
- राज्यस्तरावर निरंतर धाडसत्र सुरू
- एका दिवसात १०२ गुन्ह्यांची नोंद
- १६ लाख ३४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त
मुंबई ता, १२ (लोकमराठी) : राज्यातील सर्व मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद असून अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, विक्री विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर निरंतर धाडसत्र सुरू आहे. काल एका दिवसात (११ एप्रिल २०२०) राज्यात १०२ गुन्हे नोंदविण्यात आले असून ४६ आरोपींना अटक करण्यात आली. ८ वाहने जप्त करण्यात आली असून १६ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याबरोबरच २४ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत पूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये राज्यात २ हजार ३८३ गुन्हे नोंदविण्यात आले असून ९३७ आरोपींना अटक, तर ११५ वाहने जप्त करण्यात आली असून ५ कोटी ७१ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
येथे करा तक्रार
अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्रीविरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा २४×७ नियंत्रण कक्ष सुरू आहे. या नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३३ तर व्हाट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ असा आहे. यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. नमूद क्रमांकावर अवैध मद्याबाबतची तक्रार नोंद करण्यात यावी, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत करण्यात आले आहे.
- PIMPRI CAMP: डिलक्स मॉलमध्ये बनावट पेनड्राईव्ह, मेमरी कार्डची विक्री; तिघांवर गुन्हा दाखल
- सोन्या-चांदीच्या किमतींनी नवे शिखर गाठले: पुढे काय?
- Viralvideo : प्रेमाच्या त्रिकोणातून मैत्रीचा संघर्ष; दोन मुलींची तुफान हाणामारी
- Pune Crime : पुणे जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता ‘एसीबी’च्या जाळ्यात
- HADAPSAR : एस. एम. जोशी कॉलेज येथे एक दिवसीय जिल्हास्तरीय ‘लिंगभाव संवेदनीकरण’ कार्यशाळा संपन्न.