महाराष्ट्र

राजकीय भूकंप : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
मोठी बातमी, महाराष्ट्र, राजकारण

राजकीय भूकंप : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

मुंबई (लोकमराठी) : आज सकाळी राज्यात मोठा भूकंप झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली असून शिवसेनेचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न मावळले आहे. दरम्यान, आज राजभवनात हा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी आपले व्टिटर आकाऊंटवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांनी पुन्हा एकदा मला राज्याची सेवा करण्याची संधी दिली. राज्याच्या जनादेशाला नकारात शिवसेनेने दुसरीकडे आघाडी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती शासन लागू झालं. राज्यात अनेक प्रश्न आज उभे आहेत. त्यांच्यामुळे आज राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे, अशी प्रतिक्रि...
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी संकल्प करावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
महाराष्ट्र

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी संकल्प करावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई (लोकमराठी) : प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. यापुढील तीन वर्षात 7 लाख घरांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संकल्प करावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. आवास दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात श्री.कोश्यारी बोलत होते. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य घरकुल योजनेमध्ये उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ग्राम विकास विभागाच्या राज्य व्यवस्थापन कक्षामार्फत गौरव करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव मनिषा वर्मा, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी आदी यावेळी उपस्थित होते. राज्यपाल श्र...
मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी व्यवस्था कार्यरत; शासन निर्णय निर्गमित
महाराष्ट्र, मोठी बातमी

मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी व्यवस्था कार्यरत; शासन निर्णय निर्गमित

मुंबई, (लोकमराठी) : मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदतीसाठी तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील गरजू रुग्णांना मदतीपासून वंचित रहावे लागू नये यासाठी ही व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असेपर्यंत गरजू रुग्णांना त्यांच्या उपचार व शस्त्रक्रियेकरिता आर्थिक सहाय्य देण्याबाबत ही यंत्रणा कार्य करेल. यासंदर्भातील शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला. सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, जीवनदायी भवन, दुसरा मजला, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय आवार (ESIS Hospital Compound), गणपतराव जाधव मार्ग, वरळी नाका, वरळी, मुंबई – ४०००१८, दुरध्वनी – ०२२-२४९९९२०३/०४/०५ याठिकाणी गरजूंनी आपले अर्ज सादर करावेत, असे कळविण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे महात्मा ज्योत...
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर लिलावती रूग्णालयात उपचार सुरू
महाराष्ट्र, मोठी बातमी

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर लिलावती रूग्णालयात उपचार सुरू

मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर लिलावती रूग्णालयात अँजियोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या हृदयात 2 ब्लॉक असल्याचं निदान झालं. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. “काही दिवसांपूर्वी त्यांच्या काही चाचण्या झाल्या होत्या. तपासण्यांमधून त्यांच्या प्रकृतीत काही बदल झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉ. अजित मेनन यांच्या देखरेखीत त्यांना ठेवलं जाणार आहे. खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर असलेली जबाबदारी शिवसेनेचे नेते सुनील परब, मिलींद नार्वेकर आणि अनिल देसाई यांच्यावर सोपविण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत संजय राऊत सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत. जवळपास रोज दोन-तीन पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजपला जेरीस आणले होते...
राज्यपालांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण
मोठी बातमी, महाराष्ट्र

राज्यपालांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण

मुंबई, (लोकमराठी) : शिवसेनेने मागितलेला अधिक वेळ राज्यपालांनी नाकारल्यानंतर आज रात्री राज्यपालांनी राष्ट्रवादीला राजभवनावर पाचारण केले. दरम्यान, आम्हाला का बोलावले, नेमके कशासाठी बोलावले आहे, हे माहित नाही. मात्र राज्यपालांचा फोन आल्याने आम्ही राजभवनावर जात आहोत,” असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील त्यानंतर राजभवनाकडे रवाना झाले. राज्यपालांनी शिवसेनेला केवळ २४ तासांची मुदत दिली होती, त्यामध्ये सगळ्या आमदारांच्या सह्या घेणे शक्य नाही. आता आम्हाला सरकार स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी बोलावल्याचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले असून आम्ही काँग्रेसशी बोलून निर्णय घेणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. शिवसेनेला पाठींबा देण्याबाबत काँग्रेस अजूनही निर्णय घेऊ शकलेली नाही. त्यामुळे आज संध्याकाळी शिवसेनेने राज...
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे ६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
महाराष्ट्र

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे ६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे मुख्य सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई, (लोकमराठी) : अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या कामांना गती देऊन 6 नोव्हेंबरपर्यंत मिशन मोडमध्ये ते पूर्ण करण्याचे निर्देश, मुख्य सचिव अजोय मेहता यांनी आज येथे दिले. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. जिल्हानिहाय कृषीक्षेत्राचे किती नुकसान झाले याची त्यांनी माहिती घेतली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पंचनाम्याच्या कामांना गती देतानाच ते अचूक होतील याकडेही लक्ष द्यावे, अशी सूचना मुख्य सचिवांनी केली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने 10 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्याच्या वाटपासाठी पंचनामे वेळेत होणे आवश्यक असल्याचे मुख्य सचिवांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देताना मुख्य सचिव म्हणाले, ...
औरंगाबादमध्ये संपत्ती, बाई, दारूमुळे 215 खून
मोठी बातमी, महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये संपत्ती, बाई, दारूमुळे 215 खून

औरंगाबाद (लोकमराठी) : मागील पाच वर्षांत औरंगाबाद शहरात तब्बल 215 खुन झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या वर्षी सप्टेंबर महिन्यात आठ खून झाले असून, यातले बहुतांश खून मद्यपानामुळे झाले आहेत. अशा घटनांमुळे शहरात भितीचे वातावरण परले आहे. शहरात गाजलेले मानसी देशपांडे, श्रुती कुलकर्णी खून प्रकरण असो की, अलीकडे सातारा परिसर, उल्कानगरीत झालेला हायप्रोफाईल खून अथवा सप्टेंबर महिन्यात चौधरी कॉलनीत झालेले तिहेरी हत्याकांड या व अशा कित्येक घटनांनी औरंगाबादकरांच्या मनात भय उत्पन्न होत आहे. शहरात खुनाच्या घटनांत सातत्याने वाढ होत असून, ही बाब चिंताजनक आहे. जानेवारी ते एप्रिल 2019 या चार महिन्यांत बारा खून झाले. ही सरासरी असतानाच सप्टेबर महिन्यातच तब्बल आठ खून झाले. वर्चस्ववाद, गुंडगिरी, कौटुंबिक वाद, अनैतिक संबंध, आर्थिक व्यवहार, प्रेमप्रकरण, जमीन व्यवहार आदी कारणांमुळे खून होत असल्य...
घड्याळाचे बटन दाबले तरी मतदान कमळाला 
महाराष्ट्र, मोठी बातमी

घड्याळाचे बटन दाबले तरी मतदान कमळाला

मशिनमध्ये बिघाड झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी केले मान्य सातारा (लोकमराठी) : सातारा जिल्ह्यातील नवलेवाडी (ता. खटाव) येथील मतदान केंद्रावर कोणतेही ईव्हीएम मशिनचे कोणतेही बटन दाबले दाखल तरी मतदान कमळाला जात असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. त्यामुळे तेथे नवीन मशिनवर पुढील मतदान घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, दीपक पवार हे मतदान करण्यासाठी गेले असता अधिकाऱ्याने त्यांना बॅलेट दिला; परंतु मतदान करण्यापूर्वी कमळाच्या चिन्हापुढील लाईट लागून मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. असाच प्रकार आम्ही मतदान करतेवेळी झाल्याचे रोहिणी दीपक पवार, आनंदा ज्ञानेश्‍वर पवार, माजी उपसरपंच सयाजी श्रीरंग निकम, प्रल्हाद दगडू जाधव, दिलीप आनंदा वाघ यांनी निवडणूक अधिकाऱ्यास सांगितले. घड्याळाच्या चिन्हापुढील बटन दाबले, तरी मतदान कमळास होत असल्याची बाब ग्रामस्थांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्...
राज्यात आचारसंहिता कालावधीत ४७७ गुन्हे दाखल
महाराष्ट्र

राज्यात आचारसंहिता कालावधीत ४७७ गुन्हे दाखल

मुंबई (लोकमराठी) : निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसेच विना परवाना शस्त्र बाळगणे, अवैध मद्य बाळगणे, सामाजिक शांतता भंग करणे आदी प्रकरणात ४७७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. सार्वत्रिक विधानसभा निवडणुका जाहीर झाल्याच्या दिवसापासून आचारसंहिता अंमलात आली. राज्यात काटेकोर पद्धतीने निवडणूक प्रशासनाकडून आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. दिनांक २१ सप्टेंबरपासून आजपर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने राज्यभरात पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभागाकडून कार्यवाही सुरू आहे. शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, सार्वजनिक शांतता, सुरक्षितता भंग करणे, बेकायदेशीररित्या जमाव करणे, तलवारी, बंदुका आदी शस्त्रे, स्फोटक पदार्थ बाळगणे आदी स्वरुपाच्या प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार ११...
भिंतीवरील थुंकी पुसणाऱ्या या जिल्हाधिकाऱ्याने आता स्वत:लाच पाच हजाराचा दंड ठोठावला
महाराष्ट्र, मोठी बातमी

भिंतीवरील थुंकी पुसणाऱ्या या जिल्हाधिकाऱ्याने आता स्वत:लाच पाच हजाराचा दंड ठोठावला

बीड (लोकमराठी) : कर्तव्यनिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि सध्याचे बीडचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी स्वत:लाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. विधानसभा निवडणुकीसंदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पांडे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. या पत्रकार परिषदेत पत्रकारांना चहा देण्यात आला. मात्र, चहा प्लास्टिक मिश्रित कपात देण्यात आल्याची तक्रार एका पत्रकाराने केली. यावेळी कारवाईचा भाग म्हणून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी स्वतःलाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. निवडणुकीत प्लास्टिकचा वापर केला जाऊ नये असं आवाहन निवडणूक आयोगाने केलं आहे. महाराष्ट्रात प्लास्टिकबंदी संदर्भात कडक नियम करण्यात आले आहेत. मात्र याची पायमल्ली होत असतानाच, बीडच्या जिल्हाधिकाऱ्याने स्वतःलाच पाच हजार रुपयांचा दंड ठोठावल्याने चर्चेचा विषय बनला आहे. अकोल्यात भिंतीवरील थुंकी स...