राष्ट्रीय

National News Marathi

दिल्लीतील दंगलीत 10 जणांचा मृत्यू, जाफ्राबादमधील आंदोलकांना हटवले
राष्ट्रीय, मोठी बातमी

दिल्लीतील दंगलीत 10 जणांचा मृत्यू, जाफ्राबादमधील आंदोलकांना हटवले

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या कायद्याला विरोध करणारे आंदोलक आणि या कायद्याचं समर्थन करणारे लोक यांच्यात वादावादी झाली. जाफ्राबागमधून पोलिसांनी आंदोलकांना हटवलं आहे. रविवारपासून आंदोलकांनी इथला रस्ता अडवून धरला होता. सोनवारपासून इथं हिंसाचार सुरु झाला. यामध्ये एका पोलिसासह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. बीबीसीने याबाबत वृत्त दिले आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार, दिवसभर सुरू असलेल्या हिंसक घटनांनंतर दिल्लीतल्या चांदबाग, भजनपुरा, ब्रिजपुरी, गोकुळपुरी आणि जाफ्राबाद या भागात 24 तारखेची रात्र भीतीने भरलेली होती. वृत्तांकनासाठी फिरत असताना ओल्ड ब्रिजपुरी भागात सर्फराझ अली भेटले. काकांच्या अंत्यसंस्काराहून ते येत होते. त्यांचे वडील बरोबर होते, त्याचवेळी जमावाने त्यांना घेरलं. "त्यांनी मला नाव विचारलं. मी वेगळं नाव सा...
मोदी सरकारकडून Income Tax दरात मोठी कपात; पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
राष्ट्रीय

मोदी सरकारकडून Income Tax दरात मोठी कपात; पाच लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

लोकमराठी :-नवी दिल्ली:केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून शनिवारी संसदेत २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्यांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या Income Tax (प्राप्तीकर) नव्या स्लॅबची घोषणा केली. त्यानुसार पाच लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही कर लागणार नाही. तर ५ लाख ते ७.५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना १० टक्के कर भरावा लागेल. यापूर्वी या टप्प्यातील करदात्यांना २० टक्के कर भरावा लागत होता.याशिवाय, ७.५ लाख ते १० लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना २० टक्क्यांऐवजी १५ टक्के इतका कर भरावा लागणार आहे तर १० ते १२.५ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना २० टक्के कर भरावा लागेल. यापूर्वी हा दर ३० टक्के इतका होता. तर १५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना ३० टक्के कर भरावा लागेल.....
प्रेरणादायी|पुढचा स्टॉप IAS! बस कंडक्टरने पास केली UPSC परीक्षा
मोठी बातमी, राष्ट्रीय

प्रेरणादायी|पुढचा स्टॉप IAS! बस कंडक्टरने पास केली UPSC परीक्षा

बंगळुरू (लोकमराठी ) : केल्यानं होत आहे रे आधी केलेची पाहिजे, असं आपण अनेकदा ऐकलं आहे. पण, एका बस कंडक्टरने आपल्या कृतीतून हे दाखवून दिलंय. मधु एनसी या बस कंटक्टरचा प्रवास नक्कीच सोपा नाही. मात्र, ध्येय्याने पछाडलेली माणसं हार मानत नाहीत, याच उत्तम उदारण म्हणजे बस कंडक्टर मधु होय. बीएमटीसीच्या बसमध्ये मधु कंडक्टर म्हणून कार्यरत आहे. तरीही, अधिकारी होण्याचं त्याचं स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नाही. आपलं उद्दिष्ठ ठिकाण म्हणजे IAS गाठण्यासाठी त्याचा केवळ एक स्टॉपचा प्रवास उरला आहे. बंगळुरू मेट्रोपोलिटीन ट्रान्सपोर्ट सेवेत कंडक्टर असलेल्या मधुने युपीएससी परीक्षा पास केलीय.नुकतेच मधुने युपीएससीची मुख्य परिक्षा (मेन एक्झाम) पास केली असून आता आपलं ध्येय गाठण्यासाठी एकच स्टॉप बाकी आहे. म्हणून नेक्स स्टॉप आयएएस.. असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. युपीएससी परीक्षेसाठी 25 मार्च रोजी मधुची मुलाखत च...
#JNU_Attack: जेएनयू हिंसाचाराचा डाव्या संघटनांवरच ठपका
राष्ट्रीय

