मोठी बातमी

ब्लॅक गोल्डप्रमाणे आता शहरात गार्बेज गोल्ड | स्मशानातील सोने तसं कचऱ्यातील सोने
मोठी बातमी, विशेष लेख

ब्लॅक गोल्डप्रमाणे आता शहरात गार्बेज गोल्ड | स्मशानातील सोने तसं कचऱ्यातील सोने

रोहित आठवले उद्योगनगरीत मागणी वाढत गेल्यावर ऑइलचा काळाबाजार आणि त्यातून घर भरणारे पिंपरी चिंचवडकरांनी पाहिले. आता ब्लॅक ऑईलचा ट्रेण्ड मागे पडून गार्बेज गोल्डने जोर धरला असून, शहरातील या कचऱ्यावर आपल्या घरात हिरवळ फुलविणारे बहरू लागले आहेत. पिंपरी चिंचवडमधील कारखान्यांना पूर्वी ऑईलची गरज भासत होती. त्यातून या ऑईलचा काळाबाजार सुरू झाला. ब्लॅक गोल्ड म्हणून याकडे पाहिले जाऊ लागल्याने अनेकांनी यावर घरं भरली. पण नंतर तंत्रज्ञानात बदल होत जाऊन ही मागणी रोडावली. त्यामुळे याचा काळाबाजारही कमी झाला. पण शहरातील वाढती लोकसंख्या व नोकरीसाठी दाखल झालेल्यांच्या घरात कंपन्यांत तयार होणाऱ्या कचऱ्याला नेते मंडळींनी आपलंस करायला सुरुवात केली. कचरा कोण उचलणार, तो नेऊन कोण टाकणार, त्यातून भंगार कोण वेगळे करणार, वेगळे केलेले भंगार डेपोतून बाहेर कोण आणणार, पुढे ते जालना आणि मुंबईला कोण पाठवण...
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेत गोंधळ
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयात जनसंवाद सभेत गोंधळ

https://youtu.be/Zl_NElVi4-Q पिंपरी : नागरिकांना न कळवता महापालिकेच्या वतीने सोमवारी (दि. २८ मार्च) अचानक जनसंवाद सभा आयोजित करण्यात आली होती. एका छोट्याशा कक्षात एका एकाला बोलवुन लेखी तक्रार घेत होते. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय गायखे, सोमनाथ तापकीर, गोरख पाटील, कैलास सानप, मधुकर बच्चे त्याठिकाणी दाखल झाले. संवादसभा ही सभागृहातच घ्यावी, असा आग्रह त्यांनी धरला. परंतू, प्रशासन त्याला तयार नव्हते, म्हणुन या सामाजिक कार्यकर्त्यांनी अर्ज फाडुन टाकून कागदाचे तुकडे संबंधीत अधिकाऱ्याच्या अंगावर टाकून निषेध केला. त्यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख हरेश नखाते, जाणीव फाऊंडेशनच्या सदस्या सुजाता नखाते, शिवसेना विभागप्रमुख प्रदिप दळवी, विभाग संघटक अंकुश कोळेकर, गणेश वायभट, उपविभाग प्रमुख अनिल पालांडे, शाखाप्रमुख नरसिंग माने, विकास काजवे, अरुण हुमनाबाद आदी उपस्थित होते....
सव्वा वर्षांत पिंपरी विभागाने बदलले १८७०० वीज मीटर | महावितरणचा महाघोटाळा ; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग?
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

सव्वा वर्षांत पिंपरी विभागाने बदलले १८७०० वीज मीटर | महावितरणचा महाघोटाळा ; वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग?

https://youtu.be/aGgooUJBCu0 रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : वीज बिलात तोडपाणी करत वीज मीटरच गायब करणाऱ्या महावितरण अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. सुमारे सव्वा वर्षांच्या काळात महावितरणच्या पिंपरी विभागीय कार्यालयातून १८ हजार ७७० वीज मीटर बदलून दिले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा महावितरणचा महाघोटाळा असून यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याची शक्यता माहिती अधिकार कार्यकर्ते राजेश रोचिरमानी यांनी व्यक्त केली आहे. याबाबत लोकमराठी न्यूजशी बोलताना रोचिरमानी म्हणाले की, कोरोना काळात अंदाजे रिडींगद्वारे आलेल्या अव्वाच्या सव्वा बिलात तोडपाणी करत पिंपरीतील महावितरणचे काही अधिकारी व कर्मचारी वीज मीटर गायब करतात, त्यांचा हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी मी स्वतः बळीचा बकरा झालो. त्यासाठी माझेही जास्त आलेले बिल कमी करून...
पेनड्राईव्ह बॉम्बची वात पिंपरीत ; पिंपरी चिंचवडचे असेही कनेक्शन
मोठी बातमी, विशेष लेख

पेनड्राईव्ह बॉम्बची वात पिंपरीत ; पिंपरी चिंचवडचे असेही कनेक्शन

रोहित आठवले विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या महाविकास आघाडीच्या विरोधातील १२५ तासांच्या कथित रेकॉर्डिंग पेनड्राईव्ह बॉम्बची वात पिंपरी चिंचवडहून (Pimpri Chinchwad) पेटल्याचे आता समोर येत आहे. ज्या गुन्ह्यात संबंधित आरोपीचे वकीलपत्र घेण्यात आले. तो गुन्हा पिंपरी पोलिस ठाण्यात ऑक्टोबर २०१९ मध्ये दाखल करण्यात आला होता. तर तपासात २०२१ मध्ये आरोपींच्या अटकेनंतर जामिनासाठी संबंधित वकिलाला आरोपींच्या कुटुंबाने भेटून वकीलपत्र दिले होते. या कथित प्रकरणातील तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण पंडित चव्हाण (Adv Pravin Chavan) यांचे रेकॉर्डिंग असलेल्याचे सांगणारा पेनड्राईव्ह नुकताच विधानमंडळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सादर झाल्यावर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच गोंधळ उडाला आहे. हे मोडतोड (मॅन्यूप्लेटेड) केलेले रेकॉर्...
वसुंधरेचा बलात्कार करत पिंपरी चिंचवड महापालिका साजरे करतेय माझी वसुंधरा अभियान – प्रशांत राऊळ
मोठी बातमी, पिंपरी चिंचवड

वसुंधरेचा बलात्कार करत पिंपरी चिंचवड महापालिका साजरे करतेय माझी वसुंधरा अभियान – प्रशांत राऊळ

रवींद्र जगधने : लोकमराठी न्यूज नेटवर्क पिंपरी : वसुंधरेचा बलात्कार करत पिंपरी चिंचवड महापालिका माझी वसुंधरा अभियान साजरे करत आहे. अशी टिका पर्यावरण मित्र प्रशांत राऊळ यांनी केली आहे. पर्यावरण रक्षणासाठी महापालिका असंवेदनशील असून शहरात बेसुमार झाडांची कत्तल सुरू आहे. महापालिकेनेच पवना नदीत मैला मिश्रित पाणी सोडून तीला गटार करून टाकले आहे. शहरातील पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला असून पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर शहराला फक्त शिकलेलाच आयुक्त गरजेचा नसून एक जागृत, सक्रिय आणि संवेदनशील आयुक्त असणे गरजेचा आहे. असेही राऊळ यांनी म्हटले आहे. राऊळ यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माझी वसुंधरा अभियानाची खिल्ली उडवताना खालील मुद्दे मांडले आहेत. पंचतत्वे जल - १. पालिका हद्दीत नदीमध्ये मैला मिश्रित पाणी सोडणे २. पालिका व इतर अपुरे STP प्रकल्प ३. नदी प्रदूषण करणाऱ्या ...
संगतीमुळे उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार बाजूला गेला ; प्रविण दरेकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

संगतीमुळे उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार बाजूला गेला ; प्रविण दरेकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका

पिंपरी, ता. १३ : सत्ता नसताना हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदूत्ववाचा विचार होता. सत्ता आल्यानंतर संगतीच्या परिणामामुळे उद्धव ठाकरे यांचा हिंदूत्ववाचा विचार बाजूला गेला. अशी टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर रहाटणी येथे केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची संगती असा उच्चार करण्याचे टाळले. रहाटणी चौक येथे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. त्या पुतळ्याचे अनावरण विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते शनिवारी (ता. १२) सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी आपल्या भाषणात ते बोलत होते. त्याप्रसंगी महापौर उषा ढोरे, आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर नानी घुले, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे, नगरसेवक चंद्रकांत नखाते व बाब...
रावेत जलउपसा केंद्राजवळील नदीपात्रात मृत जनावरे ; नागरीकांचे आरोग्य धोक्यात | थेरगाव सोशल फाऊंडेशनचा आंदोलनाचा ईशारा
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

रावेत जलउपसा केंद्राजवळील नदीपात्रात मृत जनावरे ; नागरीकांचे आरोग्य धोक्यात | थेरगाव सोशल फाऊंडेशनचा आंदोलनाचा ईशारा

