मनोरंजन

बौद्ध नगरमधील अभिनयकौशल्य अवतरणार रंगमंचावर
मनोरंजन, पिंपरी चिंचवड

बौद्ध नगरमधील अभिनयकौशल्य अवतरणार रंगमंचावर

पिंपरी : बौद्ध नगर मधील जिम हॉल येथे लहान मुला मुलींबरोबरच मोठ्यांचा उत्साह पाहायला मिळाला तो म्हणजे ऑडिशन च्या निमित्ताने. आपल्या परिसरातील विद्यार्थी आणि पालकांना एकत्रित रंगमंचावर अभिनय कला सादर करता यावी, म्हणून येथील परिवर्तन युवा एकताच्या वतीने कलाकारांची निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये एकूण 51 लोकांनी सहभाग घेतला. लहान मुला मुलींचा यात जास्त सहभाग आणि उत्साह दिसून आला. शनिवारी (दि 26 मार्च) या ऑडिशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बौद्धनगर आणि भाटनगर मध्ये सामाजिक , शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि भौगोलिक परिवर्तन घडवून अनण्याच्या उद्देशाने, परिवर्तन युवा एकताची स्थापना झाली असून सर्वांनी राजकीय हेवे दावे बाजूला ठेऊन परिसराचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी एकत्रित काम करण्याचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ठरवले आहे. या मध्येमातून जागतिक महिला दिनाच्या निमित्तान...
सेक्युलवाद्यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ला विरोध का ? या विषयावर विशेष संवाद !
मनोरंजन

सेक्युलवाद्यांचा ‘द काश्मीर फाइल्स’ला विरोध का ? या विषयावर विशेष संवाद !

काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराला ‘व्ही.पी. सिंग सरकार’सह काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सही उत्तरदायी ! - श्री. ललित अंबरदास, काश्मिरी विचारवंत मुंबई : वर्ष 1990 मध्ये केंद्रात व्ही.पी. सिंग यांचे सरकार असतांना एका दिवसात काश्मिरी हिंदूंचा नरसंहार झालेला नाही, तर त्याची सिद्धता खूप वर्षे आधीपासून चालू होती. आधी पैसा पुरवठा, शस्त्रास्त्र प्रशिक्षण, शस्त्र पुरवठा केला गेला. वर्ष 1989 मध्ये फारूक अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री असतांना त्यांना काँग्रेसचा पाठिंबा होता. त्या वेळी काश्मिरी हिंदूंचे नेते टिकालाल टपलू, तसेच न्यायमूर्ती नीलकंठ गंजू यांच्यासह अनेकांच्या हत्या केवळ ते ‘हिंदू’ होते, म्हणून करण्यात आल्या. खरे तर जवाहलाल नेहरू आणि काँग्रेस यांनी काश्मिरमध्ये ‘कलम 370’ आणि ‘कलम 35 अ’ लागू केल्यापासून हिंदूंच्या नरसंहाराला प्रारंभ झाला होता. त्यामुळे काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला ...
नागराज मंजुळे आणि आंबेडकरी सिनेमाचा नवा प्रवाह
मनोरंजन

नागराज मंजुळे आणि आंबेडकरी सिनेमाचा नवा प्रवाह

निखिल वागळे आतापर्यंत तुमच्यापैकी अनेकांनी झुंड बघितला असेल. फेसबुकवर बऱ्याच मित्रांनी झुंडविषयी उत्तम प्रतिक्रिया दिल्या आहे. त्यामुळे झुंड सिनेमाचं नव्याने परिक्षण करावं असं मला वाटत नाही. एक माणूस म्हणून मला हा सिनेमा नखशिखांत हलवून गेला. हा उद्याच्या भारताचा सिनेमा आहे असं मला वाटतं. विषमतापूर्ण समाजात जगताना संधी मिळाली की तरुण मुलं कशी सोनं करतात हे नागराज मंजुळे यांनी फार प्रभावीपणे दाखवून दिलं आहे. ही फक्त एका फुटबॅाल टीमची कहाणी नाही, ही बंड करु पहाणाऱ्या बहुजन समाजाची कहाणी आहे. पुन्हा पुन्हा घ्यावा असा हा अनुभव आहे. हा १७८ मिनीटांचा दीर्घ सिनेमा तुम्हाला पकडून ठेवतो. जात-धर्मा पलिकडे तो पोहेचतो. काश्मीर फाईल्स द्वेष निर्माण करत असेल तर झुंड दुर्दम्य आशा निर्माण करतो. माझा मुद्दा त्या पुढचा आहे. फॅंड्री, सैराट, झुंड या तिन्ही सिनेमात एक समान सूत्र आहे. बाबासाहेब आंबेडकरा...
नागराज सिनेमा कसा बनवतो?
मनोरंजन

नागराज सिनेमा कसा बनवतो?