#JNU_Attack: जेएनयू हिंसाचाराचा डाव्या संघटनांवरच ठपका

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यापीठातील हिंसाचारामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या ठाकलेल्या दिल्ली पोलिसांनी आज अखेर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. या प्रकरणी नऊ संशयितांची ओळख पटविताना त्यांनी "जेएनयूएसयू'ची अध्यक्षा आईशी घोषवर हिंसाचाराचा ठपका आहे. दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी संशयितांची सीसीटीव्ही छायाचित्रे माध्यमांसमोर मांडली. यामध्ये "जेएनयूएसयू'ची अध्यक्षा आईशी घोष हिच्यासह चुनचुन कुमार, पंकज मिश्रा, वासकर विजय, सुचेता तालुकराज, प्रिया रंजन, दोलन सावंत, योगेंद्र भारद्वाज, विकास पटेल यांचा समावेश आहे. हिंसाचारप्रकरणी आत्तापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले असून, अद्याप कोणत्याही संशयिताला अटक करण्यात आलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, आईषी घोषचे हीने हे आरोप फेटाळले असून मी काहीही चुकीचे केलेले नसून, पोलिसांना घाबरत नाही. कायद्याच्या बा...
देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या अधिक
मोठी बातमी, राष्ट्रीय

देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांच्या आत्महत्या अधिक

नॅशनल क्राइम रेकोर्ड ब्युरोने जाहीर केली आकडेवारी नवी दिल्ली : देशभरात शेतकऱ्यांपेक्षा बेरोजगारांनी अधिक आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गृह मंत्रालयातंर्गत येणारी संस्था नॅशनल क्राइम रेकोर्ड ब्युरोने (एनसीआरबी) २०१७-१८ मधील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यावरून ही बाब उघड झाली आहे. देशभरातील गुन्हे व त्यांच्याशी निगडीत घटनांचे आकडेवारी एनसीआरबी जाहीर करते. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार बेरोजगारीमुळे वर्ष २०१८ मध्ये १२ हजार ९३६ लोकांनी आत्महत्या केली. तर, कर्ज व शेतीच्या इतर कारणांमुळे १० हजार ३४९ जणांनी आत्महत्या केली. त्यामध्ये ५७६३ शेतकऱ्यांनी आणि ४५८६ शेतमजुरांनी आत्महत्या केली. ५४५७ पुरुष शेतकरी आणि ३०६ महिला शेतकऱ्यांचा समावेश होता. शेतमजुरांमध्ये ४०७१ पुरुष आणि ५१५ महिलांचा समावेश होता. वर्ष २०१७ मध्ये १२ हजार २४१ जणांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केली होती. तर...
कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा सहकारी गँगस्टर एजाज लकडावाला पोलिसांच्या ताब्यात
ताज्या घडामोडी, मोठी बातमी, राष्ट्रीय

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा सहकारी गँगस्टर एजाज लकडावाला पोलिसांच्या ताब्यात

मुंबई (वृत्तसंस्था) : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा जवळचा मित्र व सहकारी एजाज लकडावालाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. गेली अनेक वर्ष पोलिस त्याच्या मागावर होते. अखेर सापळा रचून मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने त्याला पाटणा विमानतळावरून अटक केली. न्यायालयाने त्याला 21 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 2003 मध्ये बँकॉकमध्ये झालेल्या एका हल्ल्यात एजाजचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र, तसे नसून तो वेश व देश बदलून राहात होता. गेले काही दिवस तो कॅनडामध्ये राहात होता. त्याच्याविरूद्ध मुंबई, दिल्ली व महत्त्वाच्या शहरांमध्ये हत्या, खंडणी व या सारखे अनेक प्रकारचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. https://twitter.com/ANI/status/1215180050418421760 यापूर्वी एजाजच्या मुलीला अटक करण्यात आली होती. खोटा पासपोर्ट बनवून पळून जायच्या बेतात असलेल्या त्याच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले, ...
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संसदेच्या संरक्षणविषयक सल्लागार समितीवर नियुक्ती
मोठी बातमी, राष्ट्रीय

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संसदेच्या संरक्षणविषयक सल्लागार समितीवर नियुक्ती

नवी दिल्ली, (लोकमराठी) : भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संरक्षणविषयक सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे, इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे. एकूण 21 सदस्यांची ही समिती आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या समितीचे अध्यक्ष आहेत. प्रज्ञा ठाकूर यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांचा भोपाळमध्ये पराभव केला होता. सध्या त्यांच्यावर बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्ह्यