राष्ट्रीय

National News Marathi

धक्कादायक ! महिला तहसीलदाराला कार्यालयातच जाळले
मोठी बातमी, राष्ट्रीय

धक्कादायक ! महिला तहसीलदाराला कार्यालयातच जाळले

हैदराबाद, (लोकमराठी) : तेलंगणमध्ये एका महिला तहसीलदाराला कार्यालयातच भरदिवसा जिवंत जाळण्याची भयानक घटना घडली आले. रंगा रेड्डी जिल्ह्यातील अब्दुलपूरमेट येथील या घटनेमागे जमिनीचा वाद असल्याचा पोलिसांचा संशय आहे. विजया रेड्डी (वय ३०) असे तहसीलदाराचे नाव असून यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघे होरपळून जखमी झाले. हल्लेखोरही होरपळून जखमी झाला आहे. कुरा सुरेश असे हल्लेखोराचे नाव असून, तो गोवेरेल्लीचा रहिवासी आहे. सोमवारी (दि. 4) दुपारी दीडच्या सुमारास त्याने तहसील कार्यालयात येऊन विजया रेड्डी यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. सुरेश हा शेतकरी असल्याचे कळते. बाचेरान या गावात त्याची सात एकर जमीन असून, ती त्याच्या भावाबरोबर वादात आहे. या संदर्भात न्यायालयात सुनावणीही सुरू आहे. त्यातून ही घटना घडल्याचा संशय राचेकोंडाचे पोलिस आयुक्त महेश भागवत यांनी...
अयोध्येत जमावबंदी आदेश लागू ; मीडिया डिबेट घेण्यासही मज्जाव
राष्ट्रीय, मोठी बातमी

अयोध्येत जमावबंदी आदेश लागू ; मीडिया डिबेट घेण्यासही मज्जाव

अयोध्या, (लोकमराठी) : अयोध्या (उत्तर प्रदेश) प्रकरणाची सुनावणी पुर्ण झाली असून सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी लागू शकतो. त्यामुळे या पार्श्वभूमीवर अयोध्येत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात पोलिसांनी शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन जनतेला केले आहे. अयोध्या प्रकरणावर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. येत्या काही दिवसांत याविषयी निकाल अपेक्षित असल्यामुळे उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र सरकारने हा संवेदनशील विषय हाताळण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत जमावबंदी आदेश लागू केला आहे. त्यामुळे आता शहर परिसरात नागिरकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे. तसेच कोणत्याही विषयावर मीडिया डिबेट घेण्यासही मज्जाव केला आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी अंजू झा यांनी 31 ऑक्टोबर रोजी या संदर्भात आदेश दिले आह...
प्रियकराबरोबरच्या शरीरसंबंधामुळे तिने केली आईची हत्या
राष्ट्रीय

प्रियकराबरोबरच्या शरीरसंबंधामुळे तिने केली आईची हत्या

हैदराबाद, (लोकमराठी) : येथील रंजीता हत्या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. आई बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांच्या तपासामध्ये आपण आईची हत्या केल्याची कबुली देणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने मित्राच्या दबावाखाली येऊन गुन्हा केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या किर्ती रेड्डी या तरुणीचे प्रियकर बाल रेड्डीबरोबर शारीरीक संबंध होते. ही गोष्ट किर्तीच्या शेजरी राहणाऱ्या शशीला ठाऊक होती. यावरुनच तो तिला पैश्यांची मागणी करत ब्लॅकमेल करत होता. याच दबावाला बळी पडून किर्तीने आपल्याचा आईची हत्या केली. या प्रकरणामध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किर्ती आणि बाल यांचे शरीरसंबंध असल्याची माहिती शशीला होती. यावरुनच तो किर्तीला कायम ब्लॅकमेल करत असे. “१० लाख रुपये दे नाहीतर मी तुझ्या आईला तुमच्या दोघांबद्दल सगळं काही सांगेन,” अशी ध...
काँग्रेसच्या नेत्याचा कार्यक्रमातच हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू
राष्ट्रीय