कादंबरी लिहीण्याचे अनेक फॉर्म्स असतात. गोष्ट सांगण्याची एक शैली असते. पण सिनेमा ही वेगळीच भाषा आहे. ती आजमितीस भारतात सर्वात जास्त कळालेला दिग्दर्शक म्हणजे नागराज मंजुळे. साऊथचे ताकदीचे दिग्दर्शक देखील गावकुसाबाहेरचे सिनेमे अत्यंत ताकदीने दाखवतात. ते ही प्रतिमांचा वापर करतात. पण सिनेमा हे शास्त्र जेव्हढे नागराज कोळून पिला आहे ते माझ्या पाहण्यात अन्य कुणी नाही. उदाहरण म्हणून कर्णन आणि असुरनशी याची तुलना करूयात. असुरनपेक्षा कर्णन मधे प्रतिकांचा वापर मुक्त आहे. प्रतिकांमधून दिग्दर्शक खूप खूप बोलला आहे. हे दृश्य असे अव्यक्त संभाषण आहे. पण गोष्ट मांडण्यासाठी कर्णन आणि असुरनकडे एक ताकदवान घटना आहे जिची कथा चित्रपटाचे सूत्र घट्ट पकडून ठेवते. नागराजच्या झुंडची पटकथा आश्चर्यजनक आहे. तिला ठराविक अशी गोष्टच नाही. ज्यांनी हा चित्रपट फुटबॉल साठी झालेले ट्रान्सफॉर्मेशन म्हण...
झुंड चित्रपटाविषयी काही निरीक्षणे…
मनोरंजन

झुंड चित्रपटाविषयी काही निरीक्षणे…

डॉ. सुनील अभिमान अवचार झुंड चित्रपटाविषयी काही निरीक्षणे... डॉ. सुनील अभिमान अवचार● चित्रपट आणि कॅमेरा हा भांडवलदार आणि सवर्ण जेत्यांच्या कह्यात असतो, त्यांच्या मर्जीतला असतो, पण हाच कॅमेरा खालच्या पायदानवर उद्या असलेल्या माणसाजवळ येतो तेव्हा फँड्री, काला, जयभीम आणि झुंड निर्माण होतो हे विशेष! ● जगभर मुस्लिमांबद्दल lslamophobia पसरत असताना झुंड मुस्लिमांचा acceptation करून मानवी पक्ष पुढे मांडतो. ब्राह्मणी चित्रपट आपल्या हिंदूत्ववादी राजकारणाला बळकटी प्राप्त करून देण्यासाठी मुस्लिमांना खलनायक म्हणून दहशतवादी म्हणून प्रतिमा उभी करतो, याउलट झुंड म...
वर्किंग वुमनवर आधारित बहुचर्चित ‘भावना’ शॉर्ट फिल्म प्रदर्शित
मनोरंजन

वर्किंग वुमनवर आधारित बहुचर्चित ‘भावना’ शॉर्ट फिल्म प्रदर्शित

गोल्डन ईगल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'भावना' शॉर्ट फिल्मला 'बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्म' म्हणून पुरस्कार भावना शॉर्ट फिल्ममधून महिला सशक्तीकरणाचा सामाजिक संदेश पिंपरी : वर्किंग वूमन’ या विषयावर आधारित असलेला बहुचर्चित ‘भावना’ हा लघुपट (शॉर्टफिल्म) आज (९ जानेवारी) 'रेडबड मोशन पिक्चर्स' (Redbud Motion Pictures) या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाला आहे. या लघुपटाला गोल्डन ईगल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 'बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्म' हा पुरस्कार मिळाला आहे. रेडबड मोशन पिक्चरने हा लघुपट बनवला आहे. याचे लेखन, दिग्दर्शन आणि स्क्रीनप्ले सीए अरविंद भोसले यांनी केले आहे. तर पोस्ट प्रोडक्शन (संपादन) पिंपरी चिंचडमधील एपीएच स्टुडिओच्या डायरेक्टर व अभिनेत्री प्रज्ञा पाटील यांनी केले आहे. https://youtu.be/lbPsOOConEY या शॉर्ट फिल्मच्या केंद्रस्थानी काम करणाऱ्या महिला आहेत. ...
अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न म्हणयाला आवडेल | केंद्रिय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांचे प्रतिपादन
पुणे, मनोरंजन

अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न म्हणयाला आवडेल | केंद्रिय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांचे प्रतिपादन

