विशेष लेख

हायप्रोफाइल आयुष्य झुगारणारे तात्या | बस नाम ही काफी हैं ‘एसीपी आर. आर. पाटील’
विशेष लेख

हायप्रोफाइल आयुष्य झुगारणारे तात्या | बस नाम ही काफी हैं ‘एसीपी आर. आर. पाटील’

रोहित आठवले वलयांकित असूनही लोप्रोफाईल आयुष्य जगलेले, स्वता:ला हायप्रोफाइल न समजणारे, हायप्रोफाइल आयुष्य झुगारणारे असे पोलिस अधिकारी म्हणजे तात्या.. उपविभागीय पोलिस अधिकारी आर. आर. पाटील.. दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे सख्खे बंधू असणारे तात्या म्हणजेच राजाराम रामराव पाटील हेही आर. आर. पाटील; पण तात्या म्हणून राज्यभर परिचित आहेत. पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर तात्या आज निवृत्त होत आहेत. पोलिस खात्यात भरती होणारे आणि वयपरत्त्वे निवृत्त होणारे अधिकारी मी खूप पाहिले. मात्र, १२ वर्ष गृहमंत्री तसेच काहीकाळ उपमुख्यमंत्री असणाऱ्या आबांचा सख्खा भाऊ असूनही तात्यांनी महाराष्ट्र पोलिस दलात एक दोन नव्हे तर वीस वर्ष साईड पोस्टिंग केले. एकीकडे ग्रामपंचायत सदस्याचा किंवा आमदाराचा कार्यकर्ता नातेवाईक असल्यास आत्ताचे रिक्रूट (नवं भरती) पोलिस क्रीम पोस्टिंग पद...
महाराष्ट्राचे राजकारण तिस-या लाटेवर स्वार…
मोठी बातमी, विशेष लेख

महाराष्ट्राचे राजकारण तिस-या लाटेवर स्वार…

विजय चोरमारे कोविडच्या तिस-या लाटेवर स्वार होऊन महाराष्ट्राचे राजकारण रंगात आले आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. हंड्या फुटू लागल्या आहेत. रंगपंचमीवर बंदी असल्यामुळे चिखलफेक सुरू आहे. आमच्यावर बंधने आणि तुम्ही मात्र मोकाट असे आरोप केले जात आहेत. या गोंधळात सामान्य माणूस मात्र संभ्रमात सापडल्यासारखा झाला आहे. तिसरी लाट येणार म्हणतात ते खरे की, लाट वगैरे थोतांड आहे म्हणतात ते खरे असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. काय आहे तिस-या लाटेची वस्तुस्थिती ? जागतिक आरोग्य संघटनेसह आरोग्य क्षेत्रातील इतरही आंतरराष्ट्रीय संघटनांकडून वारंवार महामारीच्या लाटांचा उल्लेख केला जातो. पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट वगैरे. एका लाटेचा उल्लेख केला जातो तेव्हा त्यामध्ये संबंधित आजाराचे रुग्ण, त्यांची वाढत वाढत एका विशिष्ट उंचीपर्यंत जाणारी आणि पुन्हा कमी कमी होत येणारी संख्या या ...
राम, कृष्ण, भीष्म म्हणजे हिंदू संस्कृती असेल तर…
विशेष लेख, मोठी बातमी

