निवडणूक सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया : राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया
‘राज्य निवडणूक आयोग : रौप्य महोत्सवी वाटचाल’चे पुण्यात प्रकाशन
पुणे (लोकमराठी): निवडणूक सुधारणा ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने विविध सुधारणा हाती घेतल्या आहेत. या सुधारणांच्या माध्यमातून निर्भय, मुक्त व पारदर्शक निवडणुका पार पाडणे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी येथे केले.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या २५ वर्षपूर्तीनिमित्त ‘राज्य निवडणूक आयोग : रौप्य महोत्सवी वाटचाल’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे प्रकाशन श्री. सहारिया यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे यावेळी उपस्थित होत्या.
श्री. सहारिया यांचे 'निवडणूक सुधारणा आणि स्थानि...