काँग्रेसच्या नेत्याचा कार्यक्रमातच हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू

प्रयागराज (वृत्तसंस्था) : धार्मिक कार्यक्रम सुरू असतानाच काँग्रेसच्या नेत्याचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निधन झालेल्या काँग्रेसच्या नेत्याचं नाव एहतेशाम रिझवी असं होतं. एहतेशाम रिझवी हे उत्तरप्रदेशातील काँग्रेस नेते होते. एका धार्मिक कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यादरम्यान, त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि ते जमिनीवर कोसळले. कार्यक्रमादरम्यान एहतेशाम रिझवी यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते तेथेच जमिनीवर कोसळले. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला. यानंतर रिझवींना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ही सर्व घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एहतेशाम रिझवी हे 65 वर्षांचे होते....
राष्ट्रपतींच्या हस्ते शारदा दाते यांना वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
राष्ट्रीय

राष्ट्रपतींच्या हस्ते शारदा दाते यांना वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली (लोकमराठी) : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील शारदा दाते यांना राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज ‘वयोश्रेष्ठ प्रतिष्ठित माता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने 1 ऑक्टोबर या आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात ‘वयोश्रेष्ठ पुरस्कार-2019’ प्रदान करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री थावरचंद गहलोत, राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर आणि विभागाच्या सचिव निलम साहनी,अतिरिक्त सचिव उपमा श्रीवास्तव यावेळी मंचावर उपस्थित होत्या. उल्लेखनीय योगदानासाठी 12 श्रेणींमध्ये देशातील व्यक्ती व संस्थांना यावेळी एकूण 15 पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्वत:च्या असाध्य रोगावर मात करत आपल्या गतिमंद मुलाला इंटरनॅशनल सेलिब्रेटी बनविण्याची किमया करणाऱ...
मदतीसाठी केंद्र शासनाला सविस्तर ज्ञापन सादर करणार – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती
राष्ट्रीय

मदतीसाठी केंद्र शासनाला सविस्तर ज्ञापन सादर करणार – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

पूरग्रस्त भागाच्या पाहणीनंतर केंद्रीय पथकाची महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सचिवांसोबत बैठक मुंबई (लोकमराठी) : कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाकडून महापुराची भीषणता केंद्र शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यानंतर केंद्राकडून महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मिळेल, अशी आशा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. पूरग्रस्त भागाच्या मदतीसाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे 6800 कोटी रुपयांचे पहिले ज्ञापन (मेमोरेंडम) पाठविण्यात आले असून केंद्रीय पथकाच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर आता सविस्तर ज्ञापन सादर केले जाणार आहे. केंद्राच्या मदतीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत. त्याची अंमलबजावणी राज्य शासनाकडून सुरू आहे, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे ...
निर्यातवाढ व परकीय चलनवृद्धीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत – केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांचे निर्देश
राष्ट्रीय

निर्यातवाढ व परकीय चलनवृद्धीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत – केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांचे निर्देश

मुंबई (लोकमराठी) : आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रगती होऊन निर्यातवृद्धीमधून जास्तीत जास्त परकीय चलन मिळविण्यासाठी उद्योगांना चालना देण्यात यावी, अशा सुचना केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी काल संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विशेष आर्थिक क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा, तेथील उद्योगांचे कामकाज, कार्यप्रणालीतील सुटसुटीतपणा, निर्यातवाढीसाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, रोजगार निर्मिती आदी विविध बाबींचा आढावा संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विकास आयुक्त सिप्ज-सेझ श्रीमती मिता राजीव लोचन तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते.बैठकीत सुरुवातीला विकास आयुक्त श्रीमती लोचन यांनी महाराष्ट्र, गोवा, दमन, दिव या परिमंडळातील विशेष आर्थिक क्षेत्रांच्या प्रगतीचा तसेच उद्योगवाढ व परकीय चलनवृद्धीसाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, कार्यप्रणाली...
मोदी सरकारमुळे देश मंदीच्या गर्तेत; माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे टिकास्त्र
राष्ट्रीय

