राजकारण

राजकारण Politics News Mrathi – LokMarathi News

नेते, कार्यकर्ते व पैसा नसतानाही इंदिरा गांधी पुन्हा देशाच्या पंतप्रधान बनल्या
विशेष लेख, मोठी बातमी, राजकारण

नेते, कार्यकर्ते व पैसा नसतानाही इंदिरा गांधी पुन्हा देशाच्या पंतप्रधान बनल्या

लोकमराठी न्यूज नेटवर्क : पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीत लोकांच्या मुलभूत अधिकारांवरच गदा आली होती. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा दारून पराभव झाला. मात्र, त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे नेते सोडून गेलेले असताना पुरेसे कार्यकर्ते व पैसा नसतानाही त्या पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. याचा अनुभव ज्येष्ठ पत्रकार कामिल पारखे यांनी सांगितला. https://youtu.be/KOZTDLxle4w हे ही वाचा 👇 नथुराम आणि गांधीजी पंधरा वर्षांनंतर महाराष्ट्राने निवडला मुस्लीम खासदार जोश्यांनीं कधी हातात नांगर धरलाय का? दोष धर्मांधतेचा ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पवार कुटुंबीयावर बोलण्याची मोहित कंबोजची लायकी नाही : इम्रानभाई शेख
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व पवार कुटुंबीयावर बोलण्याची मोहित कंबोजची लायकी नाही : इम्रानभाई शेख

कुंभोज यांच्या टिकेला राष्ट्रवादी युवकचे सणसणीत प्रत्युत्तरलायकीत राहून विधान करण्याचा दिला इशारा पिंपरी : राजकीय क्षेत्रात कर्तव्यशून्य असलेल्या मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांवर आरोप सुरु केले आहेत. राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोप-यात लोकांची कामे केली. आमचे प्रेरणास्थान व मार्गदर्शक शरद पवार साहेब, विरोधी पक्षनेते अजितदादा, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार रोहितदादा हे कायम लोकांच्या संपर्कात असतात. म्हणूनच राज्यातील जनता राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबियांच्या पाठीशी असते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करण्याएवढी मोहित कंबोज यांची उंची नाही, कुंबोज यांनी आपल्या लायकीत राहून विधान करावे, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष इम्रानभाई शेख यांनी दिला आहे. भाजपा नेते मोहित कंबोज गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीच्या नेत्...
खासदार संजय सिंग उद्या पुण्यात ; महाराष्ट्र युवा अधिवेशनाला करणार संबोधित
पुणे, राजकारण

खासदार संजय सिंग उद्या पुण्यात ; महाराष्ट्र युवा अधिवेशनाला करणार संबोधित

पुणे : आम आदमी पार्टी युवा आघाडीचे महाराष्ट्र युवा अधिवेशन रविवारी (ता. ३१ जुलै) बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात होत आहे. या अधिवेशनाला आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते व राज्यसभा खासदार संजय सिंग (Sanjay Singh) यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे 'आप' युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. खा. संजय सिंग यांच्याबरोबरच दिल्ली विधानसभेचे सर्वात तरुण आमदार कुलदीप कुमार व गोव्याचे आमदार वेंझी वेगस यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असणार आहे. या अधिवेशनामध्ये रोजगार, शिक्षण, आरोग्य, राष्ट्रनिर्माणामध्ये युवकांचा सहभाग या काही प्रमुख विषयांवर चर्चा होणार असल्याचे युवा आघाडी उपाध्यक्ष व अधिवेशनाचे समन्वयक संदीप सोनवणे यांनी सांगितले. खा. संजय सिंग यांचे आगमन सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन होणार असून ते 11:15 वाजता बिबवेवा...
एकनाथ शिंदे यांचा फोटो म्हणून फिरणारा बाबा कांबळे आहेत तरी कोण?
पिंपरी चिंचवड, राजकारण

एकनाथ शिंदे यांचा फोटो म्हणून फिरणारा बाबा कांबळे आहेत तरी कोण?

https://youtu.be/_JpU4RHrFnc रिक्षा सोबत असलेल्या फोटो संदर्भात अजित पवार यांचा बाबा कांबळे यांना फोन पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिक्षा सोबतचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र, तो फोटो मुख्यमंत्री शिंदे यांचा नसून पिंपरीतील महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे अध्यक्ष बाबा कांबळे यांचा असल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भात माजी उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांना फोन करून 'बाबा तो फोटो तुझाच आहे का?' अशी विचारणा करत व्हायरल फोटो मागील सत्य जाणून घेतले. रिक्षा चालक-मालक, घरेलू कामगार महिला, पथारी, हातगाडी, टपरीधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर संघर्ष करणारे नेतृत्व बाबा कांबळे यांचे आहे. उपोषण, मोर्चे, धरणे आंदोलन करत महापालिका प्रशासन, राज्य शासनाला धारेवर धरून अनेकां...
हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन झाले ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन
महाराष्ट्र, राजकारण

हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन झाले ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन

मुंबई, ता २३ : हिंदुत्व विचाराच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपा बरोबर आले आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शनिवारी पनवेल येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोप प्रसंगी केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निर्माण झालेला विकासाचा अनुशेष त्वरेने पूर्ण करून महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवू, असा विश्वासही श्री.फडणवीस यांनी व्यक्त केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, प्रदेश प्रभारी सी.टी.रवी, सह प्रभारी ओमप्रकाश धुर्वे व जयभान पवैय्या, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेश सरचिटणीस आ. श्रीकांत भारतीय (Shrikant Bhartiya) आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. श्री. फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी ...
आरपीआयच्या महिला उपशहराध्यक्षा सुनिता गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
राजकारण, पिंपरी चिंचवड

आरपीआयच्या महिला उपशहराध्यक्षा सुनिता गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पिंपरी, ता. २० : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) महिला उपशहराध्यक्षा सुनिता केशव गायकवाड व कार्यकर्ता कांता दत्तु मोरे यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम व महिला शहराध्यक्षा सायली किरण नढे यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी माजी नगरसेवक सद्गुरु कदम, विठ्ठल शिंदे, दहीतुले अण्णा, अर्जुन लांडगे, आकाश शिंदे, किरण नढे, जुबेर खान आदी उपस्थित होते. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट कारभारामुळे जनताच भाजपला हद्दपार करणार – अजित गव्हाणे
पिंपरी चिंचवड, राजकारण

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्ट कारभारामुळे जनताच भाजपला हद्दपार करणार – अजित गव्हाणे

पिंपरी : गेल्या पाच वर्षांत (PCMC) पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी केलेल्या भ्रष्ट कारभारामुळे शहरातील जनताच भाजपला सत्तेतून हद्दपार करणार आहे. राज्यातील सत्ता बदलचा महापालिका निवडणुकीवर कोणताच परिणाम होणार नसून विजय आपलाच आहे. शंभर प्लस हे आपले मिशन असून ते साध्य करण्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले आहे. काळेवाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शहर कार्यकारणी बैठक उत्साहात संपन्न झाली. यावेळी अजित गव्हाणे बोलत होते. पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारणी, विधानसभा कार्यकारी, सर्व सेलची कार्यकारणी तसेच प्रभाग अध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थिती पहिली मासिक सभा पार पडली. त्याप्रसंगी महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इ...
डॉ. सागर वागज यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश
पिंपरी चिंचवड, राजकारण

डॉ. सागर वागज यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश

चिंचवड : डॉ. सागर वागज (Dr Sagar Wagaj) यांनी आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा स्मिता पवार यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश करण्यात आला. यावेळी डॉक्टर विंग अध्यक्ष अमर डोंगरे, पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष वहाब शेख, पिंपरी चिंचवड आम आदमी पार्टी संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, आप पिंपरी चिंचवड प्रवक्ते प्रकाश हगवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वागज होमिओपॅथी हॉस्पिटलच्या (Wagaj Homeopathic Hospital) माध्यमातून गेली १६ वर्षापासून पूर्णानगर, शाहूनगर व संभाजीनगर या भागामधील नागरिकांना ते सेवा देत आहेत. डॉ. सागर वागज म्हणाले की, "(Aam Aadmi Party) आम आदमी पार्टीचे दिल्ली (Delhi) आणि पंजाब (Panjab) येथील काम पाहून मी प्रेरित होऊन आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. आज केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकार State...
सिनेट निवडणुकीसाठी शहरातून १५००० पदवीधरांची नोंदणी करणार : अजित गव्हाणे
राजकारण

सिनेट निवडणुकीसाठी शहरातून १५००० पदवीधरांची नोंदणी करणार : अजित गव्हाणे

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी, ता. १ जुलै : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सिनेट निवडणुकीसाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनात बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी प्रदेशचे विध्यार्थी आघाडीचे अध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी मागील निवडणुकीची रणनीती सांगितली. शहर राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष डॉ. संदीप तापकीर यांनी पदवीधरांची नोंदणी कशीकरायची याबद्दल मार्गदर्शन केले. पदवीधर संघाचे शहराध्यक्ष माधव पाटील यांनी सिनेट निवडणूक का महत्त्वाची, हे सांगितले. यावेळी माधव पाटील म्हणाले की, शहरातून सिनेटवर एक तरी प्रतिनिधी निवडून जावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. शहरातील विद्यार्थ्यांना विद्यापीठातील अनेक योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी शहर राष्ट्रवादीने पदवीध...
उपमुख्यमंत्र्यांना भाषण करू न देणे, हा भाजपचा कपटीपणा : दत्तात्रय जगताप
राजकारण

उपमुख्यमंत्र्यांना भाषण करू न देणे, हा भाजपचा कपटीपणा : दत्तात्रय जगताप

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क देहू : येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भाषण करू न देणे, हा भाजपचा कपटीपणा आहे. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अर्बन सेलचे शहराध्यक्ष दत्तात्रय जगताप (Dattatray Jagtap) यांनी व्यक्त केली आहे. जगताप म्हणाले की, श्रीक्षेत्र देहू (Dehu) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या शिळामंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राज्यातील भाजपचे मोठे नेते उपस्थित होते, परंतु पंतप्रधान येणार म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार हे प्रोटोकॉल नुसार, किंवा राजशिष्टाचार म्हणून स्वतः उपस्थित होते. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत करण्यासाठी अजित पवार हे विमानतळावरही उपस्थित होते. रा...