मोठी बातमी

नगरपालिकेच्या उपमुख्याधिकाऱ्यासह निरिक्षकांच्या लाचखोर टोळीवर एसीबीची कारवाई
महाराष्ट्र, मोठी बातमी

नगरपालिकेच्या उपमुख्याधिकाऱ्यासह निरिक्षकांच्या लाचखोर टोळीवर एसीबीची कारवाई

सातारा : कचरा उचलण्याऱ्या ठेकेदाराची डिपोझिट रक्कम परत मिळवून देण्यासाठी दोन लाख ३० हजार रूपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या उपमुख्याधिकाऱ्यासह तीन निरिक्षकांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने (एसीबीने) सोमवारी (ता. 8) कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात उपमुख्याधिकारी संचित कृष्णा धुमाळ, वर्ग -२ (वय 33 वर्ष, सातारा नगरपरिषद रा. फोर्ट व्हिव्ह बी १3, १०० केसरकर पेठ सातारा, मूळ रा. रिया बी रायकरनगर धायरी, पुणे-४१), प्रविण एकनाथ यादव (वय ५१ वर्ष, आरोग्य निरीक्षक, रा . ३२२ धादमे कॉलनी, करंजे पेठ सातारा), गणेश दत्तात्रय टोपे (वय ४3 वर्ष, स्वच्छता निरीक्षक , रा .१२८ यादोगोपाळ पेठ सातारा), राजेंद्र कार्यगुडे (आरोग्य निरीक्षक रा .१७२ / २ एसटी कॉलनीचे पाठीमागे सातारा) यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीने दिलेल्...
पिंपरी चिंचवडमध्ये सैराटची पुनरावृत्ती | मागासवर्गीय तरूणाचा खून | आरोपींविरोधात ऍट्रासिटीसह खूनाचा गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पिंपरी चिंचवडमध्ये सैराटची पुनरावृत्ती | मागासवर्गीय तरूणाचा खून | आरोपींविरोधात ऍट्रासिटीसह खूनाचा गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड: प्रेमप्रकरणातून एका तरुणाचा खून करण्यात आला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात सहा जणांवर ऍट्रासिटीसह खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथे रविवारी (ता. 7) रात्री घडली. विराज विलास जगताप (वय 18) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा काका जितेश वसंत जगताप (वय 45, रा. जगताप नगर, बुद्ध विहार जवळ, पिंपळे सौदागर) यांनी सोमवारी (दि. 8) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर हेमंत कैलास काटे, सागर जगदीश काटे, रोहित जगदीश काटे, कैलास मुरलीधर काटे, जगदीश मुरलीधर काटे, हर्षद कैलास काटे (सर्व रा. पिंपळे सौदागर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विराज याचे आरोपीच्या नातेवाईक तरुणीशी प्रेमसंबंध होते. या कारणावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून रविवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथ...
महाराष्ट्र बचाओ नाही, हे तर भाजप बचाओ आंदोलन – बाळासाहेब थोरात
राजकारण, महाराष्ट्र, मोठी बातमी

महाराष्ट्र बचाओ नाही, हे तर भाजप बचाओ आंदोलन – बाळासाहेब थोरात

राज्यातील भाजप नेत्यांची निष्ठा महाराष्ट्राशी नाही, दिल्लीतील भाजप नेत्यांसोबतभाजप नेत्यांनी महाराष्ट्रद्रोह करू नये मुंबई : महाराष्ट्र भाजपच्या वतीने सुरू करण्यात आलेले आंदोलन हे महाराष्ट्र बचाओ आंदोलन नसून भाजप बचाओ आंदोलन आहे. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात सरकार सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते झोकून देऊन काम करत आहेत, या संकटकाळात भाजप कोठेही दिसत नाही, त्यामुळे अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपकडून ह्या आंदोलनाचा फार्स उभा केला जात आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे महसूल मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. व्हिडीओ पहाण्यासाठी क्लिक करा या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, 'कोरोनाच्या संकटात राजकारण करायचे नाही, सर्वांनी एकजुटीने या संकटाचा सामना करण्याची ही वेळ आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही ही भूमिका मांडली होती, पण त्य...
भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती व्यवसाय मोठ्या संकटात – शरद पवार
राष्ट्रीय, मोठी बातमी

भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती व्यवसाय मोठ्या संकटात – शरद पवार

शरद पवारांचे पंतप्रधानांना कृषी क्षेत्रातील संकटाबाबत पत्र मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी शेतीशी निगडीत कामे करण्यास सक्षम नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे आपण त्वरित शेतीविषयक ठोस धोरण जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी क्षेत्रावरील संकट लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान आपण पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या हितासंबंधी निर्णय घेण्यास पुढाकार घेवून आवश्यक ती पावले उचलावी अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे. अर्थमंत्री श्रीमती निर्मला सी...
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करा; आप युवा आघाडीची मागणी
महाराष्ट्र, मोठी बातमी

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करा; आप युवा आघाडीची मागणी

मुंबई : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सर्व अडकलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवास मोफत करण्यात यावा. अशी मागणी आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीने केली आहे. आम आदमी पक्षाच्या युवा आघाडीने निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने रातोरात आपला निर्णय बदलून मोफत एस टी बस सेवा ही केवळ महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील मजुरांसाठी असेल असा निर्णय दिला. एका बाजूला शासनाने कोटा शहरातून विद्यार्थ्यांना आराम बसमधून मोफत आणले, दुसरीकडे पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी रोजगाराची संधी शोधत, स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना दुप्पट तिकीट आकारण्याचा निर्णय म्हणजे गेले दीड महिने अडकून पडले, विद्यार्थ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. हे सर्व विद्यार्थी परीक्षांच्या अनिश्चित वेळापत्रकाअभावी या शहरांमध्ये थांबून होते. यातील बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबामधून असल्यामुळे अश...
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना होणार मोफत डाळ वाटप
मोठी बातमी, महाराष्ट्र

