सिटिझन जर्नालिस्ट

कोविड-१९ महामारी : आव्हाने आणि संधी
सिटिझन जर्नालिस्ट

कोविड-१९ महामारी : आव्हाने आणि संधी

अपर्णा कुलकर्णी सध्याच्या आजाराच्या घटनेने आपल्याला कळले आहे की, एकता, आपल्याला परिस्थितीशी लढाई करण्यास मदत करते. या रोगाचा सर्वत्र परिणाम झाला आहे. लिंग, वय, धर्म, राष्ट्रीयत्व आणि वंशिकता याची पर्वा न करता सर्वत्र याचे पडसाद उमटले आहेत. हे परिणाम केवळ शारीरिक आणि मानसिकच नव्हे तर आर्थिक आणि सामाजिक देखील आहेत. यामुळे घरून कार्य करणारी एक नवीन अर्थ व्यवस्था सुरू झाली आहे. आरोग्य आणि स्वच्छता ही नागरीक तसेच राष्ट्राची प्राथमिकता बनली आहे. या दरम्यान अनेक आव्हानांचा सामना आपण करत आहोत. त्याचबरोबर यातून नवनवीन संधी देखील निर्माण होताना दिसत आहेत. करोनाची (Corona) लाट आल्यावर जसजशी रुग्ण संख्या वाढत गेली, तशी आपल्याला विविध गोष्टींची कमतरता भासू लागली. अनेक वैद्यकीय आव्हानांचा आपण सामना केला किंबहुना अजूनही करत आहोत. यामध्ये सगळ्यात जास्त कमतरता जाणवली ती रूग्णखाटांची...
संगती करावी सदा सज्जनाची! सावली नसावी कधी दुर्जनाची!
सिटिझन जर्नालिस्ट

संगती करावी सदा सज्जनाची! सावली नसावी कधी दुर्जनाची!

डॉ. किरण मोहिते नातवंड म्हणजे दुधाची साय. पोटाच्या गोळ्या पेक्षाही नातवावर प्रेम, आपुलकी, माया असणारे. त्या माया पोटे ताड ताड बोलणारे देखील असे माझे आजोबा गावावरून पुण्यात यायचे. सातारा वरून पुण्यात येताना थेट रेल्वेने प्रवास करून चक्क देहु रोड पर्यंत लोकलने एकटे प्रवास करायचे. मंदिरात जाण येणं चालू असेयाचं. किर्तन, भजन, तोंड पाठ, पेटी घेयाचे अन भजन गात बसेयचे. वय साधारण पणे ८६ वर्ष. या वयात तरुणांना देखील लाजवेल असं चालणं, बोलण, स्मरणशक्ती, एका डोळ्याने अंधुकसं दिसायचं एवढंच. मी म्हटलो दादा एखाद भजन म्हणा मी डायरीत लिहून ठेवतो. त्यांनी स्वयं लिखित तयार केललं कडव... संगती करावी सदा सज्जनाची सावली नसावी कधी दुर्जनाची ( 1 ) कुण्या दुर्बलता नको जोर दाउ&nb...
घरगुती गणपती : कागदी कपापासून गणपतीची आकर्षक आरस
सिटिझन जर्नालिस्ट

घरगुती गणपती : कागदी कपापासून गणपतीची आकर्षक आरस

पिंपळे गुरव : गोपाळ वस्ती येथे राहणाऱ्या संजय जाधव या तरूणाने कागदी कपापासून गणपतीची आरस केली आहे. पर्यावरणपूरक केलेली ही सजावट नागरिकांचे आकर्षण ठरली आहे. रंगीत विद्युत दिव्यांची भोवताली रोषणाई केली असून समोर प्लास्टिकची फुले व गणपतीच्या मागे पुठ्ठ्यावर पांढऱ्या रंगाचा मऊ कपडा लावला आहे. त्यामुळे आजूनच शोभा वाढली आहे. https://youtu.be/dZiZ6K1Sllg सुमारे ४०० कागदी कपांचा वापर यासाठी केला असून दरवर्षी नवनवीन प्रयोग करत संजय देखावा साकारत असतो. ही सजावट करण्यासाठी पत्नी रोहिनी, मुलगा अरविंद व मुलगी आरोहि या चिमुरड्यांनीही मदत केली. असे संजयने आवर्जून सांगितले. मागील सहा वर्षांपासून संजय गणपती प्रतिष्ठापना करतो. संजयचा (मो. नं. ९८८१७८३४५८, ७०४०२६९६९०) श्रीशांत पुणेरी ढोल पथकाचा व्यवसाय आहे. ...
सहाय्यक आयुक्तांवरील हल्ला संतापजनक
सिटिझन जर्नालिस्ट

