लोकसंख्या उत्पादनक्षम झाली तरच भारत महासत्ता बनू शकेल – डॉ. जे. एस. पाटील
लोकमराठी न्यूज नेटवर्क
औंध : आज १३७ कोटी लोकसंख्येचा तरुण भारत देश आहे. ही लोकसंख्या उत्पादनक्षम झाली तरच भारत महासत्ता बनू शकेल. आजच्या लोकसंख्येला योग्य दिशा देणे व बेरोजगारीचे प्रमाण कमी करणे ही आजची खरी आव्हाने आहेत. युवकांच्या हाताला जर काम मिळाले नाही. तर भारत देशाचे महासत्ता होण्याचे स्वप्न अपुरे राहू शकते. त्यामुळे तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी शासन व्यवस्थेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे मत डॉ. जे. एस. पाटील यांनी येथे व्यक्त केले.
येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, नियोजन व विकास विभाग गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन दिनांक २७ व २८ फेब्रुवारी २०२० रोजी "भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आणि संधी" या विषयावर करण्यात आले होते. चर्चासत्राचे उद्ध...