महाराष्ट्र

Hari Narke : पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला; विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन
महाराष्ट्र, ताज्या घडामोडी, मोठी बातमी

Hari Narke : पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला; विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन

पुणे (लोकमराठी न्यूज) : ज्येष्ठ लेखक, विचारवंत आणि समता परिषदेचे उपाध्यक्ष प्रा. हरी नरके यांचे निधन झाले आहे. Asian Heart Hospital मध्ये घेतला अखेरचा श्वास घेतला आहे. वयाच्या 60 व्या वर्षी मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समता परिषदेच्या उद्या मुंबईत होणाऱ्या बैठकीसाठी हरी नरके आजच पहाटे पुण्याहून मुंबईला येत होते. येताना पहाटे त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला त्यामुळे बीकेसीच्या एशियन हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. हरी नरके यांच्या निधनाने समाज एका पुरोगामी चळवळीला मुकला आहे. फुले व आंबेडकर यांच्या विचारांची व कार्याची प्रस्तुतता अधिक चांगल्या प्रकारे अधोरिखित करणे आणि शासकीय पातळीवर वेगाने निर्णय घडून आणण्यामध्ये हरी नरके यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासन...
Nanded : उपवास करून वाईट प्रवृत्तीचा केला निषेध
महाराष्ट्र

Nanded : उपवास करून वाईट प्रवृत्तीचा केला निषेध

नांदेड, ता. ०२ (लोकमराठी न्यूज) : सध्या राज्यात मनोहर भिडे सह काही वाईट प्रवृत्तीचे लोक ज्या प्रकारे द्वेषाचे वातावरण तयार करत आहेत. तसेच मणिपूरमध्ये जे वाईट घटना घडली, आत्ताही जातीय दंगली चालू आहेत. त्यामुळं मनाला खूप वाईट वाटतंय. असे मत बालाजी पवार यांनी व्यक्त केले. पण आपलीही चूक आहे की आपण प्रेम आणि अहिंसा पसरवण्यात कुठे तरी कमी पडलो आहोत. त्यामुळे राज्यातील गांधी प्रेमींनीच्या वतीने मंगळवारी या प्रवृत्तीच्या विरोधात एक दिवसीय उपवास करून निषेध करण्यात आला. त्याप्रमाणे नांदेड येथे सुध्दा सकाळी पासून उपवास करण्यात आला. तसेच सकाळी अकरा वाजता गांधींजीच्या पुतळ्याला डॉ. जगदीश कदम सर यांचे हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. असे पवार यांनी सांगितले. एक दिवसीय उपवासात पीपल्स काॅलेजचे माजी उपप्राचार्य बालाजी कोम्लवार, आदित्य भांगे, नजीर शेख व बालाजी पवार सहभागी झाले होत...
मातंग समाजासाठी झटणारा तारा निखळला
महाराष्ट्र

मातंग समाजासाठी झटणारा तारा निखळला

मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय लहू शक्तीचे संस्थापक-अध्यक्ष मधुकरराव कांबळे यांचे निधन अकोला, ता. २५ (लोकमराठी न्यूज) : मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते राष्ट्रीय लहू शक्तीचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री मधुकरराव कांबळे (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने आज सकाळी (ता. २५ जुलै २०२३) अकोला येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवारावर व समाजावर शोकाकुल पसरली आहे. त्यांच्यावर पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे. ते साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्षही होते. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी (ता. २६ जुलै) एक वाजता उमरी, स्मशानभूमी (रेल्वे लाईन जवळ) Akola येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. तत्पुर्वी त्यांचे पार्थिव राज्यातील कार्यकर्त्यांच्या अत्यंदर्शनासाठी अकोला येथील त्यांच...
नोकरीसाठी पुण्याला निघालेल्या अवंतीवर काळाचा घाला 
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

नोकरीसाठी पुण्याला निघालेल्या अवंतीवर काळाचा घाला

लोकमराठी न्यूज नेटवर्क | १ जुलै २०२३ बुलढाणा : येथील समृद्धी महामार्गावर मध्यरात्री खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात बस उलटून डिझेल टँक फुटल्याने बसला आग लागली आणि झोपेतच २६ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या अपघातात अनेकांनी आपली मुलं, नातेवाईक गमावली, तर काहींचं अख्खं कुटुंब गेलं. यापैकीच अवंती पोहनीकर ही तरुणी देखील होती. अवंतीचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला. तिच्या अशा अकाली जाण्याने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अवंती पोहनीकर ही वर्ध्याची असून ती इंजिनीअर होती. पुण्याला जाण्यासाठई शुक्रवारी सायंकाळच्या खासगी ट्रॅव्हल्सने ती निघाली होती. परंतु मध्यरात्री बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तिचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच अवंतीच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. अपघाताची माहिती मिळाली तेव्हा आपली मुलगी ठीक असेल ना, ति...
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले… 
महाराष्ट्र, मोठी बातमी

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पत्र दिलं होतं, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. या पत्रावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पलटवार केला आहे. हे पत्र मीच काढलं होतं अशी कबुली देतानाच दिल्लीतून वारंवार विचारणा झाल्यामुळेच मी रिफायनरीचा प्राथमिक अहवाल मागवला होता, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी केला. भारतीय कामगार सेनेच्या 55 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उद्धव ठाकरे संबोधित करत होते. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. या प्रसंगी खासदार अरविंद सावंत उपस्थित होते. मी बारसूचं पत्र दिलं होतं. मी पत्र दिलं होतं तर अडीच वर्षात पोलिसांच्या बळावर मी तो प्रकल्प का राबवला नाही? उद्धव ठाकरेंचं एवढं ऐकता तर मग गद्दारी करून सरकार का पाडलं? आरेचा निर्णय का फिरवला? कांजूरचा निर्णय का फिरवला? रोज उठून किती लोक बुलेट ट्रेनने अहमद...
मयत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 25 लाखांची मदत देण्याची घोषणा – पालकमंत्री उदय सामंत
महाराष्ट्र, मोठी बातमी

मयत पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 25 लाखांची मदत देण्याची घोषणा – पालकमंत्री उदय सामंत

मयत वारिसे यांच्या मुलाला कायम स्वरूपाची नोकरी देण्याची जबाबदारीही स्वीकारली रत्नागिरी, दि.12 (जिमाका) : पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबातील त्यांचा एक मुलगा आणि आजी यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात येत होती. आज रत्नागिरीत रोजगार महामेळाव्याच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत येथील पत्रकारांनीही पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळावी, ही मागणी उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे पुन्हा मांडली. पत्रकारांच्या या मागणीची दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख व इतर माध्यमातून 15 लाख अशी मदत मयत पत्रकार वारिसे यां...
१८ फेब्रुवारी रोजी मराठ्यांची गौरवगाथा महानाट्याचे आयोजन
महाराष्ट्र

१८ फेब्रुवारी रोजी मराठ्यांची गौरवगाथा महानाट्याचे आयोजन

रायगड, दि.४ (लोकमराठी) - १८ फेब्रुवारीला "मराठ्यांची गौरवगाथा" महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे.(निर्मित/ लिखित/ दिग्दर्शित )प्रवीण नंदकुमार देशमुख यांनी शिवदुर्ग मित्र प्रस्तुत "मराठ्यांची गौरवगाथा" या महानाट्याची अधिकृत घोषणा केली. २फेब्रुवारी १६६१ रोजी कर्तलबखानाच्या बलाढ्य सैन्याचा छत्रपती शिवाजी महाराज व सरनोबत नेताजी पालकर यांच्या सैन्याने गनिमी कावा या युद्धनीतीने संपूर्ण पराभव केला त्यांना शरणागती पत्करायला लावली व शिवाजी महाराजांचा मोठा विजय झाला म्हणूनच २फेब्रुवारी हा दिवस विजय दिन म्हणून साजरा केला जातो, यावर्षी ३६२ वा विजय दिन सोहळा उंबरखिंडीमध्ये साजरा करण्यात आला. याचे आयोजन पंचायत समिती खालापूर, जिल्हा परिषद, तसेच शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले याच दिवसाचे औचित्य साधून शिवदुर्ग मित्र प्रस्तुत प्रवीण नंदकुमार देशमुख (नि...
श्री नगद नारायण, गोसावी बाबा शेतकरी ग्रामविकास पॅनलचा एकतर्फी विजय
महाराष्ट्र

श्री नगद नारायण, गोसावी बाबा शेतकरी ग्रामविकास पॅनलचा एकतर्फी विजय

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क हाजीपुर, बीड (दि. 20 डिसेंबर) : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज सर्वत्र जाहीर झाले. विजय उमेदवारांचे गुलाल, ढोल-ताशे आणि डीजेच्या आवाजामध्ये सर्वत्र आनंद उत्सव आणि जल्लोषात स्वागत होत आहे. याचप्रमाणे बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील हाजीपुर गावची ग्रामपंचायत निवडणूक ही मोठ्या उत्साहात पार पडली. देशाच्या स्वातंत्र्यापासून ते आज पर्यंत गावची ग्रामपंचायत ही बिनविरोध म्हणून गणली जात होती. परंतु या पंचवार्षिक निवडणुकीला पहिल्यांदाच दोन पॅनल गावामध्ये पडले आणि प्रथमच निवडणूक गावामध्ये झाली. श्री नगद नारायण गोसावी बाबा शेतकरी ग्रामविकास पॅनल आणि श्री गोसावी बाबा ग्रामविकास पॅनल या दोन पॅनल मध्ये काट्याची टक्कर झाली. आणि यामध्ये श्री नगद नारायण गोसावी बाबा शेतकरी ग्रामविकास पॅनल चे सर्वच्या सर्व उमेदवार हे मोठ्या फरका...
दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी केला विवाह ; हे आहे कारण… 
महाराष्ट्र, मोठी बातमी

दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी केला विवाह ; हे आहे कारण…

लोकमराठी न्यूज नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील अकलूज (ता. माळशिरस) येथे दोन जुळ्या बहिणींनी एकाच मुलाशी विवाह केलाय. सोशल मीडियावर या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एकाच मुलासोबत, एकाच वेळी सख्ख्या बहिणींच्या या आगळ्या वेगळ्या लग्नाची आता सोशल मीडियावर चर्चा होतीये. शुक्रवारी अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे हा अनोखा विवाह संपन्न झालाय. अतुल हा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील असून त्याचा मुंबई येथे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. तर कांदिवली मधील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणी आहेत. सहा महिन्यांपूर्वी पिंकी, रिंकी आणि त्यांची आई आजारी पडल्यानंतर अतुल नावाच्या टॅक्सी ट्रॅव्हल करणाऱ्या युवकाने रुग्णालयात त्यांची काळजी घेतली होती. यातून त्यांचे प्रेम जुळले आणि नातेवाईकांच्या संमतीने काल हा विवाह अकलूज मध्ये पार पडला. इंजिनीअर पदावर कार्यरत अ...
अहमदनगर : अकोले तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करा 
महाराष्ट्र, मोठी बातमी

अहमदनगर : अकोले तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करा

अहमदनगर : Ahmednagar जिल्ह्यातील राजूर, शाहूनगर आणि अकोले (Akole) तालुक्यातील अवैध दारू विक्री बंद करावी व शाहूनगर व राजूरला पोलीस अधीक्षकांनी भेट द्यावी. यासाठी आज अहमदनगर येथे पोलीस अधिक्षक राकेश ओला (Rakesh Ahla) यांना सामाजिक कार्यकर्ते व लेखक हेरंब कुलकर्णी (Herambh Kulkarni) यांनीनिवेदन दिले. सोबत सावली संस्थेचे नितेश बनसोडे होते. यावेळी कुलकर्णी यांनी तालुक्यात होणारी अवैध विक्री, रात्रीची चोरटी वाहतुक याविषयी त्यांना माहिती दिली. राजूर येथील दारू विक्रेत्यांना मदत करणाऱ्या पोलिसांच्या बदल्या करा, बिट अंमलदार यांना तालुक्यात जबाबदार धरा. अशी मागणी यावेळी कुलकर्णी यांनी केली, सोबत सावली संस्थेचे नितेश बनसोडे होते. ...