Tag: thane

ठाण्यातील सावरकर नगरमध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
महाराष्ट्र

ठाण्यातील सावरकर नगरमध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

ठाणे : श्री योगा सेवा प्रतिष्ठान सावरकर नगर ठाणे येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमाने संपन्न झाला. सर्व प्रथम झेंडा वंदनाचा कार्यक्रम करण्यात आला, श्री योगा सेवा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुनीता श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिष्ठानच्या साईबाबा यांच्या नवीन देव्हाऱ्याचे ह्यावेळी उदघाटन करण्यात आले. अनिता गुप्ता, सुषमा गुप्ता यांनी देशभक्तीपर गीते गायली, माजी रेल्वे पोलीस पवन सिंग यांनी स्वातंत्र्याची महती सांगणारे भाषण केले. नगरसेवक दिलीप बारटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच व्यावसायिक अंकुश जोष्टे यांनीही कार्यक्रमास हजेरी लावली. अध्यक्षा सुनीता श्रीवास्तव, उपाधक्ष्या विनिता राजन,खजिनदार वैशाली सावंत, सभासद पांकजम शाशिधरण, सिधार्थी पुजारी, सुमा सुब्रमण्यम, कांचन पावसकर, अनिता गु...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्ह्यातर्फे ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे वाटप
मोठी बातमी, महाराष्ट्र

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्ह्यातर्फे ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे वाटप

ठाणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : शिवजयंती निमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीने कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाचे वाटप डोंबिवलीत ठिक-ठिकाणी करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे, राष्ट्र सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. डोंबिवली एमआयडीसी येथील शिवाई बालक मंदिर मधील विद्यार्थ्यांना शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाटप करून छत्रपती शिवारायांची माहिती देण्यात आली. एमआयडीसीतील रिक्षा स्टँड वरील रिक्षाचालकांसह अनेकांना या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. डोंबिवली येथील लोढा हेवन ग्रीन पार्क सोसायटी मधील मुलांनासुद्धा या पुस्तकाचे वाटप करून व समाजातील लहान थोरांपर्यंत शिवाजी महाराजांचे खरे चारित्र पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवरायांच...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्हा महिलांसाठी आयोजित चमत्कार प्रशिक्षण शिबिराला उदंड प्रतिसाद
महाराष्ट्र

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्हा महिलांसाठी आयोजित चमत्कार प्रशिक्षण शिबिराला उदंड प्रतिसाद

लोकमराठी न्यूज नेटवर्क ठाणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ठाणे जिल्ह्याच्या वतीने डोंबिवली (प.) येथील जोंधळे हायस्कूल येथे रविवारी (ता. १३) महिलांसाठी एक दिवसीय चमत्कार प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, ठाणे शहर, मुरबाड, अशा विविध ठिकाणाहून जवळपास ३५ हून अधिक महिलांनी प्रशिक्षणार्थी म्हणुन सहभाग नोंदवत उदंड प्रतिसाद दिला. बुवा-बापू ,महाराज, तांत्रिक-मांत्रिक व पूजा-पाठ कर्मकांडाच्या माध्यमातून स्त्रियाच जास्त शोषणाला बळी पडतात. समाजातील स्त्रियांना प्रशिक्षित करून त्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोबत जोडून घेऊन, त्यांच्यामार्फत इतर महिलांना जागृत करण्याचे काम करावे, समाज प्रबोधन करावे. हा या शिबिराचे आयोजन करण्यामागचा उद्देश असल्याचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यक...
विशेष लेख

पूरपरिस्थिती सरकारी यंत्रणा आणि मदत मागणाऱ्या हजारो संस्था संघटना

भीक नको पण कुत्रा आवर ह्या म्हणीप्रमाणे, कधी नव्हे ते आपत्कालीन परिस्थितीमध्ये पावसाळ्यात मोठ्या झाडाच्या पायथ्याशी जश्या पांढऱ्या छत्र्या उगवतात त्याच प्रमाणे मदत मागणारे उगवतात आणि ह्या छत्र्यांना (मदत मागणाऱ्यांना) कायम हे मोठं झाड (ज्या झाडाखाली ह्या उगवल्यात) ते झाड जणू आमच्यामुळेच उभं आहे की काय अश्या आविर्भावात ही सगळी मंडळी असतात. अश्या हवश्या नवश्या आणि गवश्यानीच आजकालचा डिजिटल मीडिया व्यापून टाकलाय. ज्यांना स्वतःच 30 लोकांचं मित्र मंडळ सांभाळता येत नाही असे लोक राज्याच्या मदतकार्यात उतरलेत. ज्यांनी आजवर भाषणबाजी करत उपाशी लोकांचं पोकळ प्रबोधन केलंय असे खिशातला एक रुपया ही न मोडणारे भिक्कार सो कोल्ड डॉक्टर, प्राध्यापक, वकील आणि फलाना बिस्ताना लोक सुद्धा मदतकार्यात उतरलेत इतकंच काय तर CSR फंड आपल्याच खिशात जावा म्हणून मोठं मोठे कॉर्पोरेट पण यात शामिल झालेत. चांगलं ...
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या विरोधात ठाण्यात हिंदुत्वनिष्ठांचे निषेध आंदोलन
महाराष्ट्र

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अवमानाच्या विरोधात ठाण्यात हिंदुत्वनिष्ठांचे निषेध आंदोलन

सावरकरांचा अवमान करणाऱ्या पुस्तकावर देशभरात तत्काळ बंदी घालावी, अन् संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी ठाणे : भोपाळ येथे काँग्रेस सेवादलाच्या प्रशिक्षण शिबिरात 'वीर सावरकर कितने ‘वीर ?' या नावाने वाटण्यात आलेल्या पुस्तकामध्ये अत्यंत हीनकस, स्वा. सावरकरद्वेषी आणि धादांत खोटारडे लिखाण केले आहे. यातून काँग्रेसवाले स्वातंत्र्यवीरांना बदनाम करण्यासाठी किती खालच्या पातळीला जाऊ शकतात, हेच दिसून येते. स्वा. सावरकर यांचाच नव्हे, तर कोणत्याही राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा अवमान कोणाकडूनही होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने तत्काळ यासंदर्भात कायदा करण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसने वाटलेल्या पुस्तकातून देशात धार्मिक आणि जातीय तणाव निर्माण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचाही कुटील हेतू दिसून येतो. काँग्रेसचा स्वा. सावरकरद्वेष, हा संपूर्ण क्रांतीकारी चळवळीविषय...