राजकारण

राजकारण Politics News Mrathi – LokMarathi News

राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे : तटकरे
ताज्या घडामोडी, राजकारण

राष्ट्रवादीला अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद मिळावे : तटकरे

नवी दिल्ली (लोकमराठी) : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली असून, सकारात्मक निर्णय होत आहेत. राष्ट्रवादीला शिवसेनेपेक्षा दोनच जागा कमी असून, अडीच वर्षे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी इच्छा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले. शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत औपचारिक सहमती झाली. यामुळे महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा उद्या (शुक्रवार) शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर होण्याची शक्यता आहे. आजही दिल्लीत बैठकांचे सत्र सुरुच असून, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठका होत आहेत. तटकरे म्हणाले, "की राज्याची मुख्यमंत्री महिला व्हावी, अशी काही चर्चा झालेली नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची चर्चा अजून झालेली नाही. शिवसेनेपे...
महाशिवआघाडीचे सरकार पवारांमुळे पाच वर्षे टिकेल : रामदास आठवले
राजकारण

महाशिवआघाडीचे सरकार पवारांमुळे पाच वर्षे टिकेल : रामदास आठवले

मुंबई (लोकमराठी) : राज्यात नव्याने स्थापन होत असलेले शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे महाशिवआघाडीचे सरकार शरद पवार यांच्यामुळे पाच वर्षे टिकेल, असा विश्वास रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. शिवसेनेसोबत सत्तेत जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत औपचारिक सहमती झाली. यामुळे महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा उद्या (शुक्रवार) शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर होण्याची शक्यता आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आठवले यांनी हे वक्तव्य केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना आठवले म्हणाले, की शरद पवार असल्यामुळे हे सरकार पाच वर्षे टिकू शकेल. वैचारिक मतभेद होणार नाही, हे ते पाहतील. अडीच वर्षे शिवसेनेला आणि अडीच वर्षे राष्ट्रवादीला ...
पिंपरी चिंचवड, राजकारण

‘सखी’ केंद्र ठरली लक्षवेधी

पिंपरी (लोक मराठी) : मतदान प्रक्रियेला सोमवारी सकाळी सातपासून सुरुवात झाली. मतदार केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या. येथे अनेक बूथ तयार केले होते. परंतु, 'सखी बूथ' हा सर्वांचा लक्ष वेधून घेत होता. दरम्यान भोसरी सखी केंद्रात सकाळी अकरा पर्यत 11.72, चिंचवड मध्ये 16.5 टक्के तर पिंपरीतील १४१ जणांनी मतदान केले. शहरात तीन सखी मतदार केंद्र तयार केली होती. या बूथबाहेर फुगे लावले होते. जागोजागी रांगोळी काढण्यात आली होती. सेल्फी पॉइंट आणि लहान मुलांसाठी पाळणा ठेवण्यात आला होता. स्वागत कमानीसह मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भात जनजागृती करण्यात आली होती. त्यामुळे या शाळेत येणारा प्रत्येक मतदार सखी बूथच्या परिसरात काही क्षण थांबून पुढे जात होता. मतदानासाठी बूथमध्ये जाताना दरवाजातच महिलांना गुलाबाचे फूल देऊन स्वागत करण्यात येत होते. प्रत्येक महिला 'यंदा काय विशेष?' असे महिला कर्मचाऱ्यास ...
पाच वर्षात बेरोजगारीचा प्रश्न कमालीचा बिकट – जय पवार
राजकारण

