Tag: Marathi News

राजमाता जिजाऊ यांच्या चरित्रातून काय शिकावे?
विशेष लेख

राजमाता जिजाऊ यांच्या चरित्रातून काय शिकावे?

अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता.विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफ़ुन स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणार्या राजमाता जिजाऊ माता यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे. त्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य,शौर्य,प्रचंड आत्मविश्वास,इच्छाशक्ती आणि गरीबांप्रति प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंडखेडराजा (जि.बुलढाणा) येथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यातील लखूजीराजे जाधव म्हाळसाराणी या राजघराण्यात झाला. लखुजीराजेंनी आपल्या मुलांबरोबरच मुलीला म्हणजेच जिजाऊला देखील राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. जिजाऊंनी राजघराण्याचा व्रुथा अभिमान न बाळगता युद्धकला राजनीती यामध्ये प्रावीण्य मिळवले.आज आपण ज...
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा निधी खात्यात पडण्यास सुरुवात
मोठी बातमी, महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा निधी खात्यात पडण्यास सुरुवात

Ladki Bahin Yojana (Marathi News) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना लोकप्रिय झाली आहे. या योजनेचे आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता पडण्यास उशीर झाला. मात्र, मंगळवारपासून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, “ महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालु आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान नि...
PCMC : गैरव्यवहार प्रकरणी जिजामाता रुग्णालय प्रमुख डॉ. साळवे व लिपिकाची उचलबांगडी
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

PCMC : गैरव्यवहार प्रकरणी जिजामाता रुग्णालय प्रमुख डॉ. साळवे व लिपिकाची उचलबांगडी

भ्रष्टाचारात सहभागी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची काँग्रेस शहराध्यक्षा सायली नढे यांची मागणी पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) - महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील (Jijamata Hospital) रोजच्या भरणा रकमेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे (Sayali Nadhe) यांनी केला होता. त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या लेखा परीक्षणात दोन महिन्यात १८ लाख ६६ हजार ३८८ रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी जिजामाता रुग्णालय प्रमुख डॉ. सुनिता श्रीरंग साळवे (Dr Sunita Salve) व लिपिक आकाश प्रदीप गोसावी (Akash Gosavi) यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. डॉ. साळवे यांची बदली यमुनानगर रुग्णालयाच्या प्रमुखपदी करण्यात आली. तर लिपिक आकाश गोसावी याची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. तसे आदेश महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत. जिजाम...
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणींसाठी खुप महत्त्वाची बातमी 
महाराष्ट्र, मोठी बातमी

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणींसाठी खुप महत्त्वाची बातमी

मुंबई, दि. १० विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यात लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रचंड गाजली. लाडक्या बहिणींनी दिलेल्या भरभरून मतांमुळेच महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले आहे. अशातच आता निवडणुकांनंतर पुन्हा एकदा ही योजना चर्चेत आली आहे. राज्य सरकारकडून या योजनेत बदल होणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या, याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि माजी मंत्री आदिती तटकरे यांनी सर्वात महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये बदल करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. महिलांना त्यांचे पैसे मिळणार आहेत. अशी कोणतीही अट आम्ही घातलेली नाही. महिलांना त्यांचे पैसे मिळणारच आहेत. ही योजना राबवताना आम्ही अत्यंत योग्य पद्धतीने आणि विचार करून राबवत आहोत. त्यामुळे जे पैसे आम्ही द्यायचे ठरवले आहेत ते देणारच, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट के...
मोठी बातमी : प्रतिज्ञापत्रासाठी आता स्टॅम्प पेपरची गरज नाही
पुणे

मोठी बातमी : प्रतिज्ञापत्रासाठी आता स्टॅम्प पेपरची गरज नाही

पुणे : राज्य शासनाने नुकताच प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र अथवा अन्य प्रकाराचे डॉक्युमेंट शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरऐवजी पाचशे रुपयांचे स्टॅम्प वापरण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी महा ई-सेवा केंद्रातून नागरिकांकडून ५०० रुपयांचे प्रतिज्ञापत्र मागितले जात असल्याच्या तक्रारी नोंदणी विभागाकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर जात प्रमाणपत्र, उत्पन्नप्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपपत्र, आदी विविध दाखल्यांसाठी, तसेच शासकीय कामकाजासाठी लागणाऱ्या स्टॅम्पपेपरची माफी कायम ठेवण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण नोंदणी व मुद्रांक विभागाने दिले आहे. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडे याबाबत एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला असून, त्यामध्ये विविध प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी, तसेच घोषणापत्रांसाठी स्टॅम्पपेपरची आवश्यकता नसल्याचे म्हटले आ...
शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं – डॉ. तारा भवाळकर
विशेष लेख

