Tag: Maharashtra News

PIMPRI CAMP: डिलक्स मॉलमध्ये बनावट पेनड्राईव्ह, मेमरी कार्डची विक्री; तिघांवर गुन्हा दाखल
क्राईम

PIMPRI CAMP: डिलक्स मॉलमध्ये बनावट पेनड्राईव्ह, मेमरी कार्डची विक्री; तिघांवर गुन्हा दाखल

पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) - एका कंपनीच्या नावाचे बनावट पेनड्राईव्ह व मेमरी कार्ड विक्री करत असल्याप्रकरणी तिघांविरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात (Pimpri Police Station) कॉपी राईट कायद्यानुसार गुन्हा दाखरल करण्यात आला आहे. हा प्रकार येथील डिलक्य चौकतील डिलक्स मॉल (Delux Mall) येथे शनिवार (दि. १५) उघडकीस आला. याबाबत महेश विष्णु कांबळे (वय ४२, रा. जनवाडी, शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन कृष्णा अमराराम भाटी (वय २७, रा. १००३/ऐ, यशदा प्लोअरींग, पिंपरीगाव), मुकेशकुमार लालाराम (वय २८, सोनिगरा रेसिडेन्सी, नढेनगर, काळेवाडी) व राजेशकुमार ओबाराम चौधरी (वय २७, रा. २०२, अष्टविनायत बिल्डींग, नढेनगर, काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या कंपनीचे स्वामीत्य असलेल्या कंपनीचे बनावट पेनटड्राईव्ह व मेमरी कार्ड विक्री करताना आरोपी...
Pune Crime : पुणे जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात
पुणे, क्राईम

Pune Crime : पुणे जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात

पुणे, दि. १४ : जिल्हा परिषदेच्या (Pune ZP) बांधकाम विभागाकडील कामांची देयके मंजूर करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी कार्यकारी अभियंत्यासह उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यावर बंडगार्डन पोलिस (Bandgarden Police Station) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. कार्यकारी अभियंता बाबूराव कृष्णा पवार (वय ५७), उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय ५५) आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे अशी ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. पवार हे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात (दक्षिण) आणि अन्य दोघेजण दौंड शिरूर उपविभागात कार्यरत आहेत. ‘एसीबी’चे पोलिस उपअधीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासकीय ठेकेदार आहेत. त्यांना दौंड तालुक्यातील खुटबाव रस्ता ते गलांडवाडी पाणंद शिव रस्ता आणि गलांडवाडी मंदिर ते ज्...
Family disputes : पती-पत्नी जेव्हा मुलांसमोर भांडण करतात, त्याचा मुलांवर काय परिणाम होतो?
विशेष लेख

Family disputes : पती-पत्नी जेव्हा मुलांसमोर भांडण करतात, त्याचा मुलांवर काय परिणाम होतो?

पती-पत्नी यांचे एकमेकांशी असलेले संबंध घरातील वातावरणावर मोठा परिणाम करतात. जेव्हा हे दोन्ही सहकारी आपसात भांडतात, तर त्याचा थेट मुलांवर परिणाम होतो. मुलांच्या मनोविकासात आणि भावनिक स्थितीत असं महत्त्वाचं बदल घडवू शकतो. यावर विचार करताना, मुलांवर होणाऱ्या परिणामांचे विविध पैलू समजून घेणं महत्त्वाचं आहे. १. भावनिक असुरक्षितता मुलं आपली सुरक्षा, प्रेम आणि संरक्षण यासाठी पालकांवर अवलंबून असतात. जेव्हा पती-पत्नी एकमेकांशी वाद घालतात, तर मुलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. मुलं आपल्याला घरात सुरक्षितता नाही असं समजू शकतात, ज्यामुळे त्यांचं मानसिक ताण वाढतो. २. चिंता आणि ताण भांडणामुळे मुलांना मानसिक ताण आणि चिंता निर्माण होऊ शकते. त्यांना पालकांच्या भांडणामुळे त्यांचं भविष्य, घराचं वातावरण आणि इतर गोष्टींविषयी भीती वाटू शकते. हे मुलांच्या दैनंदिन जीवनात नक...
PIMPRI CHANCHWAD : उताऱ्यात नोंद लावण्यासाठी चार लाखांची लाच; मंडलाधिकारी अटकेत
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड

PIMPRI CHANCHWAD : उताऱ्यात नोंद लावण्यासाठी चार लाखांची लाच; मंडलाधिकारी अटकेत

पिंपरी : बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी चार लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या मंडलाधिकाऱ्याला विशेष न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Pune) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि. ४) चिंचवड येथील मंडलाधिकारी कार्यालयात ही कारवाई केली. सुरेंद्र साहेबराव जाधव (५६) असे अटक केलेल्या मंडलाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी वाल्हेकरवाडी येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने वाल्हेकरवाडी येथे सहा गुंठे जागा घेऊन बंगल्याचे बांधकाम केले होते. या बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव यांनी पाच लाख रुपयांची लाचेची मागणी केली होती. तडजोडीनंतर लाच ४ लाख ५० हजार रुपयांपर्यंत आली. दरम्यान, मंगळवारी (दि. ४) मंडला...
MUMBAI:प्रतिज्ञापत्रासाठी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ…
महाराष्ट्र

MUMBAI:प्रतिज्ञापत्रासाठी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ…

मुंबई :- राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच नागरिकांना मोठा दिलासा दिला. आता शासकीय कामासाठी, प्रमाणपत्रासाठी मुद्रांक शुल्क भरण्याचा ताप कमी झाला आहे. अनेक प्रमाणपत्रासाठी नागरिकांना प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. यापूर्वी राज्य सरकारने 500 रुपयांचे प्रतिज्ञापत्र सादर करणे अनिवार्य केले होते. त्याशिवाय प्रमाणपत्र दिले जात नव्हते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिज्ञापत्रासाठी 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, पालक आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उत्पन्नाचा दाखल, जात पडताळणी प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्रासह इतर अनेक प्रमाणपत्रासाठी 500 रुपये प्रत्येकी लागत होते. म्हणजे केवळ मुद्रांक शुल्कापोटीच विद्यार्थ्यांना वर्षाला 2 हजारांहून अधिकचा खर्च येत होता. पण आता हा खर्च वाचणार आहे. 500 रुपयांचे मुद्रांक...
GB म्हणजे किती; संपूर्ण माहिती
विशेष लेख

GB म्हणजे किती; संपूर्ण माहिती

तंत्रज्ञानाच्या युगात डेटा, स्टोरेज आणि इंटरनेट स्पीड याबाबत अनेक वेळा १ जिबी (GB) हा शब्द आपण ऐकतो. पण १ जिबी म्हणजे नक्की किती आणि त्याचा आपल्या डिजिटल जगतात काय उपयोग होतो, याबाबत जाणून घेऊया. १ जिबी म्हणजे किती बाइट्स? GB म्हणजे गिगाबाइट (Gigabyte), जो डिजिटल स्टोरेज किंवा डेटा ट्रान्सफरचे प्रमाण मोजण्यासाठी वापरला जातो. मापन प्रमाण: 1 बाइट (Byte) = 8 बिट्स (Bits) 1 KB (किलोबाइट) = 1,024 बाइट्स 1 MB (मेगाबाइट) = 1,024 KB 1 GB (गिगाबाइट) = 1,024 MB याचा अर्थ,1 GB = 1,024 MB = 1,048,576 KB = 1,073,741,824 बाइट्स (सुमारे 1 अब्ज बाइट्स)! १ जिबीमध्ये काय स्टोअर करता येईल? १ GB डेटा म्हणजे किती मोठा? हे समजण्यासाठी काही उदाहरणे पाहूया: व्हिडिओ: साधारण १ जिबीमध्ये १ तासाचा 720p HD व्हिडिओ स्टोअर करता येतो. Full HD (1080p) व्हिडि...
AADHAR केवायसी करताना ओटीपी येत नाही; असू शकतात ही कारणे
विशेष लेख

