राष्ट्रीय

National News Marathi

वंदेभारत अभियानांतर्गत ८२ विमानांनी १३ हजार ४५६ प्रवासी मुंबईत दाखल
राष्ट्रीय, मोठी बातमी

वंदेभारत अभियानांतर्गत ८२ विमानांनी १३ हजार ४५६ प्रवासी मुंबईत दाखल

मुंबई : वंदेभारत अभियानांतर्गत 82 विमानांतून तब्बल 13 हजार 456 प्रवासी मुंबईत दाखल झाले असून ते विविध देशातून मुंबईत आले आहेत. 1 जुलै, 2020 पर्यंत आणखी 76 विमानांनी प्रवासी मुंबईत येणार आहेत. आलेल्या एकूण 13 हजार 456 प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 4 हजार 989 इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 4 हजार 364 आहे तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 4 हजार 103 इतकी आहे. आलेल्या सर्व प्रवाशांना महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या दिनांक 24 मे, 2020 च्या मार्गदर्शक सुचनेनुसार क्वारंटाईन करण्यात येत आहे. आलेले प्रवासी हे विविध देशांमधून आले आहेत त्यामध्ये ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर...
भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती व्यवसाय मोठ्या संकटात – शरद पवार
राष्ट्रीय, मोठी बातमी

भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती व्यवसाय मोठ्या संकटात – शरद पवार

शरद पवारांचे पंतप्रधानांना कृषी क्षेत्रातील संकटाबाबत पत्र मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी शेतीशी निगडीत कामे करण्यास सक्षम नाही. भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेती व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे आपण त्वरित शेतीविषयक ठोस धोरण जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी क्षेत्रावरील संकट लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान आपण पुढाकार घेऊन शेतकऱ्यांच्या हितासंबंधी निर्णय घेण्यास पुढाकार घेवून आवश्यक ती पावले उचलावी अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे. अर्थमंत्री श्रीमती...
कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी माजी सैनिक सज्ज
राष्ट्रीय

कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी माजी सैनिक सज्ज

या कठीण प्रसंगी स्वतःहून सेवा देण्याचे सेवानिवृत्तांचे उद्दिष्ट नवी दिल्ली, 2 एप्रिल : कोविड -19 महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना राष्ट्र करीत असताना, संरक्षण मंत्रालयाच्या (एएसएम) माजी सैनिक कल्याण विभागाने (ईएसडब्ल्यू),आवश्यक तेथे मनुष्यबळ वाढवून राज्य आणि जिल्हा प्रशासनास मदत करण्यासाठी माजी सैनिकांची मदत घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एखादा संपर्क क्रमांक शोधणे, सामुदायिक पाळत ठेवणे, विलगीकरण सुविधांचे व्यवस्थापन किंवा त्यांना नेमून दिलेले कोणतेही सार्वजनिक उपक्रम राबविण्यात राज्य आणि जिल्हा प्रशासनास मदत करण्यासाठी जास्तीत जास्त सेवानिवृत्त स्वयंसेवकांची ओळख पटवून त्यांना एकत्रित करण्यात राज्य सैनिक मंडळे आणि जिल्हा सैनिक मंडळे महत्वाची भूमिका बजावत आहेत. या आव्हानात्मक परिस्थितीत देशाने दिलेल्या हाकेला प्रतिसाद देत स्वतःहून सेवा दे...
लोकांमध्ये भीती पसरू नये तसेच कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी खोट्या बातम्यांविरोधात लढण्यासाठी उपाययोजनाबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाचे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पत्र
मोठी बातमी, राष्ट्रीय

लोकांमध्ये भीती पसरू नये तसेच कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी खोट्या बातम्यांविरोधात लढण्यासाठी उपाययोजनाबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाचे राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना पत्र

नवी दिल्ली, 2 एप्रिल : माननीय सर्वोच्च न्यायालयाने एका रिट याचिकेवर सुनावणी करताना, खोट्या बातम्यांमुळे स्थलांतरित मजुरांमध्ये भीती निर्माण होऊन ते मोठ्या संख्येने शहर सोडून जात असल्याची गंभीर दखल घेतली आहे. यामुळे या लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायालयाच्या टिप्पणीनंतर केंद्रीय गृह मंत्रालय (एमएचए) चे सचिव अजय कुमार भल्ला यांनी सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना खोट्या बातम्यांविरोधात प्रभावी उपाययोजना करण्याबाबत पत्र लिहिले आहे. केंद्र सरकार लोकांसाठी तथ्य आणि पडताळणी न झालेल्या बातम्यांची त्वरित शहानिशा करण्यासाठी वेब पोर्टल तयार करत आहे असे या पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. राज्ये / केंद्रशासित प्रदेशांनी या संबंधित समस्यांसाठी त्यांच्या पातळीवर अशा...
कोविड-19 विरुद्धच्या राष्ट्रव्यापी अभियानात एनसीसीचे कॅडेट सहभागी होणार
मोठी बातमी, राष्ट्रीय

