महाराष्ट्र

क्रांती दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून ११ हजारांहून अधिक पत्रे पाठविणार
महाराष्ट्र

क्रांती दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून ११ हजारांहून अधिक पत्रे पाठविणार

बेळगाव : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सीमाप्रश्नाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ११ हजारांहुन अधिक पत्रे पाठविण्यात येणार आहेत. या मोहिमेत सहभागी होऊन बेळगाव व इतर भागातून देखील मोठ्या प्रमाणात पत्रे पाठविली जावी यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहिमेला मराठी वकील संघटनेतर्फे पाठींबा देण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सीमाप्रश्नाची तातडीने सोडून व्हावी यासाठी प्रयत्न करा अशी मागणी करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्याचा निर्णय खानापूर तालुका युवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. तसेच 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी एकाच दिवशी ११ हजाराहून अधिक पत्रे पाठविण्याबाबत जनजागृती केली जात आहे. याला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत असून फक्त खानापूर तालुका नव्हे. तर बेळगाव, निपाणी व इतर सीमाभागातून देखील पत्रे पाठविली जावीत याला सिमाभागा...
महाराष्ट्र अंनिस लातूर शाखेत रक्तदान करून ईद साजरी
महाराष्ट्र

महाराष्ट्र अंनिस लातूर शाखेत रक्तदान करून ईद साजरी

लातूर : शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती लातूरच्या वतीने "ईद उल अजहा" निमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. ईद हा सण कुर्बानी देऊन साजरा न करता आपण रक्तदान करून ईद साजरी करावी असा संदेश यावेळी देण्यात आला. यावेळी महिला विभागाच्या राज्य सह कार्यवाह रुकसना मुल्ला, मिश्र विवाह विभाग कार्यवाह रणजित आचार्य, देवराज लंगोटे यांनी रक्तदान केले. त्याप्रसंगी राज्य प्रधान सचिव माधव बावगे, जिल्हा कार्याध्यक्ष अनिल दरेकर, अरमान सय्यद, माऊली ब्लड बँकेचे यावस्थापक डॉ सितम सोनवणे, स्टाफ शिवानी गायकवाड , श्रीता गायकवाड यांची सदरील उपक्रमात उपस्थिती होती....
बकरी ईद निमित्त अंनिस कोल्हापूर व मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे रक्तदान शिबीर संपन्न
महाराष्ट्र, सामाजिक

बकरी ईद निमित्त अंनिस कोल्हापूर व मुस्लिम सत्यशोधक मंडळातर्फे रक्तदान शिबीर संपन्न

कोल्हापूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कोल्हापूर आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या वतीने बकरी ईद निमित्त रक्तदान शिबीर संपन्न झाले. धर्माने सांगितलेल्या मानवी मूल्यांमध्ये त्याग महत्वाचे मूल्य आहे. इस्लाम धर्मात ही इच्छा, ध्येय सिद्ध करण्यासाठी "कुर्बानी" किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. हा त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून "ईद - उल - अजहा" (बकरी ईद) हा सण इस्लाम धर्मीयांमध्ये साजरा केला जातो. यानिमित्ताने बकऱ्याची कुर्बानी देण्याची प्रथाही पाळली जाते. आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता सर्व धर्मियांनी आपले सण अधिकाधिक समाजाभिमुख आणि मानवतावादी करणे हेच धर्माचे उन्नयन आहे. हाच विचार समोर ठेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळ यांच्यावतीने बकरी ईद निमित्त पशुची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये काळानुरूप बदल व्हावा व या प्रथेल...
बकरी ईद निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा – अल्लाउद्दीन शेख
महाराष्ट्र, मोठी बातमी

बकरी ईद निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा – अल्लाउद्दीन शेख

पनवेल (रायगड) : बकरी ईद निमित्त पशूची कुर्बानी देण्याच्या प्रथेमध्ये कालानुरूप बदल व्हावा व या प्रथेला पर्याय देत रक्तदान करुन साजरी करण्याचा मानवतावादी दृष्टिकोन आनंद देणारा आहे. असे प्रतिपादन राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्र कार्यवाह अल्लाउद्दीन शेख यांनी येथे केले. आजच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता, सर्व धर्मियांनी धार्मिक सण हे अधिकाधिक समाजाभिमुख व मानवतावादी करणे हे धर्माचेच उन्नयन आहे. म्हणूनच 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती', शाखा पनवेलच्या पुढाकाराने व 'राष्ट्र सेवा दल', 'हुसेनी फाउंडेशन' याच्या संयुक्त विद्यमाने बकरी ईद निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अल्लाउद्दीन शेख बोलत होते. रक्तदान हे सर्व जाती धर्मापलीकडे माणसाला माणसाशी जोडते. रक्तदान करुन बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले होते, त्या आवाहनाला प्रतिसाद देत भ...
करीना कपूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा | ख्रिश्चन एकता मंचाचे ठाम मत
महाराष्ट्र, मोठी बातमी

करीना कपूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा | ख्रिश्चन एकता मंचाचे ठाम मत

मुंबई : करीना कपुर यांनी त्यांच्या पुस्तकाच्या शीर्षकात 'बायबल' या शब्दाचा वापर केल्याप्रकरणी ख्रिस्ती समाजातुन त्यांचा निषेध केला जात आहे. याप्रकरणी 'ख्रिश्चन एकता मंच'च्या वतीने महाराष्ट्रातील अनेक भागातून जोरदार निषेध व्यक्त होत असून त्याला समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच मंचाचे पदाधिकारी व कार्यकर्ते जागोजागी संबंधित कार्यालयांमध्ये लेखी स्वरूपात निषेध नोंदवत आहेत. दरम्यान, करीना कपुर यांच्यावर गुन्हा नोंदवावा, अशी तीव्र मागणी सुध्दा करण्यात येत आहे. ख्रिश्चन एकता मंचचे संस्थापक अध्यक्ष प्रभुदास दुप्ते यांनी मीडियाला माहिती दिली की, याप्रकरणी मंचाच्या वतीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी निषेध नोंदवण्यात आलेला आहे. तसेच करीना कपुर यांचे मुंबई येथील निवासा नजीकच्या वरळी पोलिस स्टेशनमध्ये सुध्दा आम्ही तक्रार नोंदविण्यास गेलो, असता पोलिसांनी पुराव्यांची मागणी केली. अद्याप पुरव्याभाव...
चांदे बुद्रुक मुस्लिम कब्रस्तानमध्ये वृक्षारोपण
सामाजिक, महाराष्ट्र

चांदे बुद्रुक मुस्लिम कब्रस्तानमध्ये वृक्षारोपण

कर्जत : चांदे बुद्रुक येथील मुस्लिम कब्रस्तान तसेच देवस्थान परिसरात मुस्लिम समाजाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. विविध प्रजातीची सुमारे दीडशे झाडे यावेळी लावण्यात आली. त्याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुका संघटक चाँद मुजावर, अमोल खोमणे, हसन शेख, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश सुर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ते विशाल भंडारी, संपत गावडे, इनुस सय्यद, आवेश सय्यद, शाहरुख शेख, नितीन जगधने आदी उपस्थित होते...
वर्दीतील हिरो : पायाला दुखापत असतानाही या पोलिसाने केले हे काम (व्हिडीओ)
महाराष्ट्र

वर्दीतील हिरो : पायाला दुखापत असतानाही या पोलिसाने केले हे काम (व्हिडीओ)

https://youtu.be/X4oruvaOCKY मुंबई : दिवस पाळी कर्तव्य करून घरी जाताना इंदिरानगर येथे चाळीमध्ये घुसलेल्या धामण जातीच्या सर्पला पोलिसाने सुरक्षित पकडून त्यास वनविभागाकडे दिले. विशेष म्हणजे त्यावेळी त्या पोलिसाच्या पायाला दुखापत होती. या पोलिसाने केलेल्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक करण्यात येत आहे. मुरलीधर श्रावण जाधव असे त्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते कुर्ला पोलिस स्टेशन येथे कार्यरत अाहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुरलीधर जाधव हे (ता. २४ मार्च) दिवस पाळी कर्तव्य करून घरी जात होते. त्यावेळी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली की, इंदिरानगर, जुहू तारा रोड, सांताक्रुज पश्चिम मुंबई येथे चाळीमध्ये साप घुसला आहे. आपल्या पायाला दुखापत असल्याची तमा न बाळगता जाधव यांनी त्या ठिकाणी धाव घेतली, आणि त्या पाच ते सहा फुट धामण (Indian Rat Snake) जातीच्या सापाला सुरक्षित पकडून त्यास व...
महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी मृतदेह
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी मृतदेह

रायगड : भोर-महाड या रस्त्यावर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४० ते ४५ वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. अशा वर्णनाची व्यक्ती कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाली असेल तर त्यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, रायगड किंवा महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याची संपर्क साधावा. असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातून ३ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झालेल्या चिटफंड चालकासी मिळते जुळते वर्णन असल्याने नातेवाईक महाडला रवाना झाले असल्याचे कळते आहे. ...
देशाच बजेट आहे की भाजपचं इलेक्शन पॅकेज | आमदार रोहित पवार यांची मोदी सरकारवर टिका
महाराष्ट्र, मोठी बातमी

देशाच बजेट आहे की भाजपचं इलेक्शन पॅकेज | आमदार रोहित पवार यांची मोदी सरकारवर टिका

मुंबई : निवडणुका असलेल्या राज्यांसाठी योजनांची केलेली खैरात पाहिली तर हे देशाचं बजेट आहे की भाजपचं 'इलेक्शन पॅकेज' आहे,अशी शंका येते. नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठीची तरतूद वगळता देशाच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला बजेटमध्ये अक्षरशः पाने पुसण्यात आली. अशी जोरदार टिका कर्जत जामखेड (karjat-jamkhed) मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. आमदार पवार यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर लिहिले आहे की, निर्गुंतवणुकीकरणावर दिलेला भर हे काही चांगलं लक्षण नाही. सोप्या शब्दांत सांगायचं तर वडिलोपार्जित संपत्ती विकून बाजारहाट करण्यासारखं आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मागणी वाढवण्याकडं आणि सीमेवर तणाव असतानाही लष्करासाठी भरीव तरतूद करण्याकडं सपशेल दुर्लक्ष करण्यात आलंय. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं पण ते कल्याण कसं करणार याची कोणतीही...
जन्मत: दोष असणाऱ्या बालकांचे आता त्वरीत रोगनिदान व उपचार
मोठी बातमी, महाराष्ट्र

जन्मत: दोष असणाऱ्या बालकांचे आता त्वरीत रोगनिदान व उपचार

यवतमाळ : ग्रामीण तसेच शहरी भागात 0 ते 6 वर्षे वयोगटातील काही बालकांमध्ये जन्मत: दोष तसेच विविध आजार असतात. मात्र ते लवकर लक्षात येत नसल्यामुळे त्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटतो. अशा बालकांचे त्वरीत रोगनिदान करून त्यांच्यावर जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्राच्या माध्यमातून सर्वोत्तम उपचार करण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्राचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, आरोग्य व शिक्षण सभापती श्रीधर मोहोड, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ...