विशेष लेख

पंधरा वर्षांनंतर महाराष्ट्राने निवडला मुस्लीम खासदार
विशेष लेख

पंधरा वर्षांनंतर महाराष्ट्राने निवडला मुस्लीम खासदार

कामिल पारखे पाच वर्षांपूर्वी औरंगाबादमधून एमआयएमतर्फे महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आल्यावर इम्तियाज जलील यांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता, तसाच किंबहुना त्याहून अधिक मोठा धक्का त्यांनी यावेळी लोकसभेवर निवडून येण्याचा पराक्रम केल्यामुळे दिला आहे. जलील यांच्या रूपाने महाराष्ट्राने प्रदीर्घ काळाने म्हणजे पंधरा वर्षानंतर एक मुस्लीम नेता लोकसभेत पाठवला आहे. याआधी काँग्रेसचे नेते अब्दुल रहेमान अंतुले कोकणातील त्याकाळच्या कुलाबा या मतदारसंघातून चार वेळेस लोकसभेला निवडून गेले होते. औरंगाबादने एक मुस्लीम आमदार देण्याची परंपरा अनेक वर्षांपासून जपली आहे. १९८०च्या दशकाच्या अखेरीस औरंगाबादला लोकमत टाइम्समध्ये असताना या ऐतिहासिक शहराची मला ओळख झाली. त्याकाळात डॉ. रफिक झकेरिया हे औरंगाबादमधील मोठे राजकीय प्रस्थ होते. अनेक शैक्षणिक संस्था त्यांनीं तेथे उघडल्या ...
मोठी बातमी, विशेष लेख

जात हीच एक अंधश्रद्धा

Lok Marathi News Network सन १२ व्या शतकात महात्मा बसवण्णा यांनी चांभार समाजातील शीलवंत आणि ब्राम्हण समाजातील कल्याणी यांचा आंतरजातीय विवाह लावून दिला. ब्राम्हण असलेल्या गणेश आणि महार असलेल्या सारजा यांनी प्रेम केल्याबद्दल गावातील लोकांनी त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा सावित्रीबाई फुल्यांनी त्यांना वाचवून आश्रय दिला. ही घटना १८६८ सालातली. राजर्षि शाहू महाराजांनी तर आपली चुलत बहीण चंद्रप्रभाबाई यांचा विवाह धनगर असणाऱ्या यशवंतराव होळकर यांच्याशी निश्चित केला. एवढेच नाही तर असे १०० आंतरजातीय विवाह घडवून आणण्याचा त्यांनी संकल्प केला होता. त्यापैकी २५ विवाह त्यांनी पार पाडले. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनीही जात निर्मूलनासाठी आर्थिक स्वातंत्र्य, धर्म ग्रंथांची चिकित्सा आणि आंतरजातीय विवाह अशी त्रिसूत्री सांगितली होती. महात्मा गांधीजीही आपल्या उत्तर आयुष्यात फक्त आंतरजातीय विवाह असेल ...
राजद्रोह कलम आणि त्याची कालबाह्यता ( treason section and its expiration )
विशेष लेख

राजद्रोह कलम आणि त्याची कालबाह्यता ( treason section and its expiration )

17 व्या लोकसभेची निवडणूक आता रंगतदार टप्प्यात आली आहे. निवडणुकीमध्ये मतदारांना भविष्यातील दिशा सांगण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांकडून त्यांचा जाहीरनामा केला जातो. treason section and its expiration कलम 124 अ रद्द करण्यासंबंधी सूतोवाच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सध्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. सदर जाहिरनाम्यामद्धे ध्येय धोरणाच्या दृष्टीने अनेक गोष्टींचा अंतर्भाव केला असला तरी प्रामुख्याने राहुल गांधी यांनी भारतीय दंड विधानात कलम 124 अ रद्द करण्यासंबंधी सूतोवाच केले आहे. त्यावर तात्काळ भाजपाने सदर कलम रद्द करण्याची केलेली घोषणा 'धोकादायक कल्पना' अशी टीका केली आहे. त्यामुळे भारतीय दंडविधानातील कलम 124 अ हे पुन्हा राजकीय दृष्ट्या चर्चेत आलेले आहे. एकदम हे कलम नेमकं काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. भारतीय दंडविधानाची निर्मिती 1860...