मोठी बातमी

शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदार रोहित पवारांवर जहरी टिका
मोठी बातमी, राजकारण

शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा | भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदार रोहित पवारांवर जहरी टिका

https://youtu.be/DkZjycSXNN0 अहमदनगर : शरद पवार यांच्या खांद्यावर बसून मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या रोहित पवार यांनी खाली मतदारसंघात उतरावे व मतदारसंघातील कामावर लक्ष द्यावे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ले देत बसू नये,' अशी टिका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार रोहित पवारांवर केली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील मिरजगाव येथून जात असताना तेथील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून पडळकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला. त्यांनी खराब रस्त्यावर उभा राहून व्हीडिओ बनवला, व तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. गेल्या पन्नास वर्षापासून नेतृत्व करणारे शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. मी आज औरंगाबादला दौऱ्यानिमित्त चाललो असताना त्यांच्या मतदारसंघात प्रवेश केल्यापासून रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. रोहित ...
मोठी बातमी, ताज्या घडामोडी, महाराष्ट्र

#COVID-19: कर्जतमध्ये १३ आरोपीसह ४२ जण कोरोना बाधित

अहमदनगर : कर्जत तालुक्यात बुधवारी ४२ रूग्ण कोरोना (covid-19) सापडले आहेत. त्यामध्ये सबजेलमधील १३ आरोपींचा समावेश आहे. रविवारी (ता. २७) कर्जत पोलिस ठाण्यातील सात पोलिस तर राशीन पोलिस ठाण्यातील एक पोलिस कोरोना पॉझिटीव्ह आले होते. त्याअनुषंगाने सबजेलमधील १९ आरोपींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सहा आरोपी कोरोना निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, कर्जत तालुक्यात एकुण १३३३ कोरोना रूग्णांपैकी १०६२ रूग्ण बरे झाले असून २४८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आजतागायत २३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रूग्णांचा गावानुसार तपशील खालीलप्रमाणे : 1.कर्जत-04 2.दुरगाव-03 3.कुळधरण - 01 4.चापडगाव - 02 5. खांडवी- 01 6.नेटकेवाडी - 01 7.निमगाव गांगरडा-02 8.अळसूनदे-04 9.मिरजगाव-02 11.चिंचोली काळदात-02 12.राशीन-01 13.बहिरोबावाडी-02 14.रुईगव्हान-01 15.सितपु...
भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानं पत्रकाराला घरात घुसून मारहाण
ताज्या घडामोडी, मोठी बातमी, राष्ट्रीय

भाजपच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानं पत्रकाराला घरात घुसून मारहाण

आगरताळा : त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट केल्यानं एका पत्रकारावर हल्ला झाला आहे. बिप्लव देव यांच्यावर टीका करणारा व्हिडिओ फेसबुकवर टाकल्यानं पत्रकाराला मारहाण केल्याची घटना घडली आहे. जखमी पत्रकारावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू आहेत. त्रिपुरातल्या स्थानिक माध्यमांनी कोरोना काळातल्या असुविधांच्या बातम्या प्रसारित केल्या होत्या. त्याबद्दल मुख्यमंत्री देव यांनी एका कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली होती. माध्यमांना माफ करणार नाही, असं विधान त्यांनी केलं होतं. त्यानंतर एका पत्रकारानं त्यांच्यावर टीका केली होती. त्याच पत्रकाराला मारहाण झाली आहे. https://twitter.com/ndtv/status/1305210425336709126?s=19...
पिंपरी चिंचवड : प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे कोरोना रुग्ण व मृत्यू संख्येत वाढ – मारूती भापकर
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पिंपरी चिंचवड : प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे कोरोना रुग्ण व मृत्यू संख्येत वाढ – मारूती भापकर

