विशेष लेख

बाळासाहेब गायकवाड – ख्रिस्ती समाजातील एक घोंघावलेले वादळ
विशेष लेख

बाळासाहेब गायकवाड – ख्रिस्ती समाजातील एक घोंघावलेले वादळ

कामिल पारखे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्वचितच सार्वजनिक व्यासपीठावर हजेरी लावत असत. निवडणुकीच्या काळातच फक्त त्यांच्या मुंबईबाहेर प्रचारसभा होत असत. मात्र, अहमदनगर येथे १३ नोव्हेंबर १९९२ रोजी होणारी ती जाहीर सभा संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधणारी ठरली. अहमदनगरच्या त्यादिवशीच्या घडामोडींची बातमी देण्यासाठी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांनी आपल्या मुख्यालयातून बातमीदार पाठवले होते. याचे कारण म्हणजे गेले अनेक दिवस विविध कारणांनी प्रकाशझोतात असलेले ख्रिस्ती कार्यकर्ते बाळासाहेब गायकवाड हे त्यादिवशी ठाकरे यांच्या उपस्थितीत हिंदू धर्मात पुनर्प्रवेश करणार होते. महाराष्ट्रातील ख्रिस्ती समाजजीवनात या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली होती. तसे पाहिले तर महाराष्ट्रात मराठी ख्रिस्ती समाजघटक अगदीच नगण्य आहे, या घटकाच्या अस्तित्वाची आजच्या घडीलाही अनेकांना जाणीवही नाही. संघटीत नसल्याने हा समाज कुठे ...
महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही!
विशेष लेख

महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही!

कुठे नेऊन ठेवताय महाराष्ट्र?शिवसेनेचा वाघ का थंडावलाय? शीतल करदेकर कोण आला रे कोण आला?ऽऽ शिवसेनेचा वाघ आला! अशा घोषणा मा. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांत आणि इतरत्र व्हायच्या! जय भवानी, जय शिवाजी चा नारा जोशपूर्ण तो आजही आहे! पण जोश हरवलाय, वाघ का थंडावला, हा एकच सवाल! तळागाळातील लोकांपर्यंत पोहचलेली, गोरगरीबांच्या रोजच्या जगण्यातील प्रश्न सोडवणारी! गल्लोगल्ली छोटे रोजगार उभे करण्यास मदत करणारी! लोकाधिकार समितीच्या माध्यमातून अमराठींचं लाँबिंग असणाऱ्या क्षेत्रात मराठी तरुणांना नोकऱ्या मिळवून देणारी महाराष्ट्राची शिवसेना! आज सत्तेत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस बरोबर! शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, सावधपणही महत्त्वाचेच, पण आपला ओरिजिनल बाणा सोडून चालत नाही, नाहीतर जंगलचा राजा असलेल्या वाघावर कोल्हे कुत्रीही हल्ले करतात! हे वास्तव आहे! भाजपाने महाराष्ट्रात हात...
क्वारंटाईन सेंटरमधील काळवंडलेले दिवस?
विशेष लेख

क्वारंटाईन सेंटरमधील काळवंडलेले दिवस?