पिंपरी, ता १२ : रावेत येथील महापालिका जलउपसा केंद्राजवळ गेल्या काही महीन्यांपासून नदीपत्रात वारंवार मेलेली जनावरे तसेच जनावरांची चरबी टाकण्याचे प्रकारे अनोळखी व्यक्तींकडून सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा थेरगाव सोशल फाऊंडेशनने दिला आहे. याबाबत फाउंडेशनच्या वतीने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांची तहान भागवण्यासाठी पवना नदीपात्रातून रोज करोडो लिटर पाणीउपसा केला जातो. त्यासाठी रावेत येथे पालिकेने जलउपसा केंद्र उभारले असून त्याठिकाणावरून पाणी उचलून त्यावर योग्य प्रक्रिया करून ते पाणी जलवाहिनीद्वारे नागरिकांना पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाते. मात्र, गेल्या काही महीन्यांपासून या ऊपसाकेंद्राजवळ नदी...
एका स्वप्नभंगाचा वाढदिवस आणि महाराष्ट्राला तिसऱ्या पर्यायाची गरज
राजकारण, मोठी बातमी

एका स्वप्नभंगाचा वाढदिवस आणि महाराष्ट्राला तिसऱ्या पर्यायाची गरज

हेरंब कुलकर्णी आज मनसेचा वर्धापन दिन साजरा होतो आहे. मनसे ज्या दिवशी स्थापन झाली, तो दिवस अजूनही आठवतो आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी तरुणांना एक स्वप्न राज ठाकरेंनी दाखवले. खेड्यापाड्यातून शिवाजी पार्कला गाड्या भरून गेल्या होत्या आणि डोळ्यात लकाकी घेऊन खेड्यापाड्यातली मुले गावाकडे आली होती. १३ आमदार निवडून आल्यावर त्या स्वप्नाला धुमारे फुटले आणि पुढे व्हाया मोदी, व्हाया पवार, व्हाया फडणवीस असा आजपर्यंतचा प्रवास समोर आहे. असेच स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवले होते. अशाच खेड्यापाड्यातून तरुणांच्या गाड्या भरून गेल्या होत्या. काँग्रेसमधून ते बाहेर आले याचा अर्थ कॉंग्रेसची सरंजामदारी संस्कृती दूर करतील आणि नवी राजकीय संस्कृती देतील असे वाटले होते पण सारे सहकार सम्राट शिक्षण सम्राट घराणेशाही सम्राट त्यांच्यामागे आले आणि काँग्रेसची भ्रष्ट आवृत्तीच हा पक्ष म्हणून समोर आला. असेच...
महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता
राजकारण, मोठी बातमी

महापालिका व जिल्हा परिषद निवडणुका पुढे जाण्याची शक्यता

लोकमराठी न्यूज नेटवर्क मुंबई, ता. ७ : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रभाग रचनेचे अधिकार राज्य सरकार स्वतःकडे घेणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत मंत्रिमंडळाने मंजूर केलेले विधेयक विधान सभेत मांडण्यात येणार आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत, यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे महाराष्ट्र सरकार कायदा करणार आहे. या कायद्याला कॅबिनेटने मंजुरी दिल्यानंतर आज हे विधेयक विधिमंडळात मांडले जाणार आहे. निवडणूक आयोगाने एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. मात्र राज्य सरकारला ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईस तीन महिने अवधी हवा आहे. त्यासाठी निवडणुका पुढे ढकलण्याचे घाट घातला आहे. म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर गदा आणण्यासाठी दोन विधेयकां...
ओबीसी आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळला
मोठी बातमी, राष्ट्रीय

ओबीसी आरक्षण : सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल फेटाळला

नवी दिल्ली : महाराष्ट्र पंचायत निवडणुकीत - सर्वोच्च न्यायालयाने 27 टक्के ओबीसी आरक्षण नाकारले आहे. महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाच्या अंतरिम अहवालाच्या आधारे राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाने कोणतेही पाऊल उचलू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. हा अहवाल योग्य अभ्यास न करता तयार करण्यात आल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आता पुढच्या आदेशापर्यंत ओबीसी आरक्षण नसेल असा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. आज याविषयीची सुनावणी झाली आहे. त्रुटी राहील्याने सर्वोच्च न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहेत. त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय होणार महापालिका निवडणुका होणार का अशी परिस्थिती सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून दिसून येत आहे. ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी जानेवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, मागासवर्ग आयोगाने याबद्दलचा निर्णय घ्यावा. प...