
भोसरी (लोकमराठी) : भोसरी येथील बालाजी नगरमध्ये सांडपाणी वाहिनी तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने तातडीने वाहिनी दुरूस्ती करावी, अशी मागणी सर्वहरा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेच्या पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा सायराबानू सलीम शेख यांनी केले आहे.
मागील काही दिवसांपासून सांडपाणी वाहिनी तुंबल्याने दुर्गंधी पसरली आहे. तर गटारेही तुंबली आहे. त्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापालिकेने लवकरात लवकर याची दखल घेणे गरजेचे आहे.
- HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेज येथे एक दिवसीय जिल्हास्तरीय ‘लिंगभाव संवेदनीकरण’ कार्यशाळा संपन्न.
- Puran Poli Recipes : पुरणपोळी कशी बनवावी
- PIMPRI: दोन महिलांना मारहाण; तरुणाला अटक
- HOLIDAY : कामावरून साप्ताहिक सुट्टी घेणे का? गरजेचे आहे
- Cyclostyle : सायक्लोस्टाईल केलेल्या प्रश्नपत्रिका पूर्वी शाळेत दिल्या जायच्या; काय होते हे तंत्र