राम, कृष्ण, भीष्म म्हणजे हिंदू संस्कृती असेल तर…

विश्वंभर चौधरी, ज्येष्ठ विचारवंत भीष्मांना एक त्रासदायक वर मिळालेला होता. त्यांना आधीचे जन्म आठवत असत. भीष्मांचे एकूण ७३ पूनर्जन्म महाभारतात आहेत. माझा स्वतःचा पुनर्जन्मावर विश्वास नाही पण तूर्त आपण महाभारताच्या दृष्टीनंच महाभारताकडे बघू. तर भीष्म शरपंजरी पडले, म्हणजे टोचणाऱ्या बाणांवर झोपले. महाभारतातलं युद्धं तर १८ दिवसात संपलं पण भीष्मांना तब्बल ५८ दिवस शरपंजरी पडावं लागलं. सक्ती कोणाचीच नव्हती. भीष्मांना इच्छामरणाचं वरदान होतं.वाट्टेल तेव्हा ते प्राण सोडू शकत होते. पण शरपंजरी पडून भीष्मांनी शिक्षा भोगली. भीष्मांनी स्वतः दिलेली कारणं दोन. एक तर ५८ दिवसांनी उत्तरायण लागणार होतं. उत्तरायणात मरणं धर्माच्या दृष्टीनं उचित. दुसरं कारण फार वेगळं होतं. भीष्मांना स्वतःच्या एका जन्मातल्या पापाची शिक्षा स्वतःहोऊन भोगायची होती. ७३ पैकी एका जन्मात भीष्म राजकुमार होते. एकदा ज...
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील पूरग्रस्त बांधवाना मदत करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आणि सामाजिक संस्थासाठी थोडं महत्वाचं
विशेष लेख

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील पूरग्रस्त बांधवाना मदत करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आणि सामाजिक संस्थासाठी थोडं महत्वाचं

लोकमराठी : इन्स्पायर फाउंडेशनच्या माध्यमातून ३० जुलैला कोकणातील पोलादपूरला भेट देण्यात आली. या भेटीबद्दलचा वृत्तांत सांगत असतानाच, पोलादपूरला मदत देणाऱ्या राज्यभरातल्या सामाजिक, राजकीय संस्थाना फाउंडेशनतर्फे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे. १. आपण आणलेली मदत कोणाच्याही हाती देऊ नका, हवतर मदतीचा ट्रक, टेम्पो गावाच्या बाहेर ठेवून आधी गावात एक चक्कर मारून या आणि मगच मदत कोणाला द्यायची ती ठरवा. २. आम्ही जे पाहिलं ते अतिशय भयानक अवस्थेतील चित्र की, सारखी सारखी काही मोजक्या ठिकाणीच मदत जात आहे. आणि उरलेले लोक अक्षरशः भीक मागल्यासारखे गयावया करत, जवळ येऊन गर्दी करत लोकांना मदत मागत आहेत. ३. महाड आणि बाजूच्या शहरात आणि शहराच्या बाहेर खूप घाण कचरा असल्यामुळे आता दुर्गंधी निर्माण झाली आहे त्याचाच परिपाक लेप्टोस्पायरसिस मध्ये बदलेल हे नक्की. त्याच मुळे ...
विशेष लेख

पूरपरिस्थिती सरकारी यंत्रणा आणि मदत मागणाऱ्या हजारो संस्था संघटना

भीक नको पण कुत्रा आवर ह्या म्हणीप्रमाणे, कधी नव्हे ते आपत्कालीन परिस्थितीमध्ये पावसाळ्यात मोठ्या झाडाच्या पायथ्याशी जश्या पांढऱ्या छत्र्या उगवतात त्याच प्रमाणे मदत मागणारे उगवतात आणि ह्या छत्र्यांना (मदत मागणाऱ्यांना) कायम हे मोठं झाड (ज्या झाडाखाली ह्या उगवल्यात) ते झाड जणू आमच्यामुळेच उभं आहे की काय अश्या आविर्भावात ही सगळी मंडळी असतात. अश्या हवश्या नवश्या आणि गवश्यानीच आजकालचा डिजिटल मीडिया व्यापून टाकलाय. ज्यांना स्वतःच 30 लोकांचं मित्र मंडळ सांभाळता येत नाही असे लोक राज्याच्या मदतकार्यात उतरलेत. ज्यांनी आजवर भाषणबाजी करत उपाशी लोकांचं पोकळ प्रबोधन केलंय असे खिशातला एक रुपया ही न मोडणारे भिक्कार सो कोल्ड डॉक्टर, प्राध्यापक, वकील आणि फलाना बिस्ताना लोक सुद्धा मदतकार्यात उतरलेत इतकंच काय तर CSR फंड आपल्याच खिशात जावा म्हणून मोठं मोठे कॉर्पोरेट पण यात शामिल झालेत. चांगलं आहे ब...
निकोप समाजासाठी लैंगिक शिक्षणाची गरज
विशेष लेख

