इंदुरीकर महाराजांवर इतका गदारोळ कशासाठी? तृप्ति देसाई! स्त्रीपुरुष समानता हवीच! पण भान सोडू नका!
शीतल करदेकर
इंदुरीकर महाराजांबद्दल इतका गदारोळ कशासाठी?असे विषय कोण का पेटवतं? स्त्रीपुरुष समानताहवीच, एकमेकांचा आदरही करायला हवा याची जाणीव स्त्रीसक्षमीकरणासाठी काम करणा-या बहुसंख्य महिलांना आहे. महिलांच्या हक्काची लढाई तृप्ती देसाई यांनी मंदिर प्रवेशापासून केली. त्यांचं योगदान मोठं आहे. पण त्याही आपलं भान सोडू लागल्याचं दिसतंय! त्यानी चक्क मुख्यमंत्र्यांना कोंडण्याची भाषा केली. ही अयोग्य आहे. कारण विषय कोणता काय बोलतोय कुणाशी जोडतोय हे कळत नाही असं दिसतय.
देसाईबाईंचे कार्यक्रम आंदोलनं आणि त्यांची भूमिका संशयास्पद वाटण्याची चर्चा आहे. त्यांनी इंदुरीकर महाराजांच्या तोंडाला काळं फासू म्हटलं अनेक आरोप केले.कशासाठी तर महाराज सम विषम तारीख,स्त्रीपुरुष संग या विषयी बोलले.यात स्त्रीचा अपमान व्हावं असं काय होतं? नंतर महाराजांच्या वादात इतर समर्थक घूसले, त्यांनी अभद्र भाषा वापरली.त्यांचेवर क...