बाळासाहेब गायकवाड – ख्रिस्ती समाजातील एक घोंघावलेले वादळ
कामिल पारखे
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्वचितच सार्वजनिक व्यासपीठावर हजेरी लावत असत. निवडणुकीच्या काळातच फक्त त्यांच्या मुंबईबाहेर प्रचारसभा होत असत. मात्र, अहमदनगर येथे १३ नोव्हेंबर १९९२ रोजी होणारी ती जाहीर सभा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधणारी ठरली. अहमदनगरच्या त्यादिवशीच्या घडामोडींची बातमी देण्यासाठी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांनी आपल्या मुख्यालयातून बातमीदार पाठवले होते. याचे कारण म्हणजे गेले अनेक दिवस विविध कारणांनी प्रकाशझोतात असलेले ख्रिस्ती कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड हे त्यादिवशी ठाकरे यांच्या उपस्थितीत हिंदू धर्मात पुनर्प्रवेश करणार होते.
महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजजीवनात या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली होती. तसे पाहिले तर महाराष्ट्रात मराठी ख्रिस्ती समाजघटक अगदीच नगण्य आहे, या घटकाच्या अस्तित्वाची आजच्या घडीलाही अनेकांना जाणीवही नाही. संघटीत नसल्याने हा समाज कुठे ...