Tag: Marathi News

पत्रकारांनी बातमी करताना कोणाच्याही दबावाला बळी पडता कामा नये : अशोकराव वानखेडे
पुणे

पत्रकारांनी बातमी करताना कोणाच्याही दबावाला बळी पडता कामा नये : अशोकराव वानखेडे

न्यूज १८ चे पत्रकार गोविंद वाकडे यांची प्रदेशाध्यक्ष पदी निवड पुणे : पत्रकारांनी आपल्या बातमी ला न्याय देताना कधीही राजकीय नेत्यांच्या दबावाला बळी पडता कामा नये. तसेच सुड बुद्धीने आपण पत्रकारिता करत नसेल तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. असे मत ऑल इंडिया जरनालिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार पदाधिकारी निवड करताना व्यक्त केले. न्यूज १८ चे पत्रकार गोविंद वाकडे यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष आणि पदाधिकारी यांची निवड आणि सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला.त्यावेळी वानखेडे बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक हेमंत जोशी उपस्थित होते . यावेळी हेमंत जोशी यांनी सर्वसामान्य जनतेला आपल्या पत्रकारितेचा फायदा झाला पाहिजे. तसेच ग्रामीण भागातील चित्र सर्वच माध्यमांनी पुढे आणले पाहिजे. सध्या नको त्या गोष्टी दाखवण्याची स्पर्ध...
GBS : जीबीएस या दुर्मिळ आजाराची लक्षणे, निदान, उपचार
आरोग्य, मोठी बातमी

GBS : जीबीएस या दुर्मिळ आजाराची लक्षणे, निदान, उपचार

जीबीएस (गुइलेन-बॅरे सिंड्रोम) हा एक दुर्मिळ आणि गंभीर न्यूरोलॉजिकल आजार आहे, जो शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीच्या चुकीच्या कार्यामुळे होतो. हा आजार परिफेरल नर्व्हस सिस्टमला (मज्जासंस्थेच्या मज्जातंतूंना) हानी पोहोचवतो, ज्यामुळे स्नायूंची कमकुवतपणा, झडप येणे आणि काहीवेळा पक्षाघात होऊ शकतो. जीबीएसची लक्षणे: हात आणि पायांमध्ये कमकुवतपणा आणि झडप येणे, जे वरच्या दिशेने पसरते. स्नायूंमध्ये वेदना आणि झटके येणे. चालताना किंवा शरीराचे संतुलन राखताना अडचण येणे. चेहऱ्याचे स्नायू कमजोर होणे, ज्यामुळे बोलणे, चावणे आणि गिळणे अवघड होते. दृष्टीच्या समस्या, जसे की दुहेरी दृष्टी. रक्तदाब आणि हृदयगतीमध्ये बदल. पचनसंस्थेच्या समस्या, जसे की आतड्यांची हालचाल कमी होणे. जीबीएसची कारणे: जीबीएसचे अचूक कारण अज्ञात आहे, परंतु हा आजार सहसा व्हायरल किंवा जीवाणूंच्या संसर्गानंतर सुरू होत...
Cricket खेळाचा इतिहास, तुम्हाला माहित आहे का?
क्रीडा, ताज्या घडामोडी

Cricket खेळाचा इतिहास, तुम्हाला माहित आहे का?

क्रिकेट हा एक लोकप्रिय खेळ आहे जो जगभरात खेळला जातो. हा खेळ विशेषतः भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, पाकिस्तान, श्रीलंका आणि न्यूझीलंड या देशांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. क्रिकेटचा इतिहास जुना आहे आणि तो वेळोवेळी बदलत गेला आहे. खाली क्रिकेटची संपूर्ण माहिती दिली आहे: 1. क्रिकेटचा इतिहास क्रिकेटचा उगम १६व्या शतकात इंग्लंडमध्ये झाला. हा खेळ सुरुवातीला ग्रामीण भागातील लोकांचा मनोरंजनाचा साधन होता. १८व्या शतकात क्रिकेट संघटित स्वरूपात खेळला जाऊ लागला आणि पहिला क्रिकेट क्लब हॅम्बल्डन क्लब (Hambledon Club) इंग्लंडमध्ये स्थापन झाला. १८७७ मध्ये पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. 2. क्रिकेटचे प्रकार क्रिकेटचे मुख्य तीन प्रकार आहेत: अ) कसोटी क्रिकेट (Test Cricket) हा क्रिकेटचा सर्वात जुना आणि पारंपरिक प्रकार आहे. ...
Mohammed Shami : मोहम्मद शमीबाबात या गोष्टी माहित आहेत का?
क्रीडा

Mohammed Shami : मोहम्मद शमीबाबात या गोष्टी माहित आहेत का?