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना होणार मोफत डाळ वाटप

मुंबई : पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्यांसाठी नियमित धान्यासोबतच प्रति महिना प्रती कार्ड १ किलो चणाडाळ किंवा तुरडाळ मोफत वाटप केली जाणार आहे, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या अन्न,नागरी पुरवठा विभागाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत असून अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत राज्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना तीन महिन्यासाठी प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचे वाटप नियमित करण्यात येत आहे. त्याचपार्श्वभूमीवर या लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी मोफत डाळ वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला अ...
Lockdown : 39 किलोमीटरचा प्रवास करून सर्पमित्राने केली आजी व चिमुरड्यांची सुटका (व्हिडीओ)
पुणे, मोठी बातमी

Lockdown : 39 किलोमीटरचा प्रवास करून सर्पमित्राने केली आजी व चिमुरड्यांची सुटका (व्हिडीओ)

लोकमराठी न्यूज नेटवर्क पुणे : उरूळी कांचनजवळील एका घरात भलामोठा साप शिरला, आणि सगळ्यांचीच पाचावर धारणा झाली. आतील सर्वांनी घराबाहेर पळ काढला. मात्र, घरातील खाटेवर असलेल्या वयोवृद्ध आजीजवळ दोन चिमुरड्यांनी आसरा घेतला. अशा घाबरलेल्या परिस्थितीत कोणालाच काही कळेना. त्याचवेळी सर्पमित्र लक्ष्मण पांचाळ यांना फोन करून कळविण्यात आले. लॉकडाऊन असतानाही पांचाळ व त्यांची पत्नी सीमा यांनी चिंचवड येथून 39 किलोमीटरचा प्रवास करत सापाला पकडून जंगलात सोडून दिले. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. शनिवारी (ता. 25) दुपारी ही घटना घडली. उरूळी कांचन जवळील महाराजा आकादमी येथे एका घरात सुमारे सात फुट लांबीचा साप शिरला. त्यावेळी सर्वांनीच घरातून धुम ठोकली. मात्र, दोन चिमुरड्यांनी घरातच खाटेवर असलेल्या आजीजवळ जीव मुठीत धरून...
Covid-19 : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले आणखी १२ करोनाबाधित रूग्ण
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

Covid-19 : पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले आणखी १२ करोनाबाधित रूग्ण

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. एकाच दिवसात तब्बल १२ करोनाबाधित आढळल्याने सध्या शहरात भीतीचे वातावरण आहे. पिंपरी चिंचवडमधील करोनाबाधितांचा संख्या ७९ वर पोहचली आहे. आतापर्यंत २१ जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. करोनामुळे आज ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे. दरम्यान, आज सापडलेल्या १२ करोना बाधितांमध्ये लहान मुले, महिला, पुरुष यांचा समावेश असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूने आणखीच फास घट्ट आवळला असून एकाच दिवसात तब्बल १२ जण करोना पॉजीटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. यात महिला, लहान मुले आणि पुरुष आहेत अशी माहिती महानगर पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे. त्यामुळे शहरातील करोना बाधितांची संख्या ७९ वर पोहचली असून चिंता वाढली आहे. करोना बा...
Coronavirus : खरेदीत मलई खाण्यासाठी अधिकाऱ्याला दमबाजी
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

Coronavirus : खरेदीत मलई खाण्यासाठी अधिकाऱ्याला दमबाजी

पिंपरी : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी चालविलेल्या प्रत्येक खरेदीत आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना वाढीव दराने काम देण्यासाठी काही माजी पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांचा दबाव आणण्याचा निर्ल्लज प्रकार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सुरु आहे. जादा दराने ठराविक ठेकेदारांकडून खरेदी करण्यास एका अधिकाऱ्याने विरोध केला असता मंगळवारी काही माजी पदाधिकाऱ्यांनी मनपा आवारातच त्याला दमबाजी केली. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रकाराचा धसका घेतल्याने त्या अधिकाऱ्याला व्हील चेअरच्या सहाय्याने थेट रुग्णालयात दाखल करावे लागले. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कोरोनाचा वाढता संर्संग रोखण्यासाठी संपूर्ण शहर लॉकडाऊन असून मनपाचे केवळ १० % कर्मचारी कामावर आहेत. तसेच महानगरपालिकेची मार्च व एप्रिल महिन्याच्या सर्वसाधारण सभा तहकूब करण्यात आल्या असून स्थायी समितीच्या बैठकासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. ...
पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन प्रकरण भडकवू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्र, मोठी बातमी

पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन प्रकरण भडकवू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सर्व हल्लेखोर तुरुंगात, सीआयडी कसून तपास करीत आहे मुंबई, ता. २० : पालघर येथे तीन जणांची जमावाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून यातील प्रमुख ५ हल्लेखोर आणि सुमारे १०० जणांना पकडले असून गुन्हा अन्वेषण विभाग कसून तपास करीत आहे. मृतांमध्ये दोन साधू होते मात्र या प्रकरणाला कुणीही धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. ते आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत होते. सध्या आम्ही कोरोनाचे युद्ध नेटाने लढत आहोत. काही जण या घटनेवरून सोशल मीडियाच्या माध्यमातून वातावरण तापवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी याविषयी गृहमंत्री अमित शहा यांना सकाळी दूरध्वनीवरून बोलून सर्व कल्पना दिली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. या घटनेवर अधिक भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, १६ तारखेस कासा पोलीस ठाणे हद्दीत ज्या ठिकाणी हा घृणास्पद ...