मोठी बातमी

भोसरीतील शीतलबाग पादचारी पुलाच्या कामात मोठा गैरव्यवहार
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

भोसरीतील शीतलबाग पादचारी पुलाच्या कामात मोठा गैरव्यवहार

पुलाचा खर्च ७१ लाखावरून थेट ७.५ कोटीपर्यंत वाढलेल्या खर्चाची चौकशी करून दोषींवर कारवाईची अपना वतनची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पिंपरी (लोकमराठी) : पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी येथील शीतलबाग पादचारी पुलाचा खर्च ७१ लाखांवरून थेट ७.५ कोटीच्या वर गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी अपना वतन संघटनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अपना वतनचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांना पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्राप्त माहिती अधिकारातील कागदपत्रानुसार हा प्रकार निदर्शनास आला असून त्यामध्ये राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे व दाबामुळे तसेच प्रशासकीय अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, शीतलबाग पादचारी पुलाच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याबाबत भाजपचे शहराध्य...
राज ठाकरेंकडे एवढी संपत्ती कुठून आली?; अंजली दमानिया यांचा सवाल
महाराष्ट्र, मोठी बातमी

राज ठाकरेंकडे एवढी संपत्ती कुठून आली?; अंजली दमानिया यांचा सवाल

मुंबई (लोकमराठी) : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चौकशीसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केले आहे. या चौकशीची वेळ चुकीची असल्याचे मत दमानिया यांनी व्यक्त केले आहे. मात्र त्याचवेळी ही चौकशी याआधीच व्हायला हवी होती असं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे. तसचं राज ठाकरे यांच्या कमाईचे साधन काय?, त्यांच्याकडे इतकी संपत्ती कुठून आली? असा सवालही त्यांनी एका वृत्तवाहिनिशी बोलताना व्यक्त केला आहे. राज ठाकरे यांची चौकशी २२ तारखेला म्हणजेच आज होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी स्पष्ट झाल्यानंतर मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे सकाळपासूनच मुंबईमधील अनेक महत्वाच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच बंदोबस्तामध्ये राज ठाकरे त्यांची पत्नी शर्मिला आणि मुलगा अमित यांच्या सोबत पावणे अकराच्या सुमारास कृष्णकुंजवरुन ईडी...
मोठी बातमी, राजकारण

खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर?

मुंबई (लोकमराठी) : साताऱ्याचे खासदार उदयनराजेंच्या भेटी नंतर मुख्यमंत्र्यांकडून शिवेंद्रराजेंना भेटीचे निमंत्रण देण्यात आले असून शिवेंद्रराजे वर्षावर दाखल झाले आहेत. उदयनराजेंच्या उपद्रवाचे कारण देत काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजंनी राष्ट्रवादी काँग्रेसला राम-राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. उदयनराजे आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या भेटीत उदयनराजेंच्या राजीनाम्यानंतर विधानसभा आणि लोकसभेची पोट निवडणूक एकत्रित घेण्याची मागणी उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे सांगण्यात येत आहे. उदयनराजेंचा भाजपमध्ये प्रवेश झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीनही राजेंना गमावणार हे जवळपास निश्चित आहे. दरम्यान, शिवेंद्रराजेंनी याआधीच भाजपमध्ये प्रवेश केला असून रामराजे नाईक निंबाळकरही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याचे बोलेले जात आहे. वर्षावरील झालेल्या बैठकीनंत...
लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या टपाल तिकिटाचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
महाराष्ट्र, मोठी बातमी

लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंच्या टपाल तिकिटाचे उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

लोक मराठी : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जन्मशताब्दी साजरी होत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र शासन व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने गुरूवारी (दि. १ ऑगस्ट) अण्णा भाऊंचे टपाल तिकीट प्रकाशित करण्यात येणार आहे. अशी माहिती साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी दिली. मुंबईतील ब्रांदा येथील रंगशारदा सभागृहात गुरूवारी सकाळी साडेनऊ वाजता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते हा ऐतिहासिक सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला राज्याचे महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री दिलीप कांबळे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक समिती उपाध्यक्ष मधुकर कांबळे, लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती अध्यक्ष अशोक लोखंडे, आमदार सुधारक भालेराव यांच्यासह महामंडळाचे पदाधिकारी, अधिकारी आणि ...
माहिती अधिकार कायद्याला विनम्र श्रद्धांजली – विश्वंभर चौधरी
विशेष लेख, मोठी बातमी

