महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांकडून वंचित आघाडीला बळ – पृथ्वीराज चव्हाण
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांकडून वंचित आघाडीला बळ – पृथ्वीराज चव्हाण

पुणे (लोकमराठी) : लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित आणि भाजपचे काय संबंध होते हे सर्वांना माहित आहे. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वंचितला बळ येत आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पुण्यातील काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेड येथे विंचीत बहुजन आघाडी हा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष होईल असा दावा केला. त्यावर चव्हाण म्हणाले, "वंचित आघाडी वाढावी यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न आहेत. लोकसभेत त्यांचे काय संबंध होते हे लोकांना माहिती आहे. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे जागा वाटपासाठी अजून चर्चा झालेली नाही. तसेच आणखी आघाडीत कोणाला घ्यायचे हे ठरलेले नाही.'' ''मुख्यमंत्री फडणवीस हे अमित शहांप्रमाणे सामा दाम दंड भेद वापरून विरोधी पक्षातील नेत्यांना धमकाऊन भाजपमध्ये घेत आहेत. विरो...
एक सप्टेंबरपासून वाहतुकीचे नियम अधिक कडक; विना परवाना वाहन चालवल्यास पाच हजार दंड
महाराष्ट्र, मोठी बातमी

एक सप्टेंबरपासून वाहतुकीचे नियम अधिक कडक; विना परवाना वाहन चालवल्यास पाच हजार दंड

मुंबई (लोकमराठी) : मोटार वाहन कायद्यातील बदलांमुळे एक सप्टेंबरपासून नवीन नियम लागू होणार आहेत. वाहतुकीचे नवीन नियम आधीपेक्षा अधिक कठोर असतील. वाहतूक परवान्याशिवाय गाडी चालवल्यास दंड दहापट करण्यात आला आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यावर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत बदल करण्यात आले आहेत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने हे बदल करण्यात आले आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स सोबत नसेल तर पाचशे रुपयांऐवजी दसपट म्हणजे तब्बल पाच हजार रुपये दंड मोजावा लागणार आहे. दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांकडून दोन हजार रुपये दंड वसूल केला जात होता, तोही आता दहा हजार रुपयांवर नेण्यात आला आहे. वाहतुकीचे नवे नियम लागू करण्याबाबत विधेयकाला संसदेने मंजुरी दिली. अल्पवयीन मुलांनी गाडी चालवताना अपघात घडला, तर त्याच्या किंवा तिच्या पालकांना तीन वर्ष तुरुंगवासाची तरतूद आहे. त्याचबरोबर ...
राज ठाकरेंकडे एवढी संपत्ती कुठून आली?; अंजली दमानिया यांचा सवाल
महाराष्ट्र, मोठी बातमी

राज ठाकरेंकडे एवढी संपत्ती कुठून आली?; अंजली दमानिया यांचा सवाल

मुंबई (लोकमराठी) : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चौकशीसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहे. या चौकशीची वेळ चुकीची असल्याचे मत दमानिया यांनी व्यक्त केले आहे. मात्र त्याचवेळी ही चौकशी याआधीच व्हायला हवी होती असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. तसचं राज ठाकरे यांच्या कमाईचे साधन काय?, त्यांच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? असा सवालही त्यांनी एका वृत्तवाहिनिशी बोलताना व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांची चौकशी २२ तारखेला म्हणजेच आज होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाल्यानंतर मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे सकाळपासूनच मुंबईमधील अनेक महत्वाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बंदोबस्तामध्ये राज ठाकरे त्यांची पत्नी शर्मिला आणि मुलगा अमित यांच्या सोबत पावणे अकराच्या सुमारास कृष्णकुंजवरुन ईडीच्या ...
कांदा व्यापाऱ्याची ४२ लाखाची फसवणूक
महाराष्ट्र

