महाराष्ट्र हित महत्त्वाचे! जनमताचा आदर व्हायला हवा!
काँग्रेसचे तरुण नेते शिवसेनेसोबत सत्तेसाठी उत्सुक!
शीतल करदेकर
काँग्रेस पक्षाचे मुंबईचे माजी अध्यक्ष संजय
निरुपम हे काँग्रेस पक्षासाठी हितकारक कधी होते. याचा शोध आणि बोध पक्षाने
घेण्याची वेळ आली आहे. बदलत्या राजकीय समीकरणात अनेक पक्ष प्रादेशिक पातळीवर सहकार्य
करून सत्ता स्थापन करत आहेत, त्यात भारतीय जनता
पार्टी पक्ष आघाडीवर आहे. सत्ता मिळवणे आणि मिळवलेल्या सत्तेचा लोकहितासाठी उपयोग
करणे हा उद्देश मुख्यता असायला हवा. मात्र, मागील अनेक वर्षात जुनी राजकारण बदलून
व्यक्तिकेंद्री राजकारणाला खतपाणी मिळाले आहे.
विविध पक्ष, त्यात
विविध गट आणि सत्ताकेंद्रे तयार झालीत. विविध प्रांतात अनेक वतनदार तयार झाले.
शिक्षण महर्षी, कार्यसम्राट, कारखानदार
आणि आता व्यापारी वाढले! मिळालेल्या सत्तेचा गैरवापर न करता जनतेचे पालक म्हणून
काम करणे, हाच मुख्य उद्देश असायला हवा हे बहुसंख्य राजकारणी विसरले...