पाच वर्षात बेरोजगारीचा प्रश्न कमालीचा बिकट – जय पवार

बारामती (लोकमराठी) : मी युवक आहे, युवकांच्या काय समस्या आहेत हे मला माहिती आहे, गेल्या पाच वर्षात बेरोजगारीचा प्रश्न कमालीचा बिकट झालेला असून यावर मात करण्यास माझे प्राधान्य असेल व प्रचारातही बेरोजगारीवर मात करण्याच्या मुद्यावर जोर देणार असल्याची प्रतिक्रीया अजित पवार यांचे चिरंजिव जय पवार यांनी बोलून दाखविली. अजित पवार यांच्या प्रचारार्थ कालपासून जय पवार हे शहरातील पदयात्रातून सहभागी होत आहेत. कसबा विभागात काल जय पवार यांनी घरोघरी जाऊन प्रचारपत्रकांचे वाटप करत मतदारांशी संपर्क साधला. त्या नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी बेरोजगारी वेगाने वाढत असल्याची चिंता व्यक्त करत युवकांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करणार असल्याचे नमूद केले. शेतकऱ्यांची कर्जमाफी न झाल्याने शेतकरीही अडचणीत आहेत, आघाडीचे सरकार आल्यास निश्चित कर्जमाफी दिली जाईल, असे ते म्हणाले. माझ्या सहक...
कसब्यातील तीनही इच्छुकांच्या मंडळात ‘देवेंद्र’ दर्शन का?
राजकारण

कसब्यातील तीनही इच्छुकांच्या मंडळात ‘देवेंद्र’ दर्शन का?

पुणे (लोक मराठी) : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुण्यात महागणादिशांची दर्शन यात्रा काढणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोथरूडमधील भाजपचे इच्छुक मुरलीधर मोहोळ आणि कसब्याचे दावेदार धीरज घाटे यांच्या मंडळांच्या "श्रीं'च्या दर्शनाला जाणार आहेत. यानिमित्ताने मोहोळ आणि घाटे समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासह शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आगामी निवडणुकीत आमदारकी मिळविण्याच्या मोहोळ आणि घाटे यांच्या इच्छेला मुख्यमंत्री पावणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, कसब्यातील दुसरे इच्छुक हेमंत रासने हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या उत्सवाचे प्रमुख आहेत. कसब्यातून तिसऱ्या इच्छुक असणाऱ्या महापौर मुक्ता टिळक आहेत. मुख्यमंत्री केसरीवाड्यातील मानाचा पाचवा गणपती उत्सवालाही भेट देणार आहेत. म्हणून कसब्यातील कोणत्या इच्छुकाला मुख्यमंत्री पावणार अश...
बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दणका,अटक होण्याची शक्यता! 
राजकारण

बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा दणका,अटक होण्याची शक्यता!

नवी दिल्ली (लोकमराठी) - राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे.त्यामुळे,आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या आदेशामध्ये हस्तक्षेप करायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.त्यामुळे,अजित पवार यांना लवकरच अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अत्यंत मनमानी पद्धतीने केलेल्या कर्जवाटपामुळे बँकेला 10 हजार कोटींचा फटका बसला होता.या घोटाळ्याप्रकरणी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे तीन वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. यानंतर, त्यावर चौकशी समिती नेमली गेली होती.त्याच्या अहवालनंतर कोर्टानं गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.त्यानंतर,सुप्रीम कोर्टाने दणका देत राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी मुं...
तोपर्यंत फेटा बांधणार नाही; राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंचा निर्धार
राजकारण

तोपर्यंत फेटा बांधणार नाही; राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंचा निर्धार

बीड, ता. २५ (लोकमराठी) : बीड जिल्ह्यातील परळी आणि केजमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार निवडून येत नाही, तोपर्यंत बीड जिल्ह्यात आल्यावर फेटा बांधणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची राज्यात शिवस्वराज्य यात्रा सुरु असून या यात्रेनिमित्त आंबेजोगाई येथे आयोजित सभेत खासदार कोल्हे यांनी होते. शिवस्वराज्य यात्रा परळीहून अंबाजोगाईला आली असता, परळी आणि केज मतदारसंघात आमचे आमदार जोपर्यंत निवडून येणार नाहीत तोपर्यंत फेटा बांधणार नाही. तसेच जेव्हा आमदार होतील त्याचवेळी या व्यासपीठावर येऊन फेटा बांधेन, असे विधान खासदार अमोल कोल्हे यांनी आयोजित सभेत केले. राष्ट्रवादीच्या आमदार नमिता मुंदडा यांनी फेटा बांधण्यास घेतला असता त्यास नकार देत कोल्हे यांनी वरील निर्धार व्यक्त केला. दरम्यान, विध...
मोठी बातमी, राजकारण

खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर?

मुंबई (लोकमराठी) : साताऱ्याचे खासदार उदयनराजेंच्या भेटी नंतर मुख्यमंत्र्यांकडून शिवेंद्रराजेंना भेटीचे निमंत्रण देण्यात आले असून शिवेंद्रराजे वर्षावर दाखल झाले आहेत. उदयनराजेंच्या उपद्रवाचे कारण देत काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजंनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम-राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. उदयनराजे आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या भेटीत उदयनराजेंच्या राजीनाम्यानंतर विधानसभा आणि लोकसभेची पोट निवडणूक एकत्रित घेण्याची मागणी उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे सांगण्यात येत आहे. उदयनराजेंचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीनही राजेंना गमावणार हे जवळपास निश्चित आहे. दरम्यान, शिवेंद्रराजेंनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला असून रामराजे नाईक निंबाळकरही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याचे बोलेले जात आहे. वर्षावरील झालेल्या बैठकीनंतर उदय...
वडार समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात करावा : संतोष मोहिते; वडार समाजाचा युतीला पाठिंबा
पुणे, राजकारण

वडार समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात करावा : संतोष मोहिते; वडार समाजाचा युतीला पाठिंबा

पुणे : निती आयोगाच्या शिफारशीनुसार वडार समाजाचा समावेश एसटी प्रवर्गात करावा. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जसे की, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदा, नगरपालिका, महानगरपालिका आणि पीडब्ल्यूडीमध्ये वडार समाजाच्या मजूर सहकारी संस्थांना 10 टक्के कामे विनास्पर्धा देण्याचा निर्णय शासन स्तरावर घेण्यात आला आहे. त्याची कटाक्षाने अंमलबजावणी व्हावी. 17 डिसेंबर 2018 ला सोलापूर येथे तसेच वडार समाजाच्या मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केले होते की, ज्या ठिकाणी वडार बांधव शासकीय जमिनीवर, पड व मुलकी जमिनीवर राहत आहेत त्यांना कायमस्वरूपी त्या जागेची प्रॉपर्टी कार्ड देण्यात येईल. घर बांधणीसाठी पंतप्रधान आवास योजनेतून 2.5 लाखांचे अनुदान तसेच कामगार कल्याण महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून 2 लाख रुपयांचे अनुदान असे एकूण साडेचार लाख रुपयांचे अनुदान जाहिर केले होते. युती स...
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड, राजकारण

सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा : लोकशाही बचाव समिती

पिंपरी चिंचवड : 2014च्या निवडणुकीमध्ये भाजप सेना युतीने आपल्या जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन मोदी सरकार पूर्ण करू शकले नाही. सुरु असणा-या लोकसभा निवडणुकीत या विषयी एकही शब्द न काढता विनाकारण नको ते मुद्दे उपस्थित करून सर्वसामान्य मतदारांची दिशाभूल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. 2014मध्ये त्यांनी दिलेल्या जाहिरनाम्यावर विश्वास ठेवून देशभरातील जनतेने त्यांना एकहाती सत्ता दिली होती. मात्र आता जनतेचा त्यांच्यावरील विश्वासच उडाला आहे. असा सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप सेना युतीला सुज्ञ मतदारांनी पराभूत करावे, असे आवाहन लोकशाही बचाव समितीचे समन्वयक मानव कांबळे यांनी पिंपरी येथे केले. लोकशाही बचाव समितीच्या वतीने पिंपरीमध्ये शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी माजी नगरस...