एनयुजेएम तर्फे नाशिक जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन; परिषदेचा माध्यमांप्रती असलेल्या उदासीनतेबाबत निषेध
नाशिक, (लोकमराठी) : भारतीय लोकशाहीचे संसद, न्यायपालिका प्रशासन हे तीन आधारस्तंभ असून यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या तीनही स्तभांचे कामकाज जनतेच्या दरबारात मांडण्यासाठी चौथा आधारस्तंभ म्हणून माध्यमे कार्यरत आहेत. याच अनुशंगाने गुरुवारी (ता. 2 डिसेंबर) जिल्हापरिषदेतील निवडणुकीच्या वार्तांकनासाठी राज्यपातळीवरील माध्यमांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली असता रावसाहेब थोरात सभागृहात त्यांना येण्यास परवानगी नाकारण्यात आली.
सभागृहाच्या शेजारी 10 बाय 10 च्या छोट्या धूळ, घाण, कचरा, तुटक्या खुर्च्या, टेबलने भरलेल्या रूममध्ये उभे राहून वार्तांकन करण्यास जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. पर्याय नसल्याने सुमारे 45 प्रतिनिधिनी या रुममध्ये उभे राहून वार्तांकन करीत नाशिक जिल्हा परिषदेची बातमी संपूर्ण राज्यात पोहचविली.
नाशिक जिल्हा परिषदेने निवडणुकीदरम्यान केलेली ही अक्षम्य चूक आम्ही जनतेच्या द...