मोहम्मद शमी (Mohammed Shami) हे भारतातील एक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहेत. ते उजव्या हाताने जलदगती गोलंदाजी (Right-arm fast bowler) करतात आणि ते भारतीय क्रिकेट संघाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यांची गोलंदाजीची अचूकता, स्विंग आणि वेग यामुळे ते जगभरात ओळखले जातात. खाली त्यांच्या करिअर आणि योगदानाबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. मोहम्मद शमी हे भारताच्या क्रिकेट संघाचे एक अत्यंत महत्त्वाचे स्तंभ आहेत. त्यांच्या गोलंदाजीच्या कौशल्यामुळे ते जगभरातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक मानले जातात. 1. वैयक्तिक माहिती पूर्ण नाव: मोहम्मद शमी अहमद जन्म: ३ सप्टेंबर १९९०, अमरोहा, उत्तर प्रदेश, भारत उंची: ५ फूट ८ इंच (१.७३ मीटर) भूमिका: गोलंदाज (Right-arm fast bowler) फलंदाजी: उजव्या हाताने (Right-handed batsman) 2. आंतरराष्ट्रीय करिअर मोहम्मद शमी यांनी भारतासाठी सर्...
श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुल, घारगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 
शैक्षणिक

श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुल, घारगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अहिल्यानगर, दि. २६ : श्री दत्तकृपा शैक्षणिक संकुल व कृषी ग्रामविकास प्रतिष्ठान व कृषी ग्राम विकास प्रतिष्ठान घारगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. निंबाळकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी साडेसात वाजता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. आजच्या 76 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे किसनराव तात्या पानसरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बाळासाहेब पानसरे यांनी भूषविले. झेंड्याला सलामी देत फॅशन डिझाईनच्या मुली यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत स्वागत गीताची लयबद्ध गुंफण घातली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सहविचार सभेचे प्रस्ताविक शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मच्छिंद्र गोंटे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात 76 व्या प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व स्पष्ट करत कार्यक...
राजमाता जिजाऊ यांच्या चरित्रातून काय शिकावे?
विशेष लेख

राजमाता जिजाऊ यांच्या चरित्रातून काय शिकावे?

अराजकतेच्या पार्श्वभूमीवरती मूर्तिमंत शिवराज्य उभं करणाऱ्या राजमाता म्हणजे जिजाऊ माता.विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सुत्रात गुंफ़ुन स्वराज्याचे जनआंदोलन उभं करणार्या राजमाता जिजाऊ माता यांचे जीवनचरित्र अत्यंत प्रेरणादायक आहे. त्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले.जिजाऊंचे व्यक्तिमत्व म्हणजे धैर्य,शौर्य,प्रचंड आत्मविश्वास,इच्छाशक्ती आणि गरीबांप्रति प्रचंड तळमळीने ओतप्रोत भरलेले आहे. राजमाता जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी सिंडखेडराजा (जि.बुलढाणा) येथे इतिहास प्रसिद्ध यादव घराण्यातील लखूजीराजे जाधव म्हाळसाराणी या राजघराण्यात झाला. लखुजीराजेंनी आपल्या मुलांबरोबरच मुलीला म्हणजेच जिजाऊला देखील राजनीती, युद्धकलेचे शिक्षण दिले. जिजाऊंनी राजघराण्याचा व्रुथा अभिमान न बाळगता युद्धकला राजनीती यामध्ये प्रावीण्य मिळवले.आज आपण ज...
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा निधी खात्यात पडण्यास सुरुवात
मोठी बातमी, महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा निधी खात्यात पडण्यास सुरुवात