कोरोनाबाबत गांभीर्याने विचार व तज्ञांशी चर्चा करून योग्य उपाययोजना कराव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली मागणी पिंपरी : शहरात कोरोना रुग्णसंख्या ६० हजारांवर गेली असून कोरोना बळींची संख्या एक हजारांहून अधिक झाली आहे. दिवसाला २० ते २५ रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. कोरोना रुग्ण संख्या कमी होण्याऐवजी अत्यंत वेगाने वाढतच आहे. याचे मुख्य कारण म्हणजे प्रशासनाचा गलथाण व भोंगळ कारभार आणि योग्य समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे कोरोना बाबत गांभीर्याने विचार व तज्ञांशी चर्चा करून योग्य उपाययोजना कराव्यात. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. भापकर यांनी निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोर...
तबलिघी जमातीला बनवल बळीचा बकरा | FIR रद्द करण्याचे न्यायालयाचे आदेश
मोठी बातमी, राष्ट्रीय

तबलिघी जमातीला बनवल बळीचा बकरा | FIR रद्द करण्याचे न्यायालयाचे आदेश

File Photo नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिल्लीतील निझामुद्दीन मरकझ प्रकरणातील तबलिघी जमातच्या (Tablighi Jamaat) देश आणि परदेशातील तबलिघींविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द केले आहेत. शनिवारी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. करोना काळात तबलिघी जमातीला बळीचा बकरा बनवण्यात आल्याचं निरीक्षणही न्यायालयानं यावेळी नोंदवल आहे. सोबतच चुकीचं वार्तांकन करणाऱ्या मीडियाला फटकारताना, या लोकांना फैलावलेल्या संक्रमणासाठी आरोपी ठरवण्याचा प्रोपोगंडा चालवण्यात आल्याचंही न्यायालयानं म्हटलंय. यावेळी, दिल्लीच्या मरकझमध्ये आलेल्या परदेशी लोकांविरुद्ध प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मोठा प्रोपोगंडा चालवण्यात आला. भारतात फैलावणाऱ्या कोविड १९ संक्रमणाचा जबाबदार हे परदेशी लोक आहेत, अशी वातावरण निर्मिती करण्यात आली. तबलिघी जमातीला बळीचा बकरा बनवण्यात आलं असं न्यायाल...
प्लाझ्मा थेरपी : कोरोनावर मात करण्यासाठी वरदान
मोठी बातमी, आरोग्य

प्लाझ्मा थेरपी : कोरोनावर मात करण्यासाठी वरदान

2020 हे साल संपूर्ण जगासासाठी कठीण संकटाचे आणि अडचणींचे ठरले आहे. या वर्षात कोरोना, लॉकडाऊन, क्वॉरंटाईन सारखे नववीन शब्द सामान्य माणसाच्या शब्दकोशात दाखल झाले. महाराष्ट्र शासन कोरोनावर मात करण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. आणि त्यात यशस्वी देखील झाला आहे. महाराष्ट्राने प्लाझ्मा उपचार करण्यास सुरुवात केली अहे. आपण प्रथमच ह्या प्लाझ्मा उपचाराचे नाव ऐकले असणार पण हा उपचार काही नवीन नाही. याचा शोध 130 वर्षां पूर्वी जर्मनीच्या फिजियोलॉजिस्ट एमिलवॉन बेह्रिंग यांनी लावला होता. यासाठी त्यांना नोबल पारितोषिकही देण्यात आले होते. वैद्यकीय क्षेत्रातील हे पहिलेच नोबेल पारितोषिक होते. संसर्गजन्य रोगांवर उपचार म्हणून अनेक दशकांपासून प्लाझ्मा थेरपीचा वापर केला जात आहे. यापूर्वी सार्स (2003) आणि मर्स (2012) मध्ये प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार केले गेले होते. कोरोना विषाणू देखील या प्रकारात येतात. 1918 मध्ये...
चांगल्या आरोग्य सुविधा देण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मोठी बातमी, महाराष्ट्र

चांगल्या आरोग्य सुविधा देण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : आरोग्य या विषयाकडे प्राधान्याने लक्ष दिले जाणार असून राज्यातील खेड्यापाड्यांमध्ये तसेच दुर्गम भागात उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा आणि वैद्यकीय सुविधा पोहोचण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त आज मंत्रालयात झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात १५० टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभे करणे हे या शासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, जे विकेल तेच पिकेल अशी शासनाची भूमिका आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला दर्जेदार अन्नधान्य मिळेल. शे...
संतापजनक : प्रदुषणाची बातमी प्रसिद्ध केल्याने जालन्यातील पत्रकारांवर गुन्हे दाखल
महाराष्ट्र, मोठी बातमी

संतापजनक : प्रदुषणाची बातमी प्रसिद्ध केल्याने जालन्यातील पत्रकारांवर गुन्हे दाखल

पत्रकारांना हेतुपुरस्सर गुन्ह्यात अडकावणाऱ्या पोलीस अधिकारी व प्रदुषण महामंडळ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई कारवाईची एनयुजे महाराष्ट्रची मुख्यमंत्र्यांकडे मागणी जालना : प्रदुषणाची बातमी प्रसिद्ध केल्याने येथील दैनिक गोकुळनीतीचे संपादक अर्पण गोयल, दैनिक तात्काळ राज्यवार्ताचे संपादक भरत मानकर यांचेसह चार पत्रकारांवर गुन्हे दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आकसाने गुन्हे दाखल केल्याबद्दल जालन्यासह राज्यभरातील पत्रकारांनी या कृत्याचा कठोर निषेध केला आहे. हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील अत्याचार असून ज्यांनी हे चुकीचे कृत्य केले आहे. त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच जालन्यातील प्रदुषण तातडीने थांबवावे अशी आग्रही मागणी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ए...
२८ स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर तो बनला नायब तहसीलदार | दुर्गम भागातील नकुल पोळेकरच्या प्रयत्नाला अखेर यश
पुणे, मोठी बातमी

२८ स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर तो बनला नायब तहसीलदार | दुर्गम भागातील नकुल पोळेकरच्या प्रयत्नाला अखेर यश

पुणे : वेल्हे तालुक्यातील अति दुर्गम भागातील ठाणगाव येथे राहणाऱ्या नकुल शंकर पोळेकर याने १६ पूर्व आणि १२ मुख्य परीक्षा, २ मुलाखती दिल्या. तरीही पदरात अपयश पडत होते. मात्र, प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर यावेळी त्याला नायब तहसीलदार हे पद मिळाले आहे. गावात शिक्षणाची सोय नसल्यामुळे नकुलचे प्राथमिक शिक्षण पानशेत जवळील रुळे या गावातील जिल्हा प्राथमिक शाळेत त्याच्या मामाकडे झाले. प्राथमिक शिक्षणानंतर पुढील शिक्षण पुण्यात भारती विद्यापीठात झाले. पुढे पदवीचे शिक्षण अभियांत्रिकी शाखेत झाले. पदवी झाल्यावर जवळपास ६ महिने त्याने एका खाजगी कंपनीत नोकरी देखील केली. मात्र, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करावा आणि त्यातून प्रशासनात जाऊन प्रत्यक्ष लोकहितासाठी आपण अधिकारी म्हणून काम करावे असे त्याला सतत वाटत होते. शेवटी जून २०१६ ला निर्णय घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली. स्पर्धा परिक्षेचा हा प्रवा...
वंदेभारत अभियानांतर्गत ८२ विमानांनी १३ हजार ४५६ प्रवासी मुंबईत दाखल
राष्ट्रीय, मोठी बातमी

वंदेभारत अभियानांतर्गत ८२ विमानांनी १३ हजार ४५६ प्रवासी मुंबईत दाखल

मुंबई : वंदेभारत अभियानांतर्गत 82 विमानांतून तब्बल 13 हजार 456 प्रवासी मुंबईत दाखल झाले असून ते विविध देशातून मुंबईत आले आहेत. 1 जुलै, 2020 पर्यंत आणखी 76 विमानांनी प्रवासी मुंबईत येणार आहेत. आलेल्या एकूण 13 हजार 456 प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 4 हजार 989 इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 4 हजार 364 आहे तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 4 हजार 103 इतकी आहे. आलेल्या सर्व प्रवाशांना महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या दिनांक 24 मे, 2020 च्या मार्गदर्शक सुचनेनुसार क्वारंटाईन करण्यात येत आहे. आलेले प्रवासी हे विविध देशांमधून आले आहेत त्यामध्ये ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार...