारी (दि ५) मावळ किल्ले तुंगगड येथे गडसंवर्धन मोहीम राबवणयात आली.
सर्वप्रथम गडावरील ध्वज बदलण्यात आला. शिववंदना घेऊन प्रवेशद्वार, पायऱ्या, तसेच जे अवशेष गवता खाली गेले होते, ते साफ करण्यात आले. गडावरील सर्व कचरा गडाच्या खाली कचरा कुंडीत आणुन टाकण्यात आला.
- जागतिक दिव्यांग दिन विशेष : अंधारामध्ये आपण मिळून आणू प्रकाश : “सप्तर्षी फाउंडेशन”
- धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था तळेगाव दाभाडेच्या उपाध्यक्ष पदी जितेंद्र बोत्रे यांची बिनविरोध निवड
- श्री गणेश सहकारी बँकेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध!
- संवैधानिक अधिकारांसोबत कर्तव्यांचेही पालन करा; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे आवाहन
- बलशाली भारत घडवण्याच्या राष्ट्रकार्यात योगदान द्या; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे आवाहन
यावेळी ग्रुपचे संस्थापक अक्षय नाळे, सुशील पोतदार, अतुल महाडिक, सुरज करांडे, शुभम देशमुख, परमेश्वर त्रिमले, शिवम खिल्लारी, ओमकार जाधव, सागर मोरे, अमित मालुसरे, श्री मरगळ, कैलास सोनटक्के, राहुल ईबितदार, अतिश अगरक, कैलास चाकोरे, रुपेश पाटसकर, दिपक खंडगावे आदी ४० स्वयंसेवकांनी मोहिमेत सहभाग घेतला.