कोविड-19 विरुद्धच्या राष्ट्रव्यापी अभियानात एनसीसीचे कॅडेट सहभागी होणार

कॅडेट्सच्या तात्पुरत्या नियुक्त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी नवी दिल्ली, 2 एप्रिल : राष्ट्रीय छात्र सेनेने (एनसीसी) ‘एनसीसी योगदान अभियान’ अंतर्गत आपल्या कॅडेटच्या सेवांचा विस्तार करत कोविड-19 विरुद्धच्या राष्ट्रव्यापी अभियानात नागरी प्रशासनाला मदतीचा हात पुढे केला आहे. साथीच्या आजारा विरुद्धच्या लढाईत सहभागी असलेल्या विविध संस्थाच्या कार्यात आणि त्यांच्या प्रयत्नांमध्ये सहकार्य करण्यासाठी एनसीसीने त्यांच्या कॅडेट्सच्या तात्पुरत्या रोजगारासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. एनसीसी कॅडेट्ससाठी नियोजित कामांमध्ये हेल्पलाइन / कॉल सेंटरचे व्यवस्थापन; मदत पुरवठा / औषधे / अन्न / आवश्यक वस्तूंचे वितरण; समुदाय सहकार्य; डेटा व्यवस्थापन आणि सार्वजनिक ठिकाणी लोकांना रांगा लावून उभे राहण्याची व्यवस्था आणि रहदारी व्यवस्थापन यांचा समावेश आहे.मार्गदर्शक सूचनांनुसार का...
कोविड-19 बाबतच्या जनजागृतीसाठी टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा पुढाकार
मोठी बातमी, राष्ट्रीय

कोविड-19 बाबतच्या जनजागृतीसाठी टाटा मूलभूत संशोधन संस्थेचा पुढाकार

योग्य माहितीचा स्थानिक भाषेत प्रसार करून समाजातील भ्रामक समजुती दूर करण्याचा उद्देश लोकमराठी न्यूज नेटवर्क नवी दिल्ली, 1 एप्रिल : कोरोना हा रोग परदेशात उद्भवला होता, परंतु आम्हाला स्थानिक गरजांनुसार आपल्या लोकसंख्येला हे समजावून सांगावे लागेल, ज्यासाठी ही स्थानिक भाषा महत्त्वाची आहे. आम्हाला आशा आहे की या सामग्रीचा वापर लोकांमध्ये जागृती करण्यासाठी प्रभावी ठरू शकेल, असे मत टाटा मूलभूत संशोधन संस्थेने (टीआयएफआर) डॉ. भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. चीनमधील वुहान शहरात प्रथम उद्भवलेल्या कोविड-19 या आजाराने आता संपूर्ण जगच व्यापले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने तो साथीचा आजार म्हणून जाहीर केला असून सध्या त्याचा प्रसार 204 देशांमध्ये झालेला आहे. साथीच्या आजाराबरोबरच लोकांमध्ये काळजी, अंधश्रद्धा, भीतीचे वातावरण तयार झाले. अलगीकरण, विलगीकरण, लॉकडाउन यासारख्या अत्यंत महत्वाच्या उपायांची...
#coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून ५०० कोटींची मदत जाहीर
राष्ट्रीय, मोठी बातमी

#coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी टाटा ग्रुपकडून ५०० कोटींची मदत जाहीर

मुंबई : कोरोना व्हायरशी लढाईसाठी टाटा ग्रुपकडून ५०० कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ग्रुपचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. देशावर आलेल्या प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी टाटा ट्रस्टकडून नेहमीच योगदान दिलं जाते. टाटा ग्रुपने आताही कोरोनाच्या लढाईत मोठं योगदान दिलं आहे. टाटा कंपनी आणि ग्रुप्सने यापूर्वीही देशावरील संकटात आपलं योगदान दिलं आहे. आताही, देशसेवेत योगदान देण्याची हीच ती वेळ आहे. सध्याच्या काळाजी गरज आणि इतर वेळेपेक्षा आपलं योगदान देण्याची हीच ती वेळ असल्याचे टाटा यांनी सांगितले आहे. टाटा समूहाकडून वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाच्या खरेदींसाठी ५०० कोटी रुपये देण्यात येत आहेत, असे पत्र रतन टाटा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलं आहे. https://twitter.com/RNTata2000/status/1243852348637605888 गेल्या ...
दिल्लीतील दंगलीत 10 जणांचा मृत्यू, जाफ्राबादमधील आंदोलकांना हटवले
राष्ट्रीय, मोठी बातमी