मोदी सरकारमुळे देश मंदीच्या गर्तेत; माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे टिकास्त्र

नवी दिल्ली (लोकमराठी) : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देशाच्या जीडीपी दरात झालेल्या घसरणीबद्दल मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भारतातल्या आर्थिक क्षेत्रात आलेल्या मरगळीसाठी त्यांनी मोदी सरकारला जबाबदार ठरवले आहे. ही आर्थिक मंदी मानवनिर्मित असून ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. मनमोहन सिंह म्हणाले, “गेल्या तिमाहीत जीडीपी विकास दर ५ टक्के होता. यातून हे स्पष्ट होते की देश मोठ्या स्लोडाऊनमधून जात आहे. भारताकडे जास्त वेगाने विकास करण्याची क्षमता आहे. पण मोदी सरकारच्या अव्यवस्थापनामुळे परिस्थिती बिघडली आहे. उत्पादन क्षेत्राचा विकास अवघा ०.६ टक्के आहे. आपली अर्थव्यवस्था नोटाबंदीसारख्या मानवनिर्मित चुकांमधून अद्याप बाहेर आलेली नाही, हेच यातून स्पष्ट होते. याव्यतिरिक्त चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आलेल्या जीएसटीमुळेही अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे.’ ते पुढे म्हणाल...
कोणत्याच पीएमनं इतकी खालची पातळी गाठली नव्हती; दिल्ली विद्यापीठाच्या 200 शिक्षकांकडून मोदींचा निषेध
मोठी बातमी, राष्ट्रीय

कोणत्याच पीएमनं इतकी खालची पातळी गाठली नव्हती; दिल्ली विद्यापीठाच्या 200 शिक्षकांकडून मोदींचा निषेध

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका होत आहे. काँग्रेससह विरोधकांनी राजीव गांधींबद्दलच्या वक्तव्यावरुन मोदींचा समाचार घेतला. यानंतर आता शिक्षण क्षेत्रातल्या दिग्गजांनी देखील मोदींच्या विधानावर कडाडून टीका केली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या 200 शिक्षकांनी मोदींच्या विधानाबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कामगिरीची माहिती संपूर्ण देशाला आहे. देशानं त्यांच्या कामाचं अनेकदा कौतुक केलं आहे. जेव्हा कारगिलमध्ये भारतानं विजय मिळवला, तेव्हा आपल्या जवानांनी राजीव गांधींचं कौतुक करत घोषणा दिल्या होत्या, असं दिल्ली विद्यापीठाच्या शिक्षकांनी पत्रात म्हटलं आहे. 'मोदींनी राष्ट्राच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या राजीव गांधींचा अपमान केला आहे. मोदींचं विधान पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणा...
भाजप नेत्याच्या घरातून 17 बॉम्बसह 111 काडतुसे जप्त
राष्ट्रीय, राजकारण

भाजप नेत्याच्या घरातून 17 बॉम्बसह 111 काडतुसे जप्त

भोपाळ : आगामी लोकसभेच्या अनुशंगाने मध्यप्रदेश पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेदरम्यान भाजप नेता संजय यादव यांच्या घरावर धाड टाकली. यामध्ये त्यांच्या घरातून 17 देशी बॉम्ब, 10 पिस्तुल आणि 111 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई रविवारी (दि 31 मार्च) करण्यात आली. मिळालेल्या माहतीनुसार, पोलिसांकडून राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारीची कारवाई करण्यात येत आहे. यादरम्यान पोलिस अधीक्षक यांगचेन डी. भुटिया यांच्या पथकाला माहिती मिळाली होती. त्यानुसार, संजय यादव यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. पोलिसांनी या धाडीमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी संजय यादवविरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संजय यादव यांच्यासोबत त्यांचा सहकारी गोपाळ जोशी याच्यावरही पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, याप्रकरणातील दोन्ही आरोपी सध्या फर...

Actions

Selected media actions