प्रा. डॉ. किरण मोहिते "कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्याने आपणास क्वारंटाईन व्हायला लागेल", असं ऐकल्यावर धडकी भरली. "क्वारंटाईन कस होणार", मी म्हणालो ऍम्ब्युलन्स काहीही पाठवू नका. मी ऍडमिट होण्यासाठी स्वतः येईल. असे सांगून मी क्वारंटाईन होण्यासाठी देहूरोड येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या महात्मा गांधी शाळेत गेलो. 'एमजी क्वारंटाईन केंद्र देहूरोड' असं फलकावर लिहलं होत. फलक अर्धा दुमड्डलेला अर्धा आ वासून कसाबिसा उभा होता. भीत-भीत गेट जवळच्या सुरक्षारक्षकाने हाताने इशारा करून खिडकीजवळ जायला सांगितले. खिडकीजवळ गेलो. जवळच्या मित्रांनी मला मास्क लावलेल्या चेहऱ्याकडे पाहून कसंबस ओळखलं. "का रे इथे कसा काय?" "अरे मला क्वारंटाईन व्हायला साघितलं आहे," हे ऐकलंयावर कावऱ्या बावऱ्या नजरेने पाहत. दुसरीकडे तोंड वळविले. क्षणात मान वळवून निघून गेला. खिडकीतून नर्सने आवाज दिला. आपलं नाव काय? ...
मुख्यमंत्री सहायता निधीत कोरोनासाठी भरभरून मदत, पण कॅन्सरचे रुग्ण मात्र मदतीविना मरणाच्या रांगेत !
विशेष लेख

मुख्यमंत्री सहायता निधीत कोरोनासाठी भरभरून मदत, पण कॅन्सरचे रुग्ण मात्र मदतीविना मरणाच्या रांगेत !

महेंद्र अशोक पंडागळे मागच्या वेळी केरळमध्ये आलेल्या पुराला मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने (देवेंद्र फडणवीस यांनी ) 200 कोटी रुपये दिले होते, असे म्हणतात माहीत नाही. पण तेंव्हापासूनच या निधी कक्षाला काय झालंय काही कळत नाहीये. गेली वर्षभरात कॅन्सर, किडनी आणि हृदयरोगाचे रुग्ण ज्या स्पीडने वाढत आहेत, तरुण लहान मुले पटापट मृत्युमुखी पडत असताना राज्याच्या खात्यातून आणि इतर कोणत्याही ट्रस्टकडून हवी तशी काहीही मदत मिळताना दिसत नाहीये. इतकंच काय तर Tata Trust सारखी इतकी मोठी ट्रस्ट सुद्धा कमी पडायला लागली आहे, अशी भयानक परिस्थितीत आज महाराष्ट्र राज्य आहे. नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने 2014 ला सत्तेत आल्यापासून सामान्य माणसाच्या विकासासाठी काम करणाऱ्या Ngo आणि Trust यांचा FCRA बंद करून बाहेरून येणारी हजारो कोटींची मदत रोखून धरली आणि त्यामुळेच राज्यात 12AA, 80G आणि FCRA असलेल्या हजारो सामाजिक...
समस्त मानवजातीविषयी कळवळा असणारे भारतरत्न बाबासाहेब
विशेष लेख

समस्त मानवजातीविषयी कळवळा असणारे भारतरत्न बाबासाहेब

जगदीश काबरे स्त्रियांच्या प्रगती वरुन देशाची प्रगती ठरते म्हणून स्त्री-पुरुष समानता असणे आवश्यक आहे असे बाबासाहेबांचे मत होते. म्हणूनच स्त्री-पुरुषांना समान वेतन, बाळंतपणाची रजा, घटस्फोटाचा पोटगी कायदा, वारसा हक्कात मुलींना संपत्तीत समान वाटा मिळण्याचा कायदा असे अनेक लाभ स्त्रियांच्या पदरात पाडणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या शिक्षित स्त्रिया आणि उच्चवर्णीय जेव्हा त्यांच्याबद्दल "ते तर 'त्यांचे' नेते आहेत", असे तुच्छतेने बोलतात तेव्हा ते कृतघ्नपणाचा कळस गाठत असतात. ज्या बाबासाहेबांनी स्त्रियांना व्यक्ती म्हणून ओळख मिळावी वर उल्लेखलेले कायदे करून पुरुषकेंद्री समाजाला बाध्य केलं, त्याच बाबासाहेबांविषयी अशा पद्धतीने जेव्हा आजचे शिक्षित - सुशिक्षित नव्हे, त्यांचा एका जातीय दृष्टिकोनातून विचार करत असतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे. हे म्हणजे उपकार कर्त्यावर अपकार क...
विवाहपूर्व समुपदेशनाने लग्न हे “बंधन” न राहता, बहरण होईल
विशेष लेख

