महाराष्ट्र

मोहम्मद पैगंबर बिलाच्या जनजागृतीसाठी औरंगाबादमध्ये १४ मार्चला जाहीर सभा
महाराष्ट्र

मोहम्मद पैगंबर बिलाच्या जनजागृतीसाठी औरंगाबादमध्ये १४ मार्चला जाहीर सभा

. वंचितचे सर्वेसर्वा ॲड. बाळासाहेब आंबेडकर, रेखा ठाकूर यांची उपस्थिती औरंगाबाद : धार्मिक प्रतिकांचा गैरवापर करून दंगल घडविण्याचे षड्यंत्र करणाऱ्या विरोधात कडक कायदा करण्या साठी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी विधान परिषदेमध्ये मोहम्मद पैगंबर बिल सादर केले आहे या बिलाच्या जनजागृतीसाठी औरंगाबादेत 14 मार्च रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद व मुस्लिम इत्तेहाद फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष जावेद कुरेशी यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत दिली. यासंदर्भात अधिक माहिती देताना फारूक अहमद म्हणाले हमखास मैदानावर सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आलेल्या या जाहीर सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर प्रा अंजलीताई आंबेडकर मुस्लिम धर्मगुरू यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे हिंदू-मुस्लीम यांच...
धारावी पुनर्वसन प्रकल्पातील ८०० कोटींच्या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा
महाराष्ट्र

धारावी पुनर्वसन प्रकल्पातील ८०० कोटींच्या घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी रश्मी शुक्लांवर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार मुंबई : धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे. पुनर्वसन प्रकल्पासाठीच्या ४५ एकर जमिनीसाठी फडणवीस सरकारने रेल्वेला ८०० कोटी दिले परंतु आजपर्यंत ती जमीन राज्य सरकाला मिळालेली नाही आणि ८०० कोटी रुपयेही परत मिळाले नाहीत. ही जनतेच्या पैशाची लूट असून या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले म्हणाले की, धारावीतील लोकांना चांगली घरे मिळावीत, धारावीचा कायापालट व्हावा, मुंबई स्वच्छ व सुंदर व्हावी यासाठी विलासराव देशमुख यांचे सरकार असताना धारावीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ...
कर्जतमधील सामाजिक संघटनांचा दोन दिवसांचा मुंबई अभ्यास दौरा संपन्न
महाराष्ट्र

कर्जतमधील सामाजिक संघटनांचा दोन दिवसांचा मुंबई अभ्यास दौरा संपन्न

कर्जत (प्रतिनिधी) : कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना यांचा दोन दिवसांचा मुंबई अभ्यास दौरा संपन्न झाला असून सर्व सामाजिक संघटनेच्या कार्याचे मुंबईतील सर्व अधिकाऱ्यांनी कौतुक केले. कर्जत येथील सर्व सामाजिक संघटना ही गेल्या ५२० दिवसांपासून स्वच्छता आणि वृक्षारोपणाचे अखंड कार्य करीत असून पर्यावरण, स्वच्छता आणि पर्यावरणाशी निगडित विविध जैवविविधता यांचा अभ्यास करण्यासाठी सर्व सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सामाजिक संघटनेचे ३०ते ३५ स्वयंसेवक ४ व ५मार्च रोजी मुंबई अभ्यास दौऱ्यावर गेले होते. यावेळी किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र ऐरोली(नवी मुंबई)येथे फ्लोमिंग पक्षी माहिती, तसेच पाण्यातील खारफुटी वृक्ष आणि त्यांचे पाण्यातील मासे,किटक आणि पक्ष्यांसाह वातावरणातील शुद्ध हवा, मासे उत्पत्ती आणि त्यातून रोजगार निर्मिती आणि विविध जैविक घटकांच...
स्त्रीने आपली शक्ती ओळखून स्वतःसाठी काम करण्याची गरज आहे – डॉ. भालचंद्र मुणगेकर
महाराष्ट्र