माहिती अधिकार कायद्याला विनम्र श्रद्धांजली – विश्वंभर चौधरी

विश्वंभर चौधरी थरारक सूडनाट्य. मुख्य माहिती आयुक्तांनी पंतप्रधान कार्यालयाला माहिती देण्याचे फर्मावले म्हणून मोदी शहांनी त्यांचा सूड घेतला. मुख्य माहिती आयुक्तांसह राज्यातील सर्व माहिती आयुक्त काल संसदेत मंजूर झालेल्या सुधारणा कायद्यानुसार आता मोदी-शहांच्या थेट नियंत्रणात आले आहेत. कोणत्याही पदाला निर्धारित कालमर्यादा असते. माहिती आयुक्तांचा कार्यकाळ कायद्यानुसार पाच वर्षांचा आहे. मात्र, काल लोकसभेत पाशवी बहुमताचा गैरवापर करून मोदींनी हा कार्यकाल रद्द केला असून केंद्र सरकार आता वाट्टेल त्या वेळी आयुक्तांना दूर करू शकते. त्यांचे पगारही आता केंद्र सरकार ठरवेल. थोडक्यात काय तर मुख्य माहिती आयुक्तांसह सगळ्याच राज्यांचे माहिती आयुक्त आता मोदी शहांचे घरगडी झालेले आहेत. त्यांचा पगार तुमच्या करातून जाणार आहे. मात्र, त्यांच्यावर मालकी मोदी शहांची असणार आहे. या कायद्यात नियम करण्...
महापालिका आयुक्तांकडून शहरातील कचरा समस्येवर उपाययोजना करण्याचे आश्वासन
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

महापालिका आयुक्तांकडून शहरातील कचरा समस्येवर उपाययोजना करण्याचे आश्वासन

पिंपरी चिंचवड : अपना वतन संघटनेच्या वतीने शहरातील कचरा समस्येविषयी आक्रमक भूमिका घेत महापालिका आयुक्तांच्या घरासमोर 'डस्टबीन' आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवार (दि. १५) ४ वाजता बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये अपना वतन संघटनेच्या वतीने अनेक मुद्दे मांडण्यात आले. या अर्ध्या तासातील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. आयुक्तांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन शहरातील कचऱ्याच्या समस्येबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. बैठकीमध्ये उपस्थित केलेले मुद्दे : १) शहरात ठिकठिकाणी कचरा साचलेला असून त्याचे ढीगच्या ढीग लागले आहेत. उदा - काळेवाडी, थेरगाव, वाकड, निगडी, चिंचवड, भोसरी परिसरात २) शहरातील सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणवर कचरा अनेक दिवसांपासून पडलेला आहे. उदा - रोझ लॅन्ड सोसायटी, माँर्ट व्हर्ट सोसायटी इत्यादी ३) शहरा...
कचरा प्रश्नी, आता थेट आयुक्तांच्या बंगल्यावरच डस्टबिन आंदोलन – अपना वतन संघटना
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

कचरा प्रश्नी, आता थेट आयुक्तांच्या बंगल्यावरच डस्टबिन आंदोलन – अपना वतन संघटना

Lok Marathi News Network पिंपरी चिंचवड : शहरामध्ये मागील अनेक महिन्यांपासून ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्ते तसेच नगरसेवकांनी स्वतः वारंवार मागणी करूनही कचरा प्रश्न मार्गी लावण्यात महापालिकेला अपयश आले आहे. काहीही असले तरी आरोग्यप्रमुख व आयुक्त श्रावण हर्डीकर हेच या समस्येला जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी येत्या शनिवारपर्यंत (दि. १३) तातडीने तोडगा काढावा. अन्यथा अपना वतन संघटनेच्या वतीने रविवार (दि. १४) सकाळी १० वाजता आयुक्त हर्डीकर यांच्या बंगल्यावर डस्टबिन आंदोलन करण्यात येईल. असा इशारा अपना वतनचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी दिला आहे. १ जुलै पासून आरोग्य विभागाने कचरा संकलन व वाहनाचे काम बीव्हीजी इंडिया व ए. जी इन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंपन्यांना दिले आहे. त्यापोटी त्यांना लाखो रुपये देण्यात येणार आहेत. परंतु आठवडा उलटून गेला तरी या दोन्ही कंपन...
मुळशी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश ससार यांची फेरनिवड, तर कार्याध्यक्षपदी प्रदीप पाटील बिनविरोध
पुणे, मोठी बातमी