कांदा व्यापाऱ्याची ४२ लाखाची फसवणूक

सोलापूर, दि. २० (लोकमराठी) : सोलापूरातील कांदा व्यापारी उस्मान अब्दूल गफुर बागवान (वय ५१, रा. तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर) यांची ४२ लाख २३ हजार ९३९ रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यांच्याकडून कांदा घेवून ठरलेल्या भावापेक्षा कमी पैसे दिले. थकीत रक्कम न दिल्याने मिरासाब आणि सिराज (रा. जिना मक्कल, तामीळनाडू) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बागवान यांचा कांदा विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी शेतकऱ्याकडून घेतलेला कांदा हे मिरासास आणि सिराज यांच्याकडे जुना पुना नाका येथे ट्रकने तामीळनाडू येथे पाठवला होता. ओळख असल्यामुळे बागवान हे मिरासाब आणि सिराज यांच्यासोबत व्यवहार करित होते. सुरवातीला काही दिवस व्यवहार व्यवस्थित झाला. त्यानंतर मात्र मिरासाब आणि सिराज या दोघांनी ठरलेल्या भावापेक्षा कमी पैसे दिले. उर्वरित रक्कम नंतर देतो म्हणून टाळाटाळ केली. अद्यापर्यंत थकीत रक्कम दिली नाही. बागवान यांनी वा...
लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या टपाल तिकिटाचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
महाराष्ट्र, मोठी बातमी

लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या टपाल तिकिटाचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

लोक मराठी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र शासन व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने गुरूवारी (दि. १ ऑगस्ट) अण्णा भाऊंचे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येणार आहे. अशी माहिती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी दिली. मुंबईतील ब्रांदा येथील रंगशारदा सभागृहात गुरूवारी सकाळी साडेनऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते हा ऐतिहासिक सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री दिलीप कांबळे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समिती उपाध्यक्ष मधुकर कांबळे, लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती अध्यक्ष अशोक लोखंडे, आमदार सुधारक भालेराव यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी, अधिकारी आणि अण्णा...
राज्यातील ३५ पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या
मोठी बातमी, महाराष्ट्र

राज्यातील ३५ पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या

मुंबई (लोक मराठी न्यूज) : राज्य गृह विभागाने राज्यातील तब्बल 35 पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश बुधवारी रात्री काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे (कंसात कोठुन कोठे बदली झाली ते ठिकाण) : बांदेकर दामोदर वसंत (रत्नागिरी ते मुंबई शहर), पाटील सुधीर भिमराव (वाशिम ते मपोअ, नाशिक), मंडलवार जयदीश शिवाजी (लोहमार्ग, औरंगाबाद ते यवतमाळ), श्रीमती माने वंदना शिवराम (बृहन्मुंबई ते ठाणे शहर), भामरे अविनाश भगवान (बुलढाणा ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), खेडकर हरिष दत्‍तात्रय (औरंगाबाद, ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), संपते प्रशांत पांडुरंग (पोप्रके, बाभळगाव, लातूर ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), जाधव विजय कृष्णराव (मओप, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), वाघमारे रूपचंद मधुकर (मओअ, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), पाटील ...
अनधिकृत सिगारेट विक्रीसाठी 50 हजारांची लाच मागणारा पोलिस व हस्तक एसीबीच्या ताब्यात
महाराष्ट्र

अनधिकृत सिगारेट विक्रीसाठी 50 हजारांची लाच मागणारा पोलिस व हस्तक एसीबीच्या ताब्यात

पुणे : पान टपरीवर अनाधिकृतपणे सिगारेटची विक्री करतो म्हणून कारवाईचा बडगा उगारून पान टपरी चालकाकडे ५० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी २० हजार रूपयाची लाच खासगी इसमामार्फत स्विकारणारा पोलिस कर्मचारी आणि खासगी इसम अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात अडकले आहेत. त्या दोघांना लाच घेतल्यानंतर रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक संजय भिला वाघ (३८, बक्‍कल नंबर ३७३८, नेमणुक चर्तुःश्रृंगी पोलिस स्टेशन) आणि किरण प्रकाश पाले (रा. जुनी सांगवी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तक्रारदाराची परिसरात पानाची टपरी आहे. पान टपरीवर अनाधिकृत सिगारेटची विक्री करतो म्हणुन पोलिस कर्मचारी वाघ हे तक्रारदारास कारवाईची भाषा करीत होते. कारवाई न करण्यासाठी त्यांनी ५० हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली होती. दरम्यान, तक्रारदार यांनी अ‍ॅन्टी करप्...
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रची पालघर जिल्हा कार्यकारीणी जाहीर
महाराष्ट्र