दिल्लीतील दंगलीत 10 जणांचा मृत्यू, जाफ्राबादमधील आंदोलकांना हटवले

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या कायद्याला विरोध करणारे आंदोलक आणि या कायद्याचं समर्थन करणारे लोक यांच्यात वादावादी झाली. जाफ्राबागमधून पोलिसांनी आंदोलकांना हटवलं आहे. रविवारपासून आंदोलकांनी इथला रस्ता अडवून धरला होता. सोनवारपासून इथं हिंसाचार सुरु झाला. यामध्ये एका पोलिसासह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. बीबीसीने याबाबत वृत्त दिले आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, दिवसभर सुरू असलेल्या हिंसक घटनांनंतर दिल्लीतल्या चांदबाग, भजनपुरा, ब्रिजपुरी, गोकुळपुरी आणि जाफ्राबाद या भागात 24 तारखेची रात्र भीतीने भरलेली होती. वृत्तांकनासाठी फिरत असताना ओल्ड ब्रिजपुरी भागात सर्फराझ अली भेटले. काकांच्या अंत्यसंस्काराहून ते येत होते. त्यांचे वडील बरोबर होते, त्याचवेळी जमावाने त्यांना घेरलं. "त्यांनी मला नाव विचारलं. मी वेगळं न...
मोदी सरकारकडून Income Tax दरात मोठी कपात; पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
राष्ट्रीय

मोदी सरकारकडून Income Tax दरात मोठी कपात; पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

लोकमराठी :-नवी दिल्ली:केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून शनिवारी संसदेत २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या Income Tax (प्राप्तीकर) नव्या स्लॅबची घोषणा केली. त्यानुसार पाच लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर लागणार नाही. तर ५ लाख ते ७.५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना १० टक्के कर भरावा लागेल. यापूर्वी या टप्प्यातील करदात्यांना २० टक्के कर भरावा लागत होता.याशिवाय, ७.५ लाख ते १० लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना २० टक्क्यांऐवजी १५ टक्के इतका कर भरावा लागणार आहे तर १० ते १२.५ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना २० टक्के कर भरावा लागेल. यापूर्वी हा दर ३० टक्के इतका होता. तर १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना ३० टक्के कर भरावा लागेल.. ...
प्रेरणादायी|पुढचा स्टॉप IAS! बस कंडक्टरने पास केली UPSC परीक्षा
मोठी बातमी, राष्ट्रीय

प्रेरणादायी|पुढचा स्टॉप IAS! बस कंडक्टरने पास केली UPSC परीक्षा

बंगळुरू (लोकमराठी ) : केल्यानं होत आहे रे आधी केलेची पाहिजे, असं आपण अनेकदा ऐकलं आहे. पण, एका बस कंडक्टरने आपल्या कृतीतून हे दाखवून दिलंय. मधु एनसी या बस कंटक्टरचा प्रवास नक्कीच सोपा नाही. मात्र, ध्येय्याने पछाडलेली माणसं हार मानत नाहीत, याच उत्तम उदारण म्हणजे बस कंडक्टर मधु होय. बीएमटीसीच्या बसमध्ये मधु कंडक्टर म्हणून कार्यरत आहे. तरीही, अधिकारी होण्याचं त्याचं स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नाही. आपलं उद्दिष्ठ ठिकाण म्हणजे IAS गाठण्यासाठी त्याचा केवळ एक स्टॉपचा प्रवास उरला आहे. बंगळुरू मेट्रोपोलिटीन ट्रान्सपोर्ट सेवेत कंडक्टर असलेल्या मधुने युपीएससी परीक्षा पास केलीय.नुकतेच मधुने युपीएससीची मुख्य परिक्षा (मेन एक्झाम) पास केली असून आता आपलं ध्येय गाठण्यासाठी एकच स्टॉप बाकी आहे. म्हणून नेक्स स्टॉप आयएएस.. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. युपीएससी परीक्षेसाठी 25 मार्च रोजी मधुची म...