स्त्रीने आपली शक्ती ओळखून स्वतःसाठी काम करण्याची गरज आहे – डॉ. भालचंद्र मुणगेकर

मुंबई : स्त्रीला जन्मजात तिसरा सेन्स असतो, ती जन्मताच पुरुषापेक्षा सक्षम असते मात्र आपले वर्चस्व गाजवण्यासाठी पुरुषाने तिला नेहमीच दुय्यम स्थान दिले आहे. आपण जोपर्यंत स्त्रीला समान वागणूक देत नाही, तिच्यावरचे अत्याचार बंद होत नाही, तोपर्यंत आपण पुरोगामी आहोत असे म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही! स्वतः स्त्रीने आपली शक्ती ओळखून स्वतःसाठी काम करण्याची गरज आहे. असे स्पष्ट मत डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले की, नॅशनल क्राईम ब्युरो मधील महिलांवरील अत्याचार, बलात्कार यांची आकडेवारी चिंताजनक आहे. शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या आणि स्त्रीला दुर्गारूप मानणाऱ्या राज्यातही अत्याचारांची संख्या मोठी आहे आणि म्हणूनच सामाजिक संस्था, महिला व पुरुष यांनी एकत्र येऊन जागरूकतेसाठी चळवळ उभी करण्याची गरज आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे परंपरा ,रूढी यात न अडकता स्त्रीने स्वतः सक्षम होण्याची ...
दोन वर्ष जनसेवेची, ‘महाविकास’ आघाडीची; लोककलेच्या माध्यमातून आजपासून होणार जागर
महाराष्ट्र

दोन वर्ष जनसेवेची, ‘महाविकास’ आघाडीची; लोककलेच्या माध्यमातून आजपासून होणार जागर

नाशिक दिनांक 6 मार्च 2022 (जिमाका वृत्तसेवा) : राज्यातील महाविकास आघाडी शासनाला नुकतीच दोन वर्ष पूर्ण झाली असून त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये लोककलेच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार असून त्यासाठी शासनमान्य यादी वरील लोककला पथकांममधील तीन पथकांची निवड करण्यात आली आहे. दोन वर्ष जनसेवेची, ‘महाविकास’ आघाडीची या घोषवाक्यासह जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालयामार्फत व्यापक जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यातील दहा शासनमान्य यादीवरील लोककला पथकांना पटकथेसह सादरीकरणाची संधी देण्यात आली होती. त्यातील तीन लोककला पथकांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेली कलापथके चाणाक्य कलामंच कलापथक, नाशिकनटराज लोककला अकादमी, इगतपुरीआनंद तरंग फाउंडेशन,...
चांदे बुद्रुक विकास सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमनचा सत्कार
महाराष्ट्र

चांदे बुद्रुक विकास सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमनचा सत्कार

कर्जत (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : चांदे बुद्रुक विकास सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन संतोष नवले, व्हाईस चेअरमन दादा किसन जगताप आणि युवा नेते नंदकुमार नवले यांचा चांद मुजावर, अमोल खोमणे व ग्रामपंचायत सदस्य नितीन जगधने मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी रामदास थोरात, नामदेव सूर्यवंशी, बाप्पू नवले, बंडू सूर्यवंशी, माजी चेअरमन रामदास नवले, अण्णा कांतीलाल नवले, तेजस नवले, बाळासाहेब जगताप, विशाल सूर्यवंशी आदी उपस्थित होते....
आजच्या अंध:कारमय परिस्थितीत प्रश्न विचारण्याचा अधिकार अबाधित ठेवाव्यास हवा – पद्मश्री अरविंद गुप्ता
महाराष्ट्र

आजच्या अंध:कारमय परिस्थितीत प्रश्न विचारण्याचा अधिकार अबाधित ठेवाव्यास हवा – पद्मश्री अरविंद गुप्ता