शिक्षणाच्या जोडीने शहाणपणही यावं – डॉ. तारा भवाळकर

‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार २०२४’ च्या मानकरी डॉ. तारा भवाळकर यांनी हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणातील महत्त्वाचा संकलित अंश… 1) सांगलीमध्ये काही डॉक्टर, काही निरनिराळ्या क्षेत्रामधील मंडळी एकत्र येऊन आम्ही एक मासिक पत्रिका चालवतो. त्याच्यामध्ये जुन्या काळातलं चांगलं काय आणि ते ‘सायंटिफिक’ कसंय. आपल्याला वैज्ञानिक वगैरे असं म्हटलं की कळणं अवघड होतं. पण ‘सायंटिफिक’ म्हटलं की, अभिजात मराठीत पटकन कळतं. तर ते ‘सायंटिफिक’ कसंय हे सांगण्याचा प्रयत्न एक सद्गृहस्थ करत होते लेखनातून. आणि त्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलं होतं की, कुंकू लावणं हे कसं ‘सायंटिफिक’ आहे. आपण सुज्ञ आहात. मला काय म्हणायचंय ते आपल्या लक्षात येईल. कुंकू लावलं की… भ्रूमध्यामध्ये अमूक एक बिंदू कसा असतो आणि वैज्ञानिक दृष्टीने तो दाबबिंदू कसा असतो. त्यामुळे स्त्रियांचं मानसिक संतुलन वगैरे वगैरे कसं राहतं. माझं ड...
‘तर्कटपंजरी’ : तर्काच्या आधारावर विवेकवादी समाज घडवण्याची क्षमता असलेले पुस्तक
विशेष लेख

‘तर्कटपंजरी’ : तर्काच्या आधारावर विवेकवादी समाज घडवण्याची क्षमता असलेले पुस्तक

जगदीश काबरे हे जग पुरुषांचे आहे या चालीवर म्हणता येईल की हे जग अस्तिकांचे आहे. ज्याप्रमाणे पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते त्याचप्रमाणे या अस्तिकांच्या जगातसुद्धा नास्तिकांना दुय्यम स्थान दिले जाते. स्त्री म्हणजे पापयोनी समजणारे नास्तिक म्हणजे दुर्जन समजत असतात. पण मानवाच्या उत्क्रांतीच्या टप्प्यात स्त्रियांनी शेतीचा शोध लावून माणसाच्या सामाजिक प्रगतीचा मार्ग खुला केला त्याचप्रमाणे चार्वकांनी देव आणि पारलौकिता नाकारून वैदिक धर्माला आव्हान दिले आणि वैज्ञानिक प्रगतीचा पाया घातला. पण माणसाला अज्ञाताची भीती असल्यामुळे कुठल्यातरी फसव्या का होईना पण आधाराची गरज लागते. ती गरज सहजपणे देवाची संकल्पना पूर्ण करते. म्हणून त्याला माहीत नसलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर 'देवाची करणी आणि नारळात पाणी' या पद्धतीचे स्वीकारणे सोयीचे जाते. माणसाला विचार करण्याचा आळस असतो. तसेच तो ...
Tamil Nadu Floods : बंगालच्या उपसागरावरील दबावामुळे तामिळनाडूत मुसळधार पाऊस
राष्ट्रीय, मोठी बातमी

Tamil Nadu Floods : बंगालच्या उपसागरावरील दबावामुळे तामिळनाडूत मुसळधार पाऊस

चेन्नई, ता. १८ : भारतीय हवामान खात्याने (IMD) नुकत्याच केलेल्या अंदाजानुसार तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये आणखी पावसाची शक्यता आहे. चेन्नई आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे पुरपरिस्थिती निर्माण झाली असून लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. हवामान संस्थेने आपल्या ताज्या हवामान बुलेटिनमध्ये तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल परिसरात गुरुवारपासून रविवारपर्यंत एक किंवा दोन ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. वेल्लोर, तिरुपत्तूर, कृष्णगिरी, धर्मपुरी, सेलम आणि इरोड जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान संस्थेने म्हटले आहे. चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यांतील अनेक भागात गुरुवारी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडला, ज्यामुळे पाणी साचल...
KARJAT : कर्जतमध्ये वाय.के. हॉटेलचे उद्घाटन 
सिटिझन जर्नालिस्ट

KARJAT : कर्जतमध्ये वाय.के. हॉटेलचे उद्घाटन

कर्जत : धाकट्या पंढरीत सुप्रसिद्ध अभिनेते प्रा. मनमोहनदास यांच्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ब्रँड YK हॉटेलचा भव्य उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्षा उषा राऊत, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, नगरसेविका वैशाली कांबळे राजगुरू, निर्मला खुडे, एडीसीसी बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, माजी संचालक बाळासाहेब साळुंके, बाजप जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर, विक्रम कांबळे, खंडू खुडे, येवले अमृततुल्यचे संचालक नवनाथ येवले, वाय. के हॉटेलचे संचालक अमर काळे, सरपंच अशोक जायभाय, परशुराम जायभाय यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता कर्जतकरांना हॉटेल वाय. के.च्या माध्यमातून अनेक पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. उत्कृष्ट सेवा, स्वच्छता व क्वालिटी हे हॉटेल ...
‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार…
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

‘लाडकी बहीण योजने’साठी पुन्हा मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार…

लोकमराठी न्यूज नेटवर्क : महायुती सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना असलेल्या "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजनेला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ आतापर्यंत ज्या महिलांना मिळाला नाही, त्यांच्यापर्यंत लाभ पोहचवण्यासाठी ही मुदतवाढ देणात आली आहे. आता महाराष्ट्रातील महिलांना मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत (Ladki Bahin Yojana) अर्ज करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 ही नवीन मुदत दिली आहे. यापूर्वी या योजनेत अर्ज करण्याची मुदत सप्टेंबर अखेरपर्यंत होती. आता 15 ऑक्टोबर 2024 रात्री बारा वाजेपर्यंत या योजनेत अर्ज करता येणार आहे. मात्र हे अर्ज फक्त अंगणवाडी सेविकामार्फतच भरावे लागणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेत ग्रामीण भागापासून शहरापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला होता. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. त्यामुळे सरकारने अ‍ॅप आ...