वंदेभारत अभियानांतर्गत ८२ विमानांनी १३ हजार ४५६ प्रवासी मुंबईत दाखल
मुंबई : वंदेभारत अभियानांतर्गत 82 विमानांतून तब्बल 13 हजार 456 प्रवासी मुंबईत दाखल झाले असून ते विविध देशातून मुंबईत आले आहेत. 1 जुलै, 2020 पर्यंत आणखी 76 विमानांनी प्रवासी मुंबईत येणार आहेत.
आलेल्या एकूण 13 हजार 456 प्रवाशांमध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 4 हजार 989 इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 4 हजार 364 आहे तर इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 4 हजार 103 इतकी आहे. आलेल्या सर्व प्रवाशांना महसूल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या दिनांक 24 मे, 2020 च्या मार्गदर्शक सुचनेनुसार क्वारंटाईन करण्यात येत आहे. आलेले प्रवासी हे विविध देशांमधून आले आहेत त्यामध्ये ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर...