Tag: BJP

राहुल गांधींचे काय चुकले? –जेट जगदीश
विशेष लेख

राहुल गांधींचे काय चुकले? –जेट जगदीश

राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेवरून वाद निर्माण करून महाराष्ट्रात भाजपेईंनी मोठ्या प्रमाणात राहुल गांधींना 'जोडे मारो' (Bharat Jodo Yatra) कार्यक्रमही राबवला. या कार्यक्रमासंबंधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात आंदोलनकर्तीने राहुल गांधींना (Rahul Gandhi) जोडे मारण्याच्या ऐवजी सावरकरांवरच जोडे मारण्यासाठी हात उगारला होता असे हास्यास्पद चित्र दिसले. बरे तर बरे, बाकीच्या कार्यकर्त्यांनी तिला ताबडतोब अडवले म्हणून. नाहीतर बिचाऱ्या सावरकरांची काही धडगत नव्हती. त्यांनाच चपलांचा मार बसला असता. याचा अर्थ भाजपने सावरकर आणि राहुल गांधी यांना ओळखता न येणारे भाडोत्रीआंदोलनकर्ते मागवले होते की काय? दुसरे म्हणजे सावरकरांच्या (V D Savarkar) विरोधात मोठ्या प्रमाणात जाहीरपणे वक्तव्य करणे केव्हा सुरू झाले याबद्दल भाजपने जरूर चिंतन करायला हवे. 2014 पूर्वी सावरकरांविषयी अशा पद्धती...
संभाजी ब्रिगेडचा दणका ; शिवाजी महाराजांचा अवमान करणारे पोस्टर हटविले
पिंपरी चिंचवड

संभाजी ब्रिगेडचा दणका ; शिवाजी महाराजांचा अवमान करणारे पोस्टर हटविले

मागणी लावून धरल्यानंतर इंद्रायणीनगर मधील माजी नगरसेवकाचा लेखी माफीनामा सादर पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे फ्लेक्स शहरात लावले होते. त्याविरोधात संभाजी ब्रिगेडने आवाज उठविला. संबंधीत आरएसएसच्या कार्यकर्त्याला संपर्क करून जाब विचारला. पोस्टर न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. संभाजी ब्रिगेडच्या दणक्याने संबधीत कार्यकर्त्याने शहरातील फ्लेक्स हटविले. तसेच लेखी माफीनामाही सादर केला असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सतीश काळे यांनी दिली. काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महाराष्ट्र राज्यातील बहुजनांचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या विचारांवर चालणारी अनेक पिढी तयार होत आहे. राजांनी रयतेचे राज्य निर्माण करताना सर्व जाती धर्मातील नागरिकांचा विचार केला. मानसन्...
भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा आम आदमी पार्टीत प्रवेश
पिंपरी चिंचवड, राजकारण

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा आम आदमी पार्टीत प्रवेश

चिंचवड : भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रकाश हगवणे यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. यावेळी आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, आप शहर संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, ब्रह्मानंद जाधव, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रकाश हगवणे यांनी गेली वीस वर्ष भाजपमध्ये काम केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भाजप पूर्वीसारखा मुंडे व महाजन यांचा पक्ष राहिला नाही, पक्षाची विचारधारा बदलली आहे. प्रदेश पातळीवरील निष्ठावंत नेते ते निष्ठावंत प्रभाग कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांवरती पक्षाने अन्याय केला आहे. येणाऱ्या काळातही बरेच कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकणार आहेत. मी अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीमधील काम बघून प्रेरित होऊन आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीत मोहननगर, आनंदनगर, इंदिरानगर, प्रभाग क्रमांक १९ मधून...
पिंपरी चिंचवड भाजपाचे ‘मिशन १००+’; शहराध्यक्ष महेश लांडगेंनी ‘शड्डू ठोकला’
पिंपरी चिंचवड, राजकारण

पिंपरी चिंचवड भाजपाचे ‘मिशन १००+’; शहराध्यक्ष महेश लांडगेंनी ‘शड्डू ठोकला’

शहरात 'बूथ सक्षमीकरण' अभियान; कार्यकर्त्यांच्या 'डोअर टू डोअर' भेटी-गाठी! मोहननगरमधील भाजपाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांशी साधला संवाद पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये शहर भाजपाकडून मोर्चेबांधणीला सुरवात झाली असून, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'मिशन १००+' हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे मैदानात उतरले असून, निवडणुकीच्या तयारीचा 'शड्डू ठोकला' आहे. शहर भाजपातर्फे शनिवारपासून (दि.१७) पक्षाच्या 'बुथ सक्षमीकरण' अभियानाला सुरवात करण्यात आली. मोहननगर येथील प्रभाग क्रमांक १४ पासून स्वतः भाजपा शहराध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्यासह अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी जुने-जाणते कार्यकर्ते तसेच बूथ प्रमुखांच्या 'डोअर टू डोअर' भेटीगाठी घेऊन चर्चा केली. शहर भाजपाचा हा 'बूथ सक्षमीकरण' पॅटर्न कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. ...
महाराष्ट्र बचाओ नाही, हे तर भाजप बचाओ आंदोलन – बाळासाहेब थोरात
राजकारण, महाराष्ट्र, मोठी बातमी

महाराष्ट्र बचाओ नाही, हे तर भाजप बचाओ आंदोलन – बाळासाहेब थोरात

राज्यातील भाजप नेत्यांची निष्ठा महाराष्ट्राशी नाही, दिल्लीतील भाजप नेत्यांसोबतभाजप नेत्यांनी महाराष्ट्रद्रोह करू नये मुंबई : महाराष्ट्र भाजपच्या वतीने सुरू करण्यात आलेले आंदोलन हे महाराष्ट्र बचाओ आंदोलन नसून भाजप बचाओ आंदोलन आहे. कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात सरकार सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते झोकून देऊन काम करत आहेत, या संकटकाळात भाजप कोठेही दिसत नाही, त्यामुळे अस्तित्व दाखविण्यासाठी भाजपकडून ह्या आंदोलनाचा फार्स उभा केला जात आहे, अशी घणाघाती टीका राज्याचे महसूल मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. व्हिडीओ पहाण्यासाठी क्लिक करा या संदर्भात बोलताना थोरात म्हणाले की, 'कोरोनाच्या संकटात राजकारण करायचे नाही, सर्वांनी एकजुटीने या संकटाचा सामना करण्याची ही वेळ आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही ही भूमिका मांडली ह...
महापौरपदी माई ढोरे तर उपमहापौरपदी तुषार हिंगे यांची निवड
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

महापौरपदी माई ढोरे तर उपमहापौरपदी तुषार हिंगे यांची निवड

पिंपरी (लोकमराठी) : पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौरपदी भाजपच्या उषा उर्फ माई ढोरे यांची बहुमताने निवड झाली. त्या शहराच्या 26 व्या तर सातव्या महिला महापौर झाल्या आहेत. त्या सांगवीचे प्रतिनिधित्व करत असून त्यांना 81 मते पडली. तर, राष्ट्रवादीच्या स्वाती उर्फ माई काटे यांचा पराभव झाला. त्यांना 41 मते पडली. ढोरे 40 मतांनी विजयी झाल्या. उपमहापौरपदी भाजपचे तुषार हिंगे बिनविरोध निवडून आले. दरम्यान, अपक्षांनी भाजपला मतदान केले. शिवसेनेच्या सहा नगरसेवकांनी राष्ट्रवादीला मतदान केले. तर, निलेश बारणे, प्रमोद कुटे गैरहजर राहिले. मनसेचे सचिन चिखले आणि अपक्ष नवनाथ जगताप देखील गैरहजर राहिले. महापौर आणि उपमहापौरपदाच्या रिक्त जागेसाठी आज निवडणूक घेण्यात आली. सत्ताधारी भाजपचे स्पष्ट बहुमत असल्यामुळे या पक्षाच्या माई ढोरे यांची महापौरपदी आणि तुषार हिंगे यांची उपमहापौरपदी निवड होणार असल्याचे उमेदवारी अर्ज...
भारतीय जनता पार्टीला 700 कोटींचा ‘पार्टी फंड’
मोठी बातमी, राष्ट्रीय

भारतीय जनता पार्टीला 700 कोटींचा ‘पार्टी फंड’

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीला (भाजप) एका वर्षात तब्बल 700 कोटी रुपयांचा पार्टी फंड मिळाला आहे. ऑनलाईन पेमेंट आणि चेकच्या माध्यमातून सन 2018-19 या आर्थिक वर्षात भाजपला पक्षनिधी म्हणून विविध संस्था आणि व्यक्तींकडून 700 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यापैकी जवळपास निम्मी रक्कम ही टाटाच्या अधिपत्याखालील इलेक्ट्रोल ट्रस्टकडून देण्यात आला आहे. भाजपानेच याबाबतची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. भाजप हा सध्या देशातील सर्वात मोठा पक्ष जगातील सर्वात मोठी पार्टी असल्याचा दावाही भाजपाकडून करण्यात येतो. त्यामुळेच, भाजपला मिळणारा निधीही कोट्यवधी रुपयांचा असतो. सन 2018-19 या आर्थिक वर्षात भाजपाला तब्बल 700 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. टाटा उद्योग समुहाशी संलग्नित इलेक्ट्रोल ट्रस्टकडून तब्बल 356 कोटी रुपयांचा निधी भाजपाला देण्यात आला आहे. तसेच, देशातील काही विश्वसनीय संस्थांकडूनही 54.2...
पिंपरीसाठी तेजस्विनी कदम भाजपकडून इच्छूक
पिंपरी चिंचवड

पिंपरीसाठी तेजस्विनी कदम भाजपकडून इच्छूक

पिंपरी, ता.२५ (लोकमराठी) : पिंपरी मतदार संघातून उच्च शिक्षित युवती तेजस्विनी कदम यांनी भाजप कडून उमेदवारी मागितली आहे. यानिमित्ताने भाजपकडून आता आणखी एक फ्रेश चेहरा समोर आला आहे. त्या युवक व महिलांचा राजकारणातील टक्का वाढविण्याचे काम करणार असल्याने त्यासाठीच राजकारणात उडी घेतली. आमदारकीसाठी दावेदारी दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. पिंपरीकरांचा उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसादही तेजस्विनी यांना मिळतो आहे. पिंपरीतून राष्ट्रवादीसह भाजपकडूनही नवे व तरुण इच्छूक यावेळी अधिक आहे. सर्वच पक्ष भाकरी फिरवतील अशी चिन्हे आहेत. त्यामुळे शहरातील तीनपैकी सर्वात लहान असलेल्या या राखीव मतदारसंघातून लहान वयाचेच सर्वच उमेदवार असतील, अशी दाट शक्यता आहे. भाजपही आपल्या अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट करून नव्यांना संधी देणार आहेत. त्यातूनच नव्या व तरुण चेहऱ्यांनी उमेदवारीसाठी पिंपरीत भाजपकडे गर...
भाजपचा पराभव अटळच आहे : पहा कसा?
सिटिझन जर्नालिस्ट

भाजपचा पराभव अटळच आहे : पहा कसा?

लोकसभा जरी ३६ राज्यातील ५४४ सदस्यांनी बनत असली तरीही त्यातील १३ राज्येच संख्यात्मकतेने प्रभावी ठरतात. या १३ राज्यातच तब्बल ८१ % म्हणजे ४४० खासदार आहेत. सत्ता संपादनासाठी लागणारा २७२ हा जादुई आकडा देखील या १३ राज्यातील निम्म्या जागा जिंकल्या तरी गाठायला सोपा जातो. थोडक्यात, या १३ राज्यातून मागच्या वेळी भाजपला काय मिळाले व आता काय मिळणार ते पाहिले तर भाजपचा पराभव स्पष्ट होतो. आधी राज्यवार एकूण जागा पाहू : (१) उत्तरप्रदेश ८० (२) महाराष्ट्र ४८ (३) बंगाल ४२ (४) बिहार ४० (५) तमिळनाडू ३९ (६) मध्यप्रदेश २९ (७) कर्नाटक २८ (८) गुजरात २६ (९) राजस्थान २५ (१०) आंध्र २५ (११) ओडिशा २१ (१२) केरळ २० (१३) तेलंगणा १७. आता भाजपची या राज्यातील मागच्या वेळची कामगिरी पाहू : केरळ व तमिळनाडू या राज्यात भाजपला भोपळा फोडता आला नव्हता. बंगाल, आंध्रमध्ये प्रत्येकी दोन तर तेलंगणा व ओडिशात प्रत्येकी एका...
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड, राजकारण

सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा : लोकशाही बचाव समिती

पिंपरी चिंचवड : 2014च्या निवडणुकीमध्ये भाजप सेना युतीने आपल्या जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन मोदी सरकार पूर्ण करू शकले नाही. सुरु असणा-या लोकसभा निवडणुकीत या विषयी एकही शब्द न काढता विनाकारण नको ते मुद्दे उपस्थित करून सर्वसामान्य मतदारांची दिशाभूल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. 2014मध्ये त्यांनी दिलेल्या जाहिरनाम्यावर विश्वास ठेवून देशभरातील जनतेने त्यांना एकहाती सत्ता दिली होती. मात्र आता जनतेचा त्यांच्यावरील विश्वासच उडाला आहे. असा सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप सेना युतीला सुज्ञ मतदारांनी पराभूत करावे, असे आवाहन लोकशाही बचाव समितीचे समन्वयक मानव कांबळे यांनी पिंपरी येथे केले. लोकशाही बचाव समितीच्या वतीने पिंपरीमध्ये शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी माजी नगर...