AADHAR केवायसी करताना ओटीपी येत नाही; असू शकतात ही कारणे

लोकमराठी न्यूज नेटवर्क : आधार Aadhar केवायसी करताना ओटीपी न येण्याची अनेक कारणं असू शकतात. काही संभाव्य कारणं आणि त्यांचे निराकरण खालीलप्रमाणे आहेत: १. मोबाईल नंबर: आधार कार्डमध्ये नोंदणीकृत मोबाईल नंबर: तुम्ही जो मोबाईल नंबर वापरत आहात तो आधार कार्डमध्ये नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. ओटीपी केवळ नोंदणीकृत मोबाईल नंबरवरच पाठवला जातो. मोबाईल नंबर चालू असणे: तुमचा मोबाईल नंबर चालू असणे आणि त्यावर नेटवर्क उपलब्ध असणे आवश्यक आहे. SMS सेवा: तुमच्या मोबाईल नंबरवर SMS सेवा सुरू असणे आवश्यक आहे. २. नेटवर्क समस्या: तुमच्या परिसरात खराब नेटवर्क असल्यास ओटीपी येण्यास विलंब होऊ शकतो किंवा ओटीपी येऊ शकत नाही. नेटवर्कमध्ये व्यत्यय: तुमच्या टेलिकॉम ऑपरेटरच्या नेटवर्कमध्ये काही समस्या असल्यास ओटीपी delivery मध्ये अडचण येऊ शकते. ३. UIDAI सर्व्हर समस्या: UIDAI सर्व्हर डाउन: UIDAI सर्व्हर डाउन...
पत्रकारांनी बातमी करताना कोणाच्याही दबावाला बळी पडता कामा नये : अशोकराव वानखेडे
पुणे

पत्रकारांनी बातमी करताना कोणाच्याही दबावाला बळी पडता कामा नये : अशोकराव वानखेडे

न्यूज १८ चे पत्रकार गोविंद वाकडे यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड पुणे : पत्रकारांनी आपल्या बातमी ला न्याय देताना कधीही राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडता कामा नये. तसेच सुड बुद्धीने आपण पत्रकारिता करत नसेल तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. असे मत ऑल इंडिया जरनालिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार पदाधिकारी निवड करताना व्यक्त केले. न्यूज १८ चे पत्रकार गोविंद वाकडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकारी यांची निवड आणि सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी वानखेडे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक हेमंत जोशी उपस्थित होते . यावेळी हेमंत जोशी यांनी सर्वसामान्य जनतेला आपल्या पत्रकारितेचा फायदा झाला पाहिजे. तसेच ग्रामीण भागातील चित्र सर्वच माध्यमांनी पुढे आणले पाहिजे. सध्या नको त्या गोष्टी दाखवण्याची स्पर्ध...
श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुल, घारगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 
शैक्षणिक

श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुल, घारगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अहिल्यानगर, दि. २६ : श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुल व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान व कृषी ग्राम विकास प्रतिष्ठान घारगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. निंबाळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेसात वाजता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. आजच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे किसनराव तात्या पानसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बाळासाहेब पानसरे यांनी भूषविले. झेंड्याला सलामी देत फॅशन डिझाईनच्या मुली यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत स्वागत गीताची लयबद्ध गुंफण घातली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सहविचार सभेचे प्रस्ताविक शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मच्छिंद्र गोंटे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व स्पष्ट करत कार्यक...
‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार…
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार…

लोकमराठी न्यूज नेटवर्क : महायुती सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना असलेल्या "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत ज्या महिलांना मिळाला नाही, त्यांच्यापर्यंत लाभ पोहचवण्यासाठी ही मुदतवाढ देणात आली आहे. आता महाराष्ट्रातील महिलांना मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत (Ladki Bahin Yojana) अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 ही नवीन मुदत दिली आहे. यापूर्वी या योजनेत अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती. आता 15 ऑक्टोबर 2024 रात्री बारा वाजेपर्यंत या योजनेत अर्ज करता येणार आहे. मात्र हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच भरावे लागणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत ग्रामीण भागापासून शहरापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला होता. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यामुळे सरकारने अ‍ॅप आ...