निकोप समाजासाठी लैंगिक शिक्षणाची गरज

जेट जगदीश खजुराहोच्या मंदिरांवर कामक्रीडेच्या मिथुन शिल्पांना सन्मानित केलेल्या आणि वात्सयानाने कामक्रिडेला निकोपतेच्या उत्तुंग शिखरावर नेऊन ठेवलेल्या देशात लैंगिक व्यवहारांचे निकोप शिक्षण न दिल्यामुळे समाजात आज शृंगाराच्या नैसर्गिक प्रकृतीची सीमा विकृतीला जाऊन पोहोचली आहे. मुलं वयात आल्यानंतर त्यांच्याशी पालक लिंगसमभाव या विषयावर कधीही खुलेपणाने बोलत नाहीत की त्यांना योग्य पद्धतीने त्यांच्या बदलत्या शरीरशास्त्राची वैज्ञानिक माहितीही देत नाहीत. एवढेच काय पण शाळेतही मानवी पुनरुत्पादनाची माहिती शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थित समजून देण्याऐवजी शाळेतील शिक्षक/शिक्षिकाही मुलांना हा धडा तुम्ही स्वतः वाचा, तुम्हाला सहज समजेल, असे म्हणत हा विषय शिकवणे टाळत असतात. त्यामुळे मुले/मुली लैंगिकतेविषयी पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे बाहेर शोधू लागतात. ती नेहमीच योग्य पद्धतीने मिळतीलच असे नाही. उलट इंटरनेट...
डॉ.तुषार निकाळजे – गुमनाम बादशाह
विशेष लेख

डॉ.तुषार निकाळजे – गुमनाम बादशाह

कोणताही चित्रपट किंवा नाटक यशस्वी होते, तेव्हा त्यामध्ये पडद्यामागील कलाकारांची देखील महत्त्वाची भूमिका समजली जाते. इतर क्षेत्रांतही असेच कलाकार असतात, ते आपले दिलेले काम करीत असताना इतरही वेगळे कामे करीत असतात. याचे एक उदाहरण म्हणजे डॉ.तुषार निकाळजे. डॉ.तुषार निकाळजे डॉ. तुषार निकाळजे हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वर्ष 1991 ते आज पर्यंत गेली तीस वर्षे क्लार्क पदावर काम करीत आहेत .त्यांनी कार्यालयीन काम करीत असतानाच एम. कॉम ,एम .फिल ,पीएच.डी.शिक्षण व संशोधन पूर्ण केले आहे. तसेच त्यांनी पोस्ट डॉक्टरल रिसर्च करिता विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांचेकडे प्रस्ताव सादर केला आहे. डॉ.तुषार निकाळजे यांनी आज पर्यंत दहा पुस्तके लिहिली व प्रकाशित केली आहेत. त्यांनी लिहिलेले "भारतीय निवडणूक प्रणाली ,स्थित्यंतरे व आव्हाने" हे पुस्तक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ- नांदे...
७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने : भारतीय विरुध्द अभारतीय
विशेष लेख

७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने : भारतीय विरुध्द अभारतीय

