मराठी साहित्य हे मराठी संस्कृतीचे बलस्थान आहे – राजन लाखे
rajan_lakhe
पिंपरी : मराठी भाषेचे प्राचीनत्व शिलालेख, ताम्रपट, ग्रंथ यातून उलगडले आहे. संतांनी मराठी भाषा समृद्ध केली आहे. लय, भाव, रूप, कल्पना सौंदर्य यामधून संतांच्या ओव्या, अभंग नटले आहे.
“युगे वर झाली युग,
युग झाली अठ्ठावीस,
कुणी म्हणे ना ग बाई,
माझ्या विठ्ठलाला बसं
“मराठीचा हाच काव्यरूप वारसा आजच्या कुसुमाग्रज वि. दा
करंदीकर, शांता शेळके, इंद्रजीत भालेराव, दया पवार इत्यादी
आधुनिक कवींनी जपला आहे. मराठी साहित्य, मराठी कविता ही मराठी भाषेचे बलस्थान आहेत, असे विचार
महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात मराठी
भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ‘मराठी भाषा व मराठी कविता या विषयावर राजन लाखे यांनी आपले
विचार मांडले.
मराठी भाषा ही संस्कृत, तेलगू, कन्नड मल्याळी, इंग्रजी आशा या भाषा ...