Ladki Bahin Yojana (Marathi News) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वात महत्वकांक्षी योजना लोकप्रिय झाली आहे. या योजनेचे आचारसंहितेमुळे डिसेंबर महिन्याचा हप्ता पडण्यास उशीर झाला. मात्र, मंगळवारपासून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे पडण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, “ महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालु आहे. विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया आज पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान नि...
PCMC : गैरव्यवहार प्रकरणी जिजामाता रुग्णालय प्रमुख डॉ. साळवे व लिपिकाची उचलबांगडी
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

PCMC : गैरव्यवहार प्रकरणी जिजामाता रुग्णालय प्रमुख डॉ. साळवे व लिपिकाची उचलबांगडी

भ्रष्टाचारात सहभागी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची काँग्रेस शहराध्यक्षा सायली नढे यांची मागणी पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) - महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयातील (Jijamata Hospital) रोजच्या भरणा रकमेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे (Sayali Nadhe) यांनी केला होता. त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या लेखा परीक्षणात दोन महिन्यात १८ लाख ६६ हजार ३८८ रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी जिजामाता रुग्णालय प्रमुख डॉ. सुनिता श्रीरंग साळवे (Dr Sunita Salve) व लिपिक आकाश प्रदीप गोसावी (Akash Gosavi) यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. डॉ. साळवे यांची बदली यमुनानगर रुग्णालयाच्या प्रमुखपदी करण्यात आली. तर लिपिक आकाश गोसावी याची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. तसे आदेश महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत. जिजाम...
Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणींसाठी खुप महत्त्वाची बातमी 
महाराष्ट्र, मोठी बातमी

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिणींसाठी खुप महत्त्वाची बातमी

मुंबई, दि. १० विधानसभा निवडणुकांपूर्वी राज्यात लागू करण्यात आलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रचंड गाजली. लाडक्या बहिणींनी दिलेल्या भरभरून मतांमुळेच महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आले आहे. अशातच आता निवडणुकांनंतर पुन्हा एकदा ही योजना चर्चेत आली आहे. राज्य सरकारकडून या योजनेत बदल होणार असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या, याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार आणि माजी मंत्री आदिती तटकरे यांनी सर्वात महत्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये बदल करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. महिलांना त्यांचे पैसे मिळणार आहेत. अशी कोणतीही अट आम्ही घातलेली नाही. महिलांना त्यांचे पैसे मिळणारच आहेत. ही योजना राबवताना आम्ही अत्यंत योग्य पद्धतीने आणि विचार करून राबवत आहोत. त्यामुळे जे पैसे आम्ही द्यायचे ठरवले आहेत ते देणारच, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट के...
मोठी बातमी : प्रतिज्ञापत्रासाठी आता स्टॅम्प पेपरची गरज नाही
पुणे

मोठी बातमी : प्रतिज्ञापत्रासाठी आता स्टॅम्प पेपरची गरज नाही

पुणे : राज्य शासनाने नुकताच प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र अथवा अन्य प्रकाराचे डॉक्युमेंट शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरऐवजी पाचशे रुपयांचे स्टॅम्प वापरण्याचे बंधन घातले आहे. त्यामुळे विविध प्रकारच्या दाखल्यांसाठी महा ई-सेवा केंद्रातून नागरिकांकडून ५०० रुपयांचे प्रतिज्ञापत्र मागितले जात असल्याच्या तक्रारी नोंदणी विभागाकडे येत होत्या. या पार्श्वभूमीवर जात प्रमाणपत्र, उत्पन्नप्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपपत्र, आदी विविध दाखल्यांसाठी, तसेच शासकीय कामकाजासाठी लागणाऱ्या स्टॅम्पपेपरची माफी कायम ठेवण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण नोंदणी व मुद्रांक विभागाने दिले आहे. उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडे याबाबत एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्यावर उच्च न्यायालयाने निर्णय दिला असून, त्यामध्ये विविध प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी, तसेच घोषणापत्रांसाठी स्टॅम्पपेपरची आवश्यकता नसल्याचे म्हटले आ...