वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य – राजेंद्र कोळी

वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य - राजेंद्र कोळी

किनवली (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे, तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याचे काम विद्यार्थीदशेतच केले तर विज्ञाननिष्ठ पिढी घडवायला जास्त प्रभावी ठरेल होते. असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सांस्कृतिक विभाग समितीचे सदस्य राजू कोळी यांनी व्यक्त केले.

ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जागतिक विज्ञान दिनाच्या निमित्त आयोजित किनवली येथील महाविद्यालयात बोलत होते. २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रसिद्ध वैज्ञानिक सी व्ही रमण यांनी आपले शोध याच दिवशी १९२८ ला जगापुढे मांडलेत. त्याचे औचित्य साधून राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विविध शाळा कॉलेजेस मध्ये जावून या विज्ञान दिनाच्या निमित्ताने सातत्याने प्रबोधनाचे कार्यक्रम राबवून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचे आवाहन करीत असते. त्याचाच एक भाग म्हणून कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय किनवली येथे विज्ञान दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य - राजेंद्र कोळी

या कार्यक्रमांमध्ये जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी तसेच काही पालकांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राध्यापकासह प्राचार्या सुषमा साबनीस, महाविद्यालयाचे सचिव खंडेराव विसे हे आवर्जून उपस्थित होते. राजू कोळी आणि शाहीर स्वप्नील शिरसाट यांनी प्रबोधनात्मक गीतां सोबतच चमत्कार सादरीकरण करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाहीर स्वप्निल साहू यांनी शाहिरीच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोनाची भूमिका मांडताना कॉलेजमधील युवकांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन या कार्याला जोडून घेतले पाहिजे, असे आवाहन केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कुठल्याही जात-पात धर्माच्या विरोधात नसून केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी कटिबद्ध आहे. असे विचार त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेले ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या मासिकाचे वर्गणीदार होऊन विवेकवादी चळवळीला हातभार लावावा असे आवाहन शाहीर स्वप्निल साहू यांनी सर्व उपस्थितांना केले. अशा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन वारंवार व्हायला हवे. असे मत अनेक विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी व्यक्त केले.