मोठी बातमी

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संसदेच्या संरक्षणविषयक सल्लागार समितीवर नियुक्ती
मोठी बातमी, राष्ट्रीय

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संसदेच्या संरक्षणविषयक सल्लागार समितीवर नियुक्ती

नवी दिल्ली, (लोकमराठी) : भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संरक्षणविषयक सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे, इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे. एकूण 21 सदस्यांची ही समिती आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत. प्रज्ञा ठाकूर यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा भोपाळमध्ये पराभव केला होता. सध्या त्यांच्यावर बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्ह्यांची प्रकरणे आहेत....
मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी व्यवस्था कार्यरत; शासन निर्णय निर्गमित
महाराष्ट्र, मोठी बातमी

मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी व्यवस्था कार्यरत; शासन निर्णय निर्गमित

मुंबई, (लोकमराठी) : मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना मदतीपासून वंचित रहावे लागू नये यासाठी ही व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असेपर्यंत गरजू रुग्णांना त्यांच्या उपचार व शस्त्रक्रियेकरिता आर्थिक सहाय्य देण्याबाबत ही यंत्रणा कार्य करेल. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला. सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, जीवनदायी भवन, दुसरा मजला, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय आवार (ESIS Hospital Compound), गणपतराव जाधव मार्ग, वरळी नाका, वरळी, मुंबई – ४०००१८, दुरध्वनी – ०२२-२४९९९२०३/०४/०५ याठिकाणी गरजूंनी आपले अर्ज सादर करावेत, असे कळविण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे महात्मा ज्योत...
शहरात सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा, महापालिका आयुक्तांचा निर्णय
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

शहरात सोमवारपासून दिवसाआड पाणीपुरवठा, महापालिका आयुक्तांचा निर्णय

पिंपरी, (लोकमराठी) : पिंपरी चिंचवड शहरवाशीयांसाठी समन्यायी पाणीवाटप करणेकरीता महापौर राहूल जाधव यांचे अध्यक्षतेखाली आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे दालनामध्ये बैठक आयोजित करणेत आली होती. आयुक्त यांनी निमत्रित केलेल्या या बैठकीमध्ये सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, प्रविण लडकत, रविंद्र पवार, संदेश चव्हाण, दत्तात्रय रामुगडे आदी उपस्थित होते. आयुक्त यांचे दालनात झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने आयुक्त यांनी समन्यायी पाणी वाटपाबाबत घ्यावयाच्या धोरणांबाबत व करावयाच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. पिंपरी चिंचवड शहरासाठी सद्यस्थितीत ५०० एमएलडी पाणी उचलण्यात येत असून शहरामध्ये समन्यायी पाणी वाटप करण्यासाठी जेएनएनयूआरएम अंतर्गत २४x७ पाणीपुरवठा योजना तसेच अमृत योज...
मोशीतील प्रिन्सविले बिल्डरवर कारवाई
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

मोशीतील प्रिन्सविले बिल्डरवर कारवाई

पिंपरी, (लोकमराठी) : डेंग्यू डास उत्पत्तीच्या ठिकाणांची तपासणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत असून ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत मोशी बो-हाडेवाडी येथील प्रिन्सविले या बांधकाम व्यावसायिकाच्या लेबर कॅम्प परिसरात डेंग्यू सदृश्य आळ्या निदर्शनास आल्याने त्यावर आवश्यक फवारणी करण्यात आली व पंचवीस हजार रुपये दंडाची कारवाई नुकतीच करण्यात आली. डेंग्यू डास उत्पत्तीच्या ठिकाणी फवारणी व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी दिल्या आहेत. मंगळवार (दि. १२) रोजी क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी बी.बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर.एम. भोसले, आरोग्य निरीक्षक व्ही.के. दवाळे, राजेंद्र उज्जैनवाल, वैभव कांचन गौडार, सचिन जाधव, संपत भोईटे यांच्या पथकामार्फत का...
भारतीय जनता पार्टीला 700 कोटींचा ‘पार्टी फंड’
मोठी बातमी, राष्ट्रीय

भारतीय जनता पार्टीला 700 कोटींचा ‘पार्टी फंड’

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीला (भाजप) एका वर्षात तब्बल 700 कोटी रुपयांचा पार्टी फंड मिळाला आहे. ऑनलाईन पेमेंट आणि चेकच्या माध्यमातून सन 2018-19 या आर्थिक वर्षात भाजपला पक्षनिधी म्हणून विविध संस्था आणि व्यक्तींकडून 700 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यापैकी जवळपास निम्मी रक्कम ही टाटाच्या अधिपत्याखालील इलेक्ट्रोल ट्रस्टकडून देण्यात आला आहे. भाजपानेच याबाबतची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. भाजप हा सध्या देशातील सर्वात मोठा पक्ष जगातील सर्वात मोठी पार्टी असल्याचा दावाही भाजपाकडून करण्यात येतो. त्यामुळेच, भाजपला मिळणारा निधीही कोट्यवधी रुपयांचा असतो. सन 2018-19 या आर्थिक वर्षात भाजपाला तब्बल 700 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. टाटा उद्योग समुहाशी संलग्नित इलेक्ट्रोल ट्रस्टकडून तब्बल 356 कोटी रुपयांचा निधी भाजपाला देण्यात आला आहे. तसेच, देशातील काही विश्वसनीय संस्थांकडूनही 54.25 कोट...
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर लिलावती रूग्णालयात उपचार सुरू
महाराष्ट्र, मोठी बातमी

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर लिलावती रूग्णालयात उपचार सुरू

मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर लिलावती रूग्णालयात अँजियोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या हृदयात 2 ब्लॉक असल्याचं निदान झालं. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. “काही दिवसांपूर्वी त्यांच्या काही चाचण्या झाल्या होत्या. तपासण्यांमधून त्यांच्या प्रकृतीत काही बदल झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉ. अजित मेनन यांच्या देखरेखीत त्यांना ठेवलं जाणार आहे. खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर असलेली जबाबदारी शिवसेनेचे नेते सुनील परब, मिलींद नार्वेकर आणि अनिल देसाई यांच्यावर सोपविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत संजय राऊत सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत. जवळपास रोज दोन-तीन पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजपला जेरीस आणले होते...
राज्यपालांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण
मोठी बातमी, महाराष्ट्र

राज्यपालांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण

मुंबई, (लोकमराठी) : शिवसेनेने मागितलेला अधिक वेळ राज्यपालांनी नाकारल्यानंतर आज रात्री राज्यपालांनी राष्ट्रवादीला राजभवनावर पाचारण केले. दरम्यान, आम्हाला का बोलावले, नेमके कशासाठी बोलावले आहे, हे माहित नाही. मात्र राज्यपालांचा फोन आल्याने आम्ही राजभवनावर जात आहोत,” असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील त्यानंतर राजभवनाकडे रवाना झाले. राज्यपालांनी शिवसेनेला केवळ २४ तासांची मुदत दिली होती, त्यामध्ये सगळ्या आमदारांच्या सह्या घेणे शक्य नाही. आता आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी बोलावल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले असून आम्ही काँग्रेसशी बोलून निर्णय घेणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत काँग्रेस अजूनही निर्णय घेऊ शकलेली नाही. त्यामुळे आज संध्याकाळी शिवसेनेने राज...
धक्कादायक ! महिला तहसीलदाराला कार्यालयातच जाळले
मोठी बातमी, राष्ट्रीय

धक्कादायक ! महिला तहसीलदाराला कार्यालयातच जाळले

हैदराबाद, (लोकमराठी) : तेलंगणमध्ये एका महिला तहसीलदाराला कार्यालयातच भरदिवसा जिवंत जाळण्याची भयानक घटना घडली आले. रंगा रेड्डी जिल्ह्यातील अब्दुलपूरमेट येथील या घटनेमागे जमिनीचा वाद असल्याचा पोलिसांचा संशय आहे. विजया रेड्डी (वय ३०) असे तहसीलदाराचे नाव असून यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघे होरपळून जखमी झाले. हल्लेखोरही होरपळून जखमी झाला आहे. कुरा सुरेश असे हल्लेखोराचे नाव असून, तो गोवेरेल्लीचा रहिवासी आहे. सोमवारी (दि. 4) दुपारी दीडच्या सुमारास त्याने तहसील कार्यालयात येऊन विजया रेड्डी यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. सुरेश हा शेतकरी असल्याचे कळते. बाचेरान या गावात त्याची सात एकर जमीन असून, ती त्याच्या भावाबरोबर वादात आहे. या संदर्भात न्यायालयात सुनावणीही सुरू आहे. त्यातून ही घटना घडल्याचा संशय राचेकोंडाचे पोलिस आयुक्त महेश भागवत यांनी...
अयोध्येत जमावबंदी आदेश लागू ; मीडिया डिबेट घेण्यासही मज्जाव
राष्ट्रीय, मोठी बातमी

अयोध्येत जमावबंदी आदेश लागू ; मीडिया डिबेट घेण्यासही मज्जाव

अयोध्या, (लोकमराठी) : अयोध्या (उत्तर प्रदेश) प्रकरणाची सुनावणी पुर्ण झाली असून सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी लागू शकतो. त्यामुळे या पार्श्वभूमीवर अयोध्येत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात पोलिसांनी शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन जनतेला केले आहे. अयोध्या प्रकरणावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. येत्या काही दिवसांत याविषयी निकाल अपेक्षित असल्यामुळे उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र सरकारने हा संवेदनशील विषय हाताळण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे आता शहर परिसरात नागिरकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे. तसेच कोणत्याही विषयावर मीडिया डिबेट घेण्यासही मज्जाव केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अंजू झा यांनी 31 ऑक्टोबर रोजी या संदर्भात आदेश दिले आह...
औरंगाबादमध्ये संपत्ती, बाई, दारूमुळे 215 खून
मोठी बातमी, महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये संपत्ती, बाई, दारूमुळे 215 खून

औरंगाबाद (लोकमराठी) : मागील पाच वर्षांत औरंगाबाद शहरात तब्बल 215 खुन झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यात आठ खून झाले असून, यातले बहुतांश खून मद्यपानामुळे झाले आहेत. अशा घटनांमुळे शहरात भितीचे वातावरण परले आहे. शहरात गाजलेले मानसी देशपांडे, श्रुती कुलकर्णी खून प्रकरण असो की, अलीकडे सातारा परिसर, उल्कानगरीत झालेला हायप्रोफाईल खून अथवा सप्टेंबर महिन्यात चौधरी कॉलनीत झालेले तिहेरी हत्याकांड या व अशा कित्येक घटनांनी औरंगाबादकरांच्या मनात भय उत्पन्न होत आहे. शहरात खुनाच्या घटनांत सातत्याने वाढ होत असून, ही बाब चिंताजनक आहे. जानेवारी ते एप्रिल 2019 या चार महिन्यांत बारा खून झाले. ही सरासरी असतानाच सप्टेबर महिन्यातच तब्बल आठ खून झाले. वर्चस्ववाद, गुंडगिरी, कौटुंबिक वाद, अनैतिक संबंध, आर्थिक व्यवहार, प्रेमप्रकरण, जमीन व्यवहार आदी कारणांमुळे खून होत असल्य...