विवाहपूर्व समुपदेशनाने लग्न हे “बंधन” न राहता, बहरण होईल

साधना मेघ:श्याम सवाने सद्यस्तिथीत घटस्फोटाचे वाढते प्रमाण एकूणच पाहिले तर, "घटस्फोट घेणे" हा कलंक (stigma) आहे, असे मानणे कमी झालेले आहे. ब्रम्हदेवाने स्वर्गात साता जन्माच्या गाठी मारल्या आहेत म्हणून तुमचे विवाह होतात. ह्या कल्पना आता दिसेनाश्या झाल्या आहेत. त्याचे कारण म्हणजे समाजाची बदलती जीवनशैली आणि स्व च्या अस्तित्वासाठी असणारी धडपड त्यामुळे स्वाभाविकच मुले -मुली स्वतंत्र विचारांना अधिक प्राध्यान देऊन, जेव्हा एकमेकांचे पटत नसेल, दोघेही आपल्या जडणघडणीला, एकमेकांच्या घरातील वातावरणाला जुळवून घेऊ शकत नसतील तर ते एकमेकांपासून मुक्त होण्याचा निर्णय व्यावहारिकरित्या (practically) घेतात. काही जोडप्यांन बाबतीत, लग्नापूर्वी -लग्न ठरल्यावर भरपूर आकर्षण, उत्सुकता, आनंद , संवाद असतो, आणि लग्ना नंतर काही महिन्यातच जबाबदाऱ्या, हरवलेला संवाद, तणाव, रोजचे कलह इत्यादी बघायला मिळते, म्हणून म...
कुजबुज : एक संशयात्मा
विशेष लेख

कुजबुज : एक संशयात्मा

जेट जगदीश गेल्या सहा वर्षांपासून देशात नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकार आहे. ते आल्यापासूनचे अनेक विषय हे हिंदू आणि मुस्लिम अशी विभागणी करणारे आहेत. जसे की, गोहत्या आणि गोमासाच्या नावाखाली झुंडीने हत्या करणे, वंदे मातरम, भारतमाताकी जय म्हणायला बळजबरी करणे, अयोध्येत राम मंदिर उभारणे, काश्मीरचा वेगळा दर्जा रद्द करणे, इत्यादी…. अशी विषयांची यादी बरीच आहे. त्यात भरीस भर म्हणून काश्मिरी लोक मुसलमान आहेत त्यामुळे ते देशद्रोहीपणा करीत आहेत असे तर आजकाल आपले अनेक टीव्हीवाले आणि काही पेपरवालेही सूचित करत असतात. सर्वसामान्य हिंदू लोकांना मुस्लिम समाज, कुटुंबे यांची जवळपास काहीही माहिती नाही. त्यांचे राहणे-वागणे-बोलणे, खाणे-पिणे, भाषा, व्यवसाय, सण-समारंभ, धर्म, धार्मिकता याबाबत त्यांच्या डोळ्यापुढे वा कानावर कोणतेही दखलपात्र (authentic) तपशील येत नाहीत. त्यातल्या त्यात गर्दीमध्ये येता-जाता दिसणाऱ...
जाणून घ्या, विलगीकरण (क्वॉरंटाइन) म्हणजे काय?
विशेष लेख, आरोग्य

जाणून घ्या, विलगीकरण (क्वॉरंटाइन) म्हणजे काय?

लोकमराठी : चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणू संदर्भात विलगीकरण (क्वॉरंटाइन) हा शब्द सातत्याने वापरला जात आहे. अनेकांच्या मनात विलगीकरण म्हणजे काय, याबाबत शंका असते. मात्र, महाराष्ट्र शासनाने सरळ सोप्या मराठी भाषेत विलगीकरणाबाबत सविस्तर माहिती प्रसारीत केली आहे. संशयित व्यक्ती कोण असू शकतो? तीव्र श्वसनाचा आजार असलेला कोणताही व्यक्ती {ज्याला ताप व श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असल्याचे किमान एक लक्षण (खोकला, श्वास घेण्यास त्रास)कोविड-१९ आजाराची लक्षणे दिसण्यापूर्वी १४ दिवसादरम्यान राहत असलेल्या कोणत्याही परिस्थितीत किंवा कोविड-१९ बाधित देशातून / भागातून प्रवास केला असेल तर ती व्यक्ती संशयित ठरू शकते.कोविड-१९ आजाराची लक्षणे दिसण्यापूर्वी १४ दिवसादरम्यान जर श्वसनसंस्थेशी संबंधित आजार असलेल्या व निदान झालेल्या बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला असेल तर ती ...
विशेष लेख, आरोग्य

#Coronavirus : कोरोना विषाणूबाबतच्या शंकासमाधान

उन्हाळा आल्याने किंवा आपण ऊष्ण कटीबंधात असल्याने करोना विषाणूला रोखण्यास मदत मिळेल?तथ्य : आतापर्यंतच्या अहवालानुसार, करोना विषाणू उष्ण आणि दमट हवामान असलेल्या क्षेत्रासह सर्व क्षेत्रात पसरू शकतो.आपण राहत असलेल्या कोणत्याही परिस्थितीत किंवा कोविड-१९ बाधित भागातून प्रवास करत असाल तर संरक्षणात्मक उपायांचा अवलंब करा. कोविड-१९ पासून स्वतःचे संरक्षण करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वारंवार आपले हात साबण व पाणी वापरून स्वच्छ धुणे. असे केल्याने आपण आपल्या हातावर असलेल्या विषाणूंचा नायनाट करतो आणि आपले नाक, तोंड व डोळ्यांना स्पर्श करून उद्भवणारे संक्रमण टाळतो. गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे नवीन करोना विषाणू आजार रोखता येईल?तथ्य : आपल्या शरीराचे तापमान ३७ डिग्री सेल्सिअस एवढे असते, या तापमानात हे विषाणू आपल्या शरीरात संचार करू शकतात आणि गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्यावर काही परिणाम होत नाही. गरम पाण्यान...
विज्ञाननिष्ठ विचारांनी मेंदूची मशागत करा
विशेष लेख

विज्ञाननिष्ठ विचारांनी मेंदूची मशागत करा

जेट जगदीश आपल्यातील अनेक जण विवेकी असतात. त्यांना श्रध्दा, विश्वास, देव, धर्म, रूढी-परंपरा, सण-उत्सवी उन्माद जया सर्व गोष्टींपैकी बहुतेक गोष्टी अजिबात पटत नसतात. संस्कृतीचा भाग म्हणून, कुटुंबियांच्या भावना दुखवू नयेत म्हणून आपण अनेकदा प्रवाहपतितांसारखे काही गोष्टी पाळतो. देव-धर्म पाळण्यातले, पूजा-अर्चा करण्यातले फोलपण समजूनही सामाजिक बंधने म्हणून आपल्यापैकी अनेकजण मनातल्या मनात चडफडत या गोष्टी करीत असतात. यात एक भीतीही असते… बाजूला पडण्याची, एकटे पडण्याची. पण धैर्य दाखवून असे सर्व लोक एकत्र आले, स्पष्ट बोलू लागले तर जगभरातल्या नास्तिकांची संख्या धर्मानुयायांपेक्षा कदाचित जास्तच भरेल. पण ही सारी सायलेन्ट मेजॉरिटी आहे, म्हणून ती मायनॉरिटी वाटते. 'बाबावाक्यम् प्रमाणम्' ही शब्दप्रमाण्यवादी वृत्ती आपल्या संस्कृतीच्या नसानसांत भिनली असावी असं आपले उत्सवी गोंधळ पाहून तरी वाटतं. आधुनिक भ...