Tag: Marathi News

मनसे व अभिनव रावेत सोशल फाऊंडेशन तर्फे कोविड योध्दांचा सन्मान
पिंपरी चिंचवड

मनसे व अभिनव रावेत सोशल फाऊंडेशन तर्फे कोविड योध्दांचा सन्मान

पिंपरी : कोविड १९ महामारीत अत्यावशक सेवेमध्ये आपली सर्वोतपरी जबाबदारी पार पडून सर्वसामान्य जनतेसाठी २४ तास कर्तव्यदक्ष राहणारे पोलीस बांधव व वैद्यकिय सेवेतील डॉक्टर यांचा मनसे युवानेते प्रविण माळी आणि अभिनव रावेत सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. रावेत पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र राजमाने यांना तसेच मंगलमुर्ती हॉस्पिटल, स्नेह हेल्थ केअर, पँथलॉजी लँब, अशा अनेक ठिकाणी कोविड योध्दा सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. त्यावेळी फाऊंडेशनचे सदस्य गणेश माळी, माऊली गव्हाडे, चैतन्य शिंगटे,अनिकेत साळुंखे आदि उपस्थित होते....
एसटी महामंडळाचा भोसरीतील ‘ट्रायल ट्रॅक’ अखेर सुरू करणार : रमाकांत गायकवाड
पिंपरी चिंचवड

एसटी महामंडळाचा भोसरीतील ‘ट्रायल ट्रॅक’ अखेर सुरू करणार : रमाकांत गायकवाड

भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांचा यशस्वी पाठपुरावा भरती प्रक्रियेत सहभागी सुमारे ३ हजार चालक, वाहकांना मिळणार दिलासा पिंपरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागीय प्रशासनाचा भोसरी येथील वाहन चालक व वाहक ‘ट्रायल ट्रॅक’ लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच, येत्या २ ऑगस्टपासून महिला प्रशिक्षणही सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायवाड यांनी दिली. त्यामुळे भरती प्रक्रियेतील सुमारे ३ हजार चालक व वाहकांना दिलासा मिळणार आहे. कोरोना, लॉकडाउन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पुणे विभागातील ही भरती प्रक्रिया रखडली होती. याबाबत संबंधित उमेदवारांच्या प्रतिनिधींनी पिंपरी-चिंचवड भाजपा वाहतूक आघाडीचे शहराध्यक्ष दीपक मोढवे-पाटील यांची भेट घेतली. पुणे विभागातील दुष्काळग्रस्त भागातील उमेदवारांसाठी असलेली ही भरती प्रक्रिया राबवण्याब...
दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार | शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मोठी बातमी, शैक्षणिक

दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार | शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

मुंबई : राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले. यासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री श्रीमती गायकवाड यांनी सांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्त्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे. त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे. दहावीसाठी साधारणत: 16 लाख तर बारावीसाठी 15 लाख विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे गेल्यावर्षीचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे. अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या म...
महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी मृतदेह
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र, मोठी बातमी

महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी मृतदेह

रायगड : भोर-महाड या रस्त्यावर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४० ते ४५ वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. अशा वर्णनाची व्यक्ती कोणत्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाली असेल तर त्यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा, रायगड किंवा महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याची संपर्क साधावा. असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातून ३ फेब्रुवारी रोजी बेपत्ता झालेल्या चिटफंड चालकासी मिळते जुळते वर्णन असल्याने नातेवाईक महाडला रवाना झाले असल्याचे कळते आहे. ...
Moshi : यशस्वी विद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
शैक्षणिक

Moshi : यशस्वी विद्यालय व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

मोशी : यशस्वी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशस्वी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, यशस्वी इंग्लिश मीडियम स्कूल आदर्श नगर मोशी या शाळेमध्ये कोविंड 19 शासकीय मार्गदर्शक सूचनेचे पालन करून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. विद्यालयाचे ध्वजारोहण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शोभा देवकाते यांच्या हस्ते झाले आपल्या प्रस्ताविकामध्ये भारतामधील स्वातंत्र्य, समता, बंधुता जाणीव करून दिली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देवकाते व संस्थेचे सचिव डॉक्टर तुषार देवकाते, शिक्षक वृंदाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ...
जन्मत: दोष असणाऱ्या बालकांचे आता त्वरीत रोगनिदान व उपचार
मोठी बातमी, महाराष्ट्र

जन्मत: दोष असणाऱ्या बालकांचे आता त्वरीत रोगनिदान व उपचार

यवतमाळ : ग्रामीण तसेच शहरी भागात 0 ते 6 वर्षे वयोगटातील काही बालकांमध्ये जन्मत: दोष तसेच विविध आजार असतात. मात्र ते लवकर लक्षात येत नसल्यामुळे त्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास खुंटतो. अशा बालकांचे त्वरीत रोगनिदान करून त्यांच्यावर जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्राच्या माध्यमातून सर्वोत्तम उपचार करण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या जिल्हा अतिशिघ्र हस्तक्षेप केंद्राचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, नगराध्यक्षा कांचन चौधरी, आरोग्य व शिक्षण सभापती श्रीधर मोहोड, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ...
सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारा युवा समाजसेवक ‘वैभव घुगे’
विशेष लेख, सामाजिक

सर्वसामान्यांसाठी तळमळीने काम करणारा युवा समाजसेवक ‘वैभव घुगे’

राष्ट्रीय युवा दिन विशेष पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे राहणारा युवा समाजसेवक वैभव दिलीपराव घुगे यांचे मुळगाव वाशिम जिल्ह्यातील उडी (तालुका मालेगाव) हे आहे. वडील डॉ. दिलीपराव घुगे व्यवसायाने डॉक्टर व शेतकरी पण सामाजिक जान असल्यामुळे मिळेल, त्यामध्ये समाधानी होते. त्यामुळे त्यांनी आपल्या आयुष्यात चांगली माणसे कामवली. त्यांचे विचार आणि समाजहिताची कामे आजही ते नसतांना लोकांच्या मनात घर करून बसलेले आहेत. त्यांचाच वारसा घेऊन वैभव यांनी आयुष्याच्या प्रवासाची सुरुवात अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळेत करून ते अभियांत्रिकी (Mechanical Engineering) व व्यवसाय व्यवस्थापन (MBA) या शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत खडतर परिस्थितीत स्वताला प्रत्येक वळणावर सिद्ध करत पुढे घेऊन जाणारा होता. अत्यंत दुर्गम परिस्थितीत शिक्षण पुर्ण करत व वडिल डॉ. दिलीपराव घुगे यांच्या सामाजिक विचारांनी प्रेरित होऊन...
लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवणारा मूकनायक म्हणजेच “पत्रकार”
विशेष लेख

लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवणारा मूकनायक म्हणजेच “पत्रकार”

राष्ट्र कि प्रगती मे "निष्पक्ष पत्रकार" विपक्ष से ज्यादा प्रभावशाली होता है " पत्रकार म्हंटले कि एक पूर्वी चष्मा घातलेला , खांद्याला पिशवी अडकवलेला एक सुशिक्षित व्यक्ती असं चित्रण होत ,परंतु काळ बदलला तसा पत्रकारितेमध्ये सुद्धा मोठा बदल होत गेला . नव्हेतर पत्रकारितेचा चेहरा मोहरच बदलला . आधुनिक यंत्रणा, टेक्निकल स्किल्स, सोशल मीडिया अशा अनेक माध्यमातून हा बदल दिसत गेला. पत्रकारांचं काम हे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रातील माहिती मिळवणं त्याची बातमी बनवून लोकांपर्यंत पोहचवणे व त्यामाध्यमातून सामाजिक प्रबोधन करणे. अनेकवेळा शासकीय व्यवस्था, नेतेमंडळी, पोलीस यंत्रणा, गुन्हेगार यांच्याविरोधात सुद्धा पत्रकारांना भूमिका मांडाव्या लागतात. परंतु हे मांडत असताना निष्पक्ष व निर्भीडपणे लोकांसमोर आली तर अनेकांना न्याय मिळतो. अनेक चुकीचे प्रकार थंबतात. लोकशाहीत माध्यमांचं ...
आदिवासी समाज, परंपरा व वाटचाल
विशेष लेख

आदिवासी समाज, परंपरा व वाटचाल

प्रा. डॉ. किरण मोहिते सिंधू संस्कृतीच्या उत्खनातील आदिवासींचा उल्लेख आर्याच्या भारतातील आगनापूर्वी या देशात प्रगत संस्कृती असलेल्या लोकांचे अस्तित्व होते या लोकांना द्राविडीयन लोक म्हणतात. हे लोक म्हणजे नागपूजक होते. भारतात सिंधूच्या सुपीक खोऱ्यात हडप्पा आणि मोंहजोदडो हे दोन शहर अस्तित्वात होते. हडप्पा व मोंहजोदडो येथील उत्खनन प्राचीन संस्कृतीस 'हरप्पा संस्कृती' किंवा 'नागर संस्कृती' असे म्हणतात. ही आदिवासीची मूळ संस्कृती आहे. म्हणून हिला मूळ निवासीयांची संस्कृती असे म्हणतात. प्राचीन इतिहासकारांनी तिला सिंधू संस्कृती असे नाव दिले. हे द्राविडीयन लोक आजच्या भटक्या, शुद्र दलित आदिवासींचे पूर्वज आहेत. म्हणूनच सिंधू संस्कृतीला मूळ निवासी यांची संस्कृती किंवा द्रविडीयन संस्कृती म्हटले जाते. सिंधू संस्कृतीत धाडसी, शूर आर्याचे भारतात आगमन झाले. आर्यानी लोकांच्या संपत्ती काबीज केल्या. भ...
दलित अत्याचार व हत्याकांड प्रकरणी विद्यमान उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची राष्ट्रपतींकडे मागणी
पिंपरी चिंचवड

दलित अत्याचार व हत्याकांड प्रकरणी विद्यमान उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्याची राष्ट्रपतींकडे मागणी

मनीषा वाल्मिकी अत्याचार प्रकरणी योगी आदित्यनाथ राजीनामा द्या - सिद्दीकभाई शेख पिंपरी चिंचवड : उत्तर प्रदेश मधील हाथरस याठिकाणी मनीषा वाल्मिकी नावाच्या १९ वर्षीय तरूणीवर मारहाण करून १४ सप्टेंबर रोजी सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिने याची कुठेही वाच्यता करू नये म्हणून तिची जीभ देखील या नराधमांनी छाटली होती. उपचारादरम्यान दिनांक २९ सप्टेंबर रोजी रोजी तिचा मृत्यू झालेला आहे.मृत्यूनंतर तिचा अंतिम संस्कार तिच्या परिवाराच्या परवानगीशिवाय घाईगडबडीत रात्रीच्या वेळी करण्यात आला. हि घटना ताजी असतानाच लैंगिक अत्याचाराच्या ३ घटना घडल्या .यामुळे उत्तरप्रदेश मधील सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या गोष्टीचा निषेध करण्यासाठी अपना वतन संघटनेच्या वतीने दि. २ ऑकटोबर २०२० रोजी ,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डांगेचौक थेरगाव या ठिकाणी सकाळी " निदर्शने आंदोलन " करण्यात आले. यावेळी बोलताना अपना वतन...