खराब वातावरणामुळे बळीराजा संकटात
ज्योत्स्ना राणे
राज्यात गेल्या काही दिवसांपासुन बळीराजा चांगलाच संकटात सापडला आहे. गेल्या दोन दिवसापासुन वातावरणात मोठा बद्दल झाला आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाले असुन धुके पडु लागले आहे. शेतकर्यांना शेती पिकांवर औषध फवारणी करण्याची वेळ आलेली आहे.
द्राक्ष बागाही अडचणीत आल्या असुन पहाटेपासुन द्राक्ष उत्पादक शेतकरी वर्ग औषध फवारणी करु लागला आहे. काद्यांवरही मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने औषध फवारणी करावी लागत आहे. सध्याच्या वातावरणाची परिस्थिती पाहता करपा रोगाची धास्ती शेतकर्यांना आहे. त्यामुळे शेती पिकीवर करपा रोग येऊ नये, यामुळे मोठ्या प्रमाणात औषधी फवारणी करावी लागते. परिणामी अधिकचा खर्च शेतकर्यांना करण्याची वेळ आली आहे. त्यातच हवामाव खात्याकडुन राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या अडचणीत वाढ होण...