महाबळेश्वर : अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या शतकवीर-आधारस्तंभ पुरस्कार वितरण सोहळा पुस्तकांचे गांव भिलार-महाबळेश्वर येथे संपन्न झाला त्यावेळी पद्मश्री अरविंद गुप्ता यांनी आपले विचार परखडपणे मांडले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा ‘शतकवीर’ आणि ‘आधारस्तंभ’ पुरस्कार सोहळ्याचे उद्घाटन 26 तारखेला दुपारी तीन वाजता पुस्तकाचे गाव भिलार येथील हिलरेंज शिक्षण संस्थेच्या भव्य मैदानावर प्रसिद्ध अभिनेता किरण माने यांच्या हस्ते झाले. दुसऱ्या दिवशी 27 तारखेला सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील “आयुका” या विज्ञान संस्थेतील निवृत्त प्राध्यापक शास्त्रज्ञ व मुलांसाठी शेकडो वैज्ञानिक खेळणी बनवत, पुस्तके लिहीत त्यातून लहान मुलांच्यात वैज्ञानिक संकल्पना रुजविण्याचे पर्यायाने विज्ञान प्रसार...
विरेंद्र म्हात्रे यांना ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे’ पुरस्काराने सन्मानित
महाराष्ट्र

विरेंद्र म्हात्रे यांना ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे’ पुरस्काराने सन्मानित

नवी मुंबई (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : नेरुळ नोडमधील युवा नेते लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे अध्यक्ष विरेंद्र यशवंत म्हात्रे यांच्या मागील दोन वर्षात कोरोना महामारीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत युथ फोरम सोशियल असोसिएशन या सामाजिक संस्थेच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे’ पुरस्कारने विरेंद्र म्हात्रे यांना गौरविण्यात आले. देवीचा पाडा पनवेल या ठिकाणी सन्मान सोहळामध्ये युथ फोरम सोशिअल असोसिएशन या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित संस्थेचे अध्यक्ष केवल गायकवाड, संजीवन म्हात्रे यांच्या हस्ते विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केवल गायकवाड याच कार्यक्रमात लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई करत असलेल्या उल्लेखनीय जनताहितैषी कार्याचीही दखल युथ फोरम सोशिअल असोसिएशन या सामाजिक संस्थेकडून घेण्यात आली. लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई या सामाजिक संघट...
वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य – राजेंद्र कोळी
महाराष्ट्र, मोठी बातमी

वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य – राजेंद्र कोळी

किनवली (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य आहे, तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याचे काम विद्यार्थीदशेतच केले तर विज्ञाननिष्ठ पिढी घडवायला जास्त प्रभावी ठरेल होते. असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सांस्कृतिक विभाग समितीचे सदस्य राजू कोळी यांनी व्यक्त केले. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने जागतिक विज्ञान दिनाच्या निमित्त आयोजित किनवली येथील महाविद्यालयात बोलत होते. २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रसिद्ध वैज्ञानिक सी व्ही रमण यांनी आपले शोध याच दिवशी १९२८ ला जगापुढे मांडलेत. त्याचे औचित्य साधून राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती विविध शाळा कॉलेजेस मध्ये जावून या विज्ञान दिनाच्या निमित्ताने सातत्याने प्रबोधना...
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्ह्यातर्फे ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे वाटप
मोठी बातमी, महाराष्ट्र

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्ह्यातर्फे ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे वाटप

ठाणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : शिवजयंती निमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्ह्याच्या वतीने कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाचे वाटप डोंबिवलीत ठिक-ठिकाणी करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे, राष्ट्र सेवा दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. डोंबिवली एमआयडीसी येथील शिवाई बालक मंदिर मधील विद्यार्थ्यांना शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाटप करून छत्रपती शिवारायांची माहिती देण्यात आली. एमआयडीसीतील रिक्षा स्टँड वरील रिक्षाचालकांसह अनेकांना या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. डोंबिवली येथील लोढा हेवन ग्रीन पार्क सोसायटी मधील मुलांनासुद्धा या पुस्तकाचे वाटप करून व समाजातील लहान थोरांपर्यंत शिवाजी महाराजांचे खरे चारित्र पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. शिवरायांचे दैवती...