
पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या गड, किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्यांची अवस्था बिकट झाली आहे. बुरुज, तटबंदी ढासळत आहेत, त्यांचे जतन करणे आणि ही संपत्ती पुढच्या पिढीला सुपूर्द करणे गरजेचे आहे. यासाठी महाराज ग्रुप गडसंवर्धन पिंपरी चिचवड तर्फे रविवारी (दि ५) मावळ किल्ले तुंगगड येथे गडसंवर्धन मोहीम राबवणयात आली.
सर्वप्रथम गडावरील ध्वज बदलण्यात आला. शिववंदना घेऊन प्रवेशद्वार, पायऱ्या, तसेच जे अवशेष गवता खाली गेले होते, ते साफ करण्यात आले. गडावरील सर्व कचरा गडाच्या खाली कचरा कुंडीत आणुन टाकण्यात आला.
- HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेजमध्ये 'भारतातील संशोधनाच्या संधी' विषयावर कार्यशाळा संपन्न
- PIMPRI : गाथा सन्मानाची : कर्तृत्ववान महिलांचा गुणगौरव सन्मान सोहळा
- PIMPRI : पिंपरी मार्केट येथे वाहन मुक्त दिनानिमित्त लहान मुले,ज्येष्ठ नागरिक, महिलांनी घेतला मनमुराद फिरण्याचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचाही आनंद
- PIMPRI : कायद्याची माहिती झाल्यास स्त्री अधिक सक्षम - न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार
- Dehu : वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू मारोती महाराज कुऱ्हेकर यांच्या कीर्तनाने रचला सोहळ्याचा पाया
यावेळी ग्रुपचे संस्थापक अक्षय नाळे, सुशील पोतदार, अतुल महाडिक, सुरज करांडे, शुभम देशमुख, परमेश्वर त्रिमले, शिवम खिल्लारी, ओमकार जाधव, सागर मोरे, अमित मालुसरे, श्री मरगळ, कैलास सोनटक्के, राहुल ईबितदार, अतिश अगरक, कैलास चाकोरे, रुपेश पाटसकर, दिपक खंडगावे आदी ४० स्वयंसेवकांनी मोहिमेत सहभाग घेतला.