पिंपरी : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हे कविसंमेलन घेतले आहे. ते अण्णा भाऊ स्वत: कवी होते. शाहिर होते, ज्यांच्या साहित्यातील लेखनाची दखल तात्कालिन काळात घेतली गेली नाही, जे आजच्याही काळात वास्तवतेचा अनुभव देते. त्यामुळे अण्णा भाऊंना भारतरत्न म्हणायला आवडेल. भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक होते तर वंचितांच्या असंतोषाचे जनक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे होते असे प्रतिपादन केंद्रिय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांनी केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व अण्णा भाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंती प्रित्यर्थ महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड, मातंग साहित्य परिषद व निवारा बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 'अखिल भारतीय मराठी कविसंमेलनाचे' ऑनलाईन माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. "कवि...
विनोदाची इंटरनॅशनल कंपनी: जॉनी लिव्हर
मनोरंजन

विनोदाची इंटरनॅशनल कंपनी: जॉनी लिव्हर

दासूृ भगत आशिया खंडातील सर्वात मोठी झाेपडपट्टी धारावी ही काही अभिमानाने सांगायची मुळीच गोष्ट नाही पण धारावीचा उल्लेख असाच होतो. धारावी माटूंगा लेबर कॅम्प वस्तीत या पोराचा जन्म झाला. येथील मुलांना बालपण नावाची अवस्था असते का? तिन बहिणी आणि दोन भावाच्या कुटूंबात हा सर्वात मोठा. जॉन राव हे याचं नाव. खूप पूर्वीच आई वडील आंध्र प्रदेश सोडून मुंबईत आले होते. वडील हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीत मशीन ऑपरेटर होते. जॉन १० वर्षांचा असताना कुटूंब किंग्ज सर्कल परीसरातील झोपडपट्टीत स्थायिक झाले. निसर्ग पावसाळ्यात अशा वस्तीवर जरा अधिकच उदार होतो. झोपडीतून जेथून जमेल तेथून तो कुटूंबाना कडकडून भेटत राहतो. जॉन पण आपल्या भावा बहिणी सोबत खाटेवर किडूक मिडूक सांभाळत बसून राही. आई वडील घरात साचलेले गुडघाभर पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करत. छपरातून पण गळती सुरू होई मग जॉन एखादे भांडे घेऊन त्यात ...
अस्वस्थ रंगकर्मींचा ‘एल्गार’ | अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत आंदोलनाचा पवित्रा
मोठी बातमी, मनोरंजन

अस्वस्थ रंगकर्मींचा ‘एल्गार’ | अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत आंदोलनाचा पवित्रा

मुंबई (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : करोना महामारीची झळ आज सर्वांनाच बसली आहे. मनोरंजन क्षेत्र ही याला अपवाद नाही. गेले दीड वर्ष करोनाची लढाई संयमाने लढल्यानंतर आता रंगकर्मींचा धीर सुटत चालला आहे. हाताला काम नसल्याने सर्व रंगकर्मी अस्वस्थ आहेत. आपल्या या अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत आंदोलनाचा पवित्रा सर्व रंगकर्मीनी घेतला असून शासन दरबारी आपल्या मागण्या ते सादर करणार आहेत. या आंदोलनाची दिशा कशी असेल? रंगकर्मीच्या नेमक्या मागण्या काय आहेत? यासाठी नुकत्याच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेते विजय पाटकर, विजय गोखले, दिग्दर्शक विजय राणे, संचित यादव, मेघा घाडगे, शीतल माने, चंद्रशेखर सांडवे, हरी पाटणकर, सुभाष जाधव, प्रमोद मोहिते आदि मान्यवर मंडळी तसेच संघटक व सहसंघटक यांच्या उपस्थितीत ही परिषद संपन्न झाली. यावेळी रंगकर्मींच्या मनातील अस्वस्थता व्यक्त झाली. व त्यांच्या मागण्यांचा...
मनोरंजन

सिनेमा कथा वाचनाच्या उपक्रमाला सुरुवात

पिंपरी चिंचवड : रविवारी (ता. २९ नोव्हेंबर) सायंकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत सिनेमा कथा वाचनाचा कार्यक्रम झाला. अशोका सोसायटी, थेरगाव येथे झालेल्या कार्यक्रमात कलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. चित्रपट संहिता हा सिनेमाचा पाय असतो तो मजबूत असायला पाहिजे तरच निर्माते आणि निर्मिती संस्था या स्पर्धेच्या युगात टिकाव धरू शकतात. आशा वेळी संहिता निवड प्रक्रियेमध्ये निर्मात्यांना चांगली कथा मिळावी आणि लेखकांना चांगला निर्माता मिळवा या एकमेव उद्देशाने हा उपक्रम दर रविवारी राबवण्यात येत आहे. त्यामुळे निर्मात्यांना अनेक कथांचा पर्याय आणि लेखकांना एकाच वेळी अनेक निर्माते यांच्या समोर आपली कथा मांडता येत आहे. त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होते. द रायझिंग स्टार्स आणि विनय सोनवणे चित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्येमाणे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात अनेक अनुभवी लेखक निर्माते दिग्दर्शक यांच्यास...