महेंद्र अशोक पंडागळे बा भीमा तुझे ह्या देशावरचे उपकार कधीही न फिटणारे आहेत, ज्या देशाने आणि देशातल्या लोकांनी तुला शाळेबाहेर बसवले, सेंटीमीटर वरून नाही तर फुटांवरून पाणी दिल तेही त्याना वाटेल तेंव्हा, तुला बडोद्यात घर नाकारणारे सुद्धा हेच, आणि तू चवदार तळ्याचं पाणी चाखल्यावर ते तळ शुद्ध करणारे सुद्धा हेच, बा, तू लढला होतास स्पृश्य स्त्रियांच्या बरोबरीच्या हक्कांसाठी पण तिथंही त्या ब्राह्मण, वैश्य आणि शूद्रांच्या स्त्रियांना तुझा अभिमान वाटला नाहीच, पण आज त्या तुझ्याच मुळे, भयावह अश्या जागतिकीकरनाच्या युगानंतर भांडत आहेत, जमिनीवरची NOC देण्यास नकार देत आहेत बापाच्या मालमत्तेवर बरोबरीने हक्क सांगत आहेत इथेही तूच त्यांच्या कामी आलास, आणि तेंव्हाही तूच होतास जो ज्योतिबांचा आणि आई सावित्रीचा वैचारिक पुत्र ज्याने अडलेल्या नडलेल्या सगळ्या स्त्रियांना मातृवाची भर पगार...
सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारा युवा समाजसेवक ‘वैभव घुगे’
विशेष लेख, सामाजिक

सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारा युवा समाजसेवक ‘वैभव घुगे’

राष्ट्रीय युवा दिन विशेष पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे राहणारा युवा समाजसेवक वैभव दिलीपराव घुगे यांचे मुळगाव वाशिम जिल्ह्यातील उडी (तालुका मालेगाव) हे आहे. वडील डॉ. दिलीपराव घुगे व्यवसायाने डॉक्टर व शेतकरी पण सामाजिक जान असल्यामुळे मिळेल, त्यामध्ये समाधानी होते. त्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्यात चांगली माणसे कामवली. त्यांचे विचार आणि समाजहिताची कामे आजही ते नसतांना लोकांच्या मनात घर करून बसलेले आहेत. त्यांचाच वारसा घेऊन वैभव यांनी आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळेत करून ते अभियांत्रिकी (Mechanical Engineering) व व्यवसाय व्यवस्थापन (MBA) या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत खडतर परिस्थितीत स्वताला प्रत्येक वळणावर सिद्ध करत पुढे घेऊन जाणारा होता. अत्यंत दुर्गम परिस्थितीत शिक्षण पुर्ण करत व वडिल डॉ. दिलीपराव घुगे यांच्या सामाजिक विचारांनी प्रेरित होऊन...
लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवणारा मूकनायक म्हणजेच “पत्रकार”
विशेष लेख

लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवणारा मूकनायक म्हणजेच “पत्रकार”

राष्ट्र कि प्रगती मे "निष्पक्ष पत्रकार" विपक्ष से ज्यादा प्रभावशाली होता है " पत्रकार म्हंटले कि एक पूर्वी चष्मा घातलेला , खांद्याला पिशवी अडकवलेला एक सुशिक्षित व्यक्ती असं चित्रण होत ,परंतु काळ बदलला तसा पत्रकारितेमध्ये सुद्धा मोठा बदल होत गेला . नव्हेतर पत्रकारितेचा चेहरा मोहरच बदलला . आधुनिक यंत्रणा, टेक्निकल स्किल्स, सोशल मीडिया अशा अनेक माध्यमातून हा बदल दिसत गेला. पत्रकारांचं काम हे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रातील माहिती मिळवणं त्याची बातमी बनवून लोकांपर्यंत पोहचवणे व त्यामाध्यमातून सामाजिक प्रबोधन करणे. अनेकवेळा शासकीय व्यवस्था, नेतेमंडळी, पोलीस यंत्रणा, गुन्हेगार यांच्याविरोधात सुद्धा पत्रकारांना भूमिका मांडाव्या लागतात. परंतु हे मांडत असताना निष्पक्ष व निर्भीडपणे लोकांसमोर आली तर अनेकांना न्याय मिळतो. अनेक चुकीचे प्रकार थंबतात. लोकशाहीत माध्यमांचं ...