मुळशी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी रमेश ससार यांची फेरनिवड, तर कार्याध्यक्षपदी प्रदीप पाटील बिनविरोध

Lok Marathi News Network पुणे : धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या पत्रकार संघ मुळशीच्या अध्यक्षपदी 'सकाळ'चे हिंजवडीतील बातमीदार रमेश ससार तर कार्याध्यक्षपदी 'लोकमत'चे प्रदीप पाटील यांची बिनविरोध निवड झाली. संघाच्या पौड येथील पत्रकार भवनात झालेल्या सर्वसाधारण सभेत नव्या कार्यकारणीची घोषणा करण्यात आली. संघाचे मावळते अध्यक्ष राजेंद्र मारणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेला संघाचे माजी अध्यक्ष धोंडिबा कुंभार, संघाचे मार्गदर्शक दत्तात्रय सुर्वे, नीलेश शेंडे, बबन मिंडे, दत्तात्रय उभे, दत्तात्रय जोरकर, केदार कदम, रामदास दातार यांच्यासह नव्या कार्यकारिणीतील पदाधिकारी व सभासद उपस्थित होते. यावेळी निवडलेली कार्यकारणी पुढीलप्रमाणे : अध्यक्ष - रमेश ससार (सकाळ), कार्याध्यक्ष - प्रदीप पाटील (लोकमत), उपाध्यक्ष - सागर शितोळे (पुढारी) व साहेबराव भेगडे (ल...
राज्यातील ३५ पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या
मोठी बातमी, महाराष्ट्र

राज्यातील ३५ पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या

मुंबई (लोक मराठी न्यूज) : राज्य गृह विभागाने राज्यातील तब्बल 35 पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या केल्या आहेत. बदल्यांचे आदेश बुधवारी रात्री काढण्यात आले आहेत. बदली झालेल्या पोलिस निरीक्षकांची नावे पुढीलप्रमाणे (कंसात कोठुन कोठे बदली झाली ते ठिकाण) : बांदेकर दामोदर वसंत (रत्नागिरी ते मुंबई शहर), पाटील सुधीर भिमराव (वाशिम ते मपोअ, नाशिक), मंडलवार जयदीश शिवाजी (लोहमार्ग, औरंगाबाद ते यवतमाळ), श्रीमती माने वंदना शिवराम (बृहन्मुंबई ते ठाणे शहर), भामरे अविनाश भगवान (बुलढाणा ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), खेडकर हरिष दत्‍तात्रय (औरंगाबाद, ग्रामीण ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), संपते प्रशांत पांडुरंग (पोप्रके, बाभळगाव, लातूर ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), जाधव विजय कृष्णराव (मओप, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), वाघमारे रूपचंद मधुकर (मओअ, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग...
मोठी बातमी, विशेष लेख

जात हीच एक अंधश्रद्धा

Lok Marathi News Network सन १२ व्या शतकात महात्मा बसवण्णा यांनी चांभार समाजातील शीलवंत आणि ब्राम्हण समाजातील कल्याणी यांचा आंतरजातीय विवाह लावून दिला. ब्राम्हण असलेल्या गणेश आणि महार असलेल्या सारजा यांनी प्रेम केल्याबद्दल गावातील लोकांनी त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा सावित्रीबाई फुल्यांनी त्यांना वाचवून आश्रय दिला. ही घटना १८६८ सालातली. राजर्षि शाहू महाराजांनी तर आपली चुलत बहीण चंद्रप्रभाबाई यांचा विवाह धनगर असणाऱ्या यशवंतराव होळकर यांच्याशी निश्चित केला. एवढेच नाही तर असे १०० आंतरजातीय विवाह घडवून आणण्याचा त्यांनी संकल्प केला होता. त्यापैकी २५ विवाह त्यांनी पार पाडले. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनीही जात निर्मूलनासाठी आर्थिक स्वातंत्र्य, धर्म ग्रंथांची चिकित्सा आणि आंतरजातीय विवाह अशी त्रिसूत्री सांगितली होती. महात्मा गांधीजीही आपल्या उत्तर आयुष्यात फक्त आंतरजातीय विवाह असेल...