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रची पालघर जिल्हा कार्यकारीणी जाहीर

पालघर : नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या पालघर जिल्हा कार्यकारीणी पालघरचे समन्वयक ज्येष्ठ पत्रकार दीपक मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य कोषाध्यक्ष वैशाली आहेर यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आली. या कार्यकारिणीचा कार्यकाळ एक वर्षाचा असून ती पुढीलप्रमाणे. अध्यक्ष - चंद्रकांत खुताडे (डहाणु, दै. पुढारी), सचिव - अनिल पाटील (वाडा, शब्द प्रहार), कोषाध्यक्ष - नीता चौरे (बोईसर, दै.नवराष्ट्र, NTV मराठी) उपाध्यक्ष - विजय देसाई (वसई) समन्वयक - दीपक मोहिते (विरार, नवशक्ति) कार्यकारिणी सदस्य रुतिका वेंर्गुलेकर (विरार, लोकमत) दिलीप कवेरीया (विरार) रफिक घाची (डहाणु, डहाणु मिञ) सल्लागार - उमाकांत वाघ (विरार, दै.सामना) एनयुजे महाराष्ट्र ही एनयुजे इंडिया, नवी दिल्लीच्या सर्वात मोठ्या लढाऊ युनियनशी संलग्न असून, ब्रुसेल्सच्या इंटरनॅशनल...
जिवंत नाटकातून अनुभवला येशू ख्रिस्ताच्या दु:खमय जीवनाचा प्रवास
महाराष्ट्र

जिवंत नाटकातून अनुभवला येशू ख्रिस्ताच्या दु:खमय जीवनाचा प्रवास

अहमदनगर : एरंडगावातील (आदर्शगाव समसुद) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात फेथ ग्रुपच्या वतीने "येशू ख्रिस्ताचे दुःखसहन' (पॅशन ऑफ ख्राईस्ट) हे धार्मिक मराठी महानाट्यात सादर करण्यात आले. त्यामध्ये दाखविण्यात आलेल्या वधस्तंभवरील येशूच्या जीवन प्रवासाने आबालवृद्ध अक्षरशः हरपून गेले. महानाट्यात बायबलमधील अनेक धार्मिक प्रसंग कलाकारांनी जिवंत केले. मरण यातना सहन करूनही प्रभू येशूच्या शांतता, मानवता व प्रेमाचा संदेश या नाटिकेद्वारे देण्यात आला. ग्रामीण भागात प्रथमच सादर झालेल्या ख्रिस्ती धार्मिक जिवंत देखावा पाहण्यासाठी समाज बांधवांनी मोठी गर्दी केली होती. या नाटिकेत पुणे, नाशिक, मुंबई, पिंपरी चिंचवड येथील 40 कलाकारांचा सहभाग होता. तत्कालीन वेशभूषा, उत्कृष्ट ध्वनी व प्रकाश योजनेने सादर करण्यात आलेल्या नाटीकेने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. शशिकांत रावडे यांनी येशू ख्रिताची, जॉन ...
अजित पवारांकडून शरद पवार हिट विकेट – Narendra Modi
महाराष्ट्र

अजित पवारांकडून शरद पवार हिट विकेट – Narendra Modi

वर्ध्यातील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( Narendra Modi ) राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवारांकडून शरद पवार हिट विकेट – Narendra Modi ( LokMarathi News ) महाराष्ट्रातील वर्ध्यातील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. शरद पवार कुठलीही कृती विचाराशिवाय करत नाहीत असे बोलले जाते. शरद पवारांनी आधी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. पण हवा कुठल्या दिशेने वाहत आहे हे शरद पवारांना माहित आहे. म्हणून त्यांनी निवडणूक न लढवण्याच निर्णय घेतला असे पंतप्रधान मोदी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कौटुंबिक लढाई सुरु आहे. शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अजित पवारांच्या हातून शरद पवार हिट विकेट झाले आहेत असा आरोप पं...