सहाय्यक आयुक्तांवरील हल्ला संतापजनक

विमल मैत्र, चिंचवड बेकायदा पदपथ अडवणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर चाकूने हल्ला केला. ही नुकतीच ठाण्यात घडलेली घटना संतापजनक आहे. या हल्यात कल्पिता यांचे दोन बोटे कापली गेली. या महाराष्ट्रात आजपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे शत्रू शायिस्तेखानाची बोटे कापल्याचे ऐकत आलो आहोत. आज त्याच महाराष्ट्रात आपल्याला हि बातमी ऐकावी लागते, हे दुर्देवी आहे. अशाप्रकारच्या घटना परत घडू नये, म्हणून शासनाने संबंधितांवर कडक कारवाई करावी, हि अपेक्षा आहे. ...
रक्षाबंधन….असेही!
सिटिझन जर्नालिस्ट

रक्षाबंधन….असेही!

संतोष गोलांडे पिंपरी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराज मंदिराचे काम सुरु आहे. काही महिन्यांपासून या कामावरील कामगार हे काम करीत आहेत. अनेक दिवस घरापासून दूर आलेले आहेत. घरापासून दूर आल्यामुळे सर्व सण समारंभाना ते मुकलेले आहेत. आज श्रावणी पौर्णिमा..रक्षाबंधन चा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा विशेष दिवस. आमचे मित्र प्राध्यापक श्री. विद्यासागर अप्पासाहेब वाघेरे हे रोज नवीन मंदिराच्या कामावर भेट देऊन पाहणी करीत असतात. परंतु आज ते त्यांची कन्या कु. चित्कला हिला घेऊन मंदिराच्या कामाच्या ठिकाणी गेले. कु. चित्कला हिने मंदिराच्या कामावरील सर्व कामगारांना ओवाळले. नाथसाहेबांच्या मंदिरासाठी झटणाऱ्या हातांवार राखी बांधली. प्रा. विद्यासागर वाघेरे यांनी स्वतः सर्व कामगारांना मिठाई देऊन तोंडं गोड केले. या सर्व प्रसंगाने भारावलेल्या श्रमिकांच्या डोळ्यात अश्रू न आले तर नवलंच! भरलेल्या डोळ्...
धार्मिक कट्टरवादी समुदाय नेहरूंचा द्वेष का करतो ?
सिटिझन जर्नालिस्ट

धार्मिक कट्टरवादी समुदाय नेहरूंचा द्वेष का करतो ?

आनंद शितोळे लोकही नेहरूंना दोष देताना नेहरू भाबडे होते, साम्यवादी होते कि समाजवादी होते कि अजून काही होते याच्या चर्चा करतात, चरित्रहनन करताना खोटे फोटो, कहाण्या, नेहरूंच मुस्लीम मूळ आणि कुळ याबद्दल अफवा पसरवल्या जातात. यापलीकडे जाऊनही नेहरूंच महत्व नाकारता येत नाही म्हणून ७० वर्षांनी सुद्धा टीका करायला नेहरुच लागतात आणि खापर फोडायला नेहरुच लागतात , हे नेमक का ? १९४७ साली पाकिस्तान-भारत दोन्ही देशांचा जन्म झाला.मोहम्मद अली जीनांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानची वाटचाल सुरु झाली. ह्या ७० वर्षात पाकिस्तान अधिकृतरीत्या इस्लामिक देश बनलेलं आहे. ह्या ७० वर्षात अनेकदा देशाची राज्यघटना पूर्णपणे बदलण्यात आली. ह्या ७० वर्षात देशाचे दोन तुकडे झाले. ह्या ७० वर्षात तब्बल ३९ वर्षे थेट लष्करी हुकुमशहा सत्तेवर होते आणि उरलेल्या काळात सरकार नावाच लष्कराच्या तालावर नाचणार बाहूल. ह्या ७० वर्षा...
हा प्रश्न केवळ आणि केवळ आरोग्याचाच…
सिटिझन जर्नालिस्ट, मोठी बातमी

हा प्रश्न केवळ आणि केवळ आरोग्याचाच…

जयंत जाधव फटाके फोडणे म्हणजे विध्वंसातून आनंद घेणे. एखादी वस्तू जळाल्याने, त्यातून धूर आल्याने किंवा त्यातून मोठा आवाज आल्याने ज्यांना आनंद मिळतो त्यांची वृत्ती ही विध्वंसक असते किंवा विध्वंसक बनत चाललेली असते. लहान मुलांना आपण फटाके फोडायला शिकवून कोणते संस्कार करतोय हे ही लक्षात घेणे गरजेचे आहे. माननीय राष्ट्रीय हरित न्यायालयाने व यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे निकाल देताना जी निरीक्षणे, आरोग्य सर्वे व तज्ञ मते नोंदवली आहेत ती गंभीर आहेत. वास्तविक कोरोनाच्या पर्शवभूमीवर हा निर्णय न्यायालयाने दिला आहे. आपल्या सांगली सारख्या शहराचा देशातील अति प्रदूषित १२२ शहरांमध्ये समावेश होणे ही बाब अतिशय गंभीर आहे. आणि नोंदविलेल्या निरीक्षणांमध्ये दिवाळीत सर्वात जास्त प्रदूषणाची नोंद आहे. त्यानंतर ख्रिसमस, ३१ डिसेंबर व इतर सण, कार्यक्रमांचा उल्लेख आहे. मुळात दिवाळी हा सण प्रे...
भावी पिढीसमोर पालकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आदर्श ठेवणे गरजेचे
सिटिझन जर्नालिस्ट

भावी पिढीसमोर पालकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आदर्श ठेवणे गरजेचे

मनुष्य हा पृथ्वीतलावरील सर्वाधिक बुद्धिजीवी प्राणी आहे हे आपण जाणतोच. मनुष्याला विचार, तर्क आणि दृष्टिकोन असण्याची कला नैसर्गिकरित्या अवगत आहे परंतु अजूनही माणूस हा विविध अंधश्रदेच्या विळख्यात अडकलेला दिसून येतो. आजही समाजात अंगात येणे, पिंडाला कावळा शिवणे, भूत पिशाच्च, करणी, वशीकरण, जादू टोना, काळी जादू अश्या अनेक घटकांना बळी पडण्याचे प्रमाण दिसून येते, अगदी सुशिक्षित समाजात देखील ह्या गोष्टी घडतात ही एक शोकांतिका आहे. जीवनात कुठल्याही गोष्टीवर नितांत डोळस श्रद्धा असावी परंतु अंधश्रद्धा ही भीती पोटी ब्राम्हराक्षस असते हे समजून घ्यायला हवे. यामध्ये प्रत्येक घटक वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणे आणि होणाऱ्या घटनांची कारणीमीमांसा करणे आणि योग्य ते उत्तर शोधणे म्हणजेच तिमिरातून तेजाकडे जाण्याचा प्रवास होय. सकारात्मक विचार जीवनाचे अनेक पैलू उलगडून देतात आणि विवेकी बनवतात, सद्यस्थितीत...
सिटिझन जर्नालिस्ट

भोसरीत सांडपाणी वाहिनी तुंबल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात; वाहिनी दुरूस्तीची नागरिकांची मागणी

भोसरी: बालाजीनगरमध्ये रस्त्यावर वाहणारे घाण पाणी भोसरी (लोकमराठी) : भोसरी येथील बालाजी नगरमध्ये सांडपाणी वाहिनी तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने तातडीने वाहिनी दुरूस्ती करावी, अशी मागणी सर्वहरा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेच्या पिंपरी चिंचवड महिला अध्यक्षा सायराबानू सलीम शेख यांनी केले आहे. मागील काही दिवसांपासून सांडपाणी वाहिनी तुंबल्याने दुर्गंधी पसरली आहे. तर गटारेही तुंबली आहे. त्यामुळे परिसरात आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून महापालिकेने लवकरात लवकर याची दखल घेणे गरजेचे आहे. ...
भाजपचा पराभव अटळच आहे : पहा कसा?
सिटिझन जर्नालिस्ट

भाजपचा पराभव अटळच आहे : पहा कसा?

लोकसभा जरी ३६ राज्यातील ५४४ सदस्यांनी बनत असली तरीही त्यातील १३ राज्येच संख्यात्मकतेने प्रभावी ठरतात. या १३ राज्यातच तब्बल ८१ % म्हणजे ४४० खासदार आहेत. सत्ता संपादनासाठी लागणारा २७२ हा जादुई आकडा देखील या १३ राज्यातील निम्म्या जागा जिंकल्या तरी गाठायला सोपा जातो. थोडक्यात, या १३ राज्यातून मागच्या वेळी भाजपला काय मिळाले व आता काय मिळणार ते पाहिले तर भाजपचा पराभव स्पष्ट होतो. आधी राज्यवार एकूण जागा पाहू : (१) उत्तरप्रदेश ८० (२) महाराष्ट्र ४८ (३) बंगाल ४२ (४) बिहार ४० (५) तमिळनाडू ३९ (६) मध्यप्रदेश २९ (७) कर्नाटक २८ (८) गुजरात २६ (९) राजस्थान २५ (१०) आंध्र २५ (११) ओडिशा २१ (१२) केरळ २० (१३) तेलंगणा १७. आता भाजपची या राज्यातील मागच्या वेळची कामगिरी पाहू : केरळ व तमिळनाडू या राज्यात भाजपला भोपळा फोडता आला नव्हता. बंगाल, आंध्रमध्ये प्रत्येकी दोन तर तेलंगणा व ओडिशात प्रत्येकी एका...