महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल – काँग्रेसचे युवा नेते रवि नांगरे
काळेवाडी : केंद्र सरकारने पेट्रोल-डीझेलच्या किमतीसह गॅस सिलेंडर व अन्नधान्यांचे भावही गगनाला भिडवले आहेत. तर शिक्षण गरीबांच्या आवाक्याबाहेर गेले असून महागाईने परिसीमा गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. असे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते तथा रॉयल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष रवि नांगरे यांनी येथे केले.
पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने महागाईच्या विरोधात “हाहा:कार” जनजागरण अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानिमित्त पेट्रोल-डिझेल, सिलेंडर तसेच अन्नधान्यांचे भाव कमी व्हावे. यासाठी काळेवाडी परिसरात पदयात्रा घेऊन जनजागृती करण्यात आली. त्यावेळी रवि नांगरे यांनी आपल्या प्रखर भाषणात सर्वसामान्यांचा आवाज बनून त्यांच्या मागण्यांना वाचा फोडली.
त्यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष व कामगार नेते डॉ. कैलास कदम, काँग्रेस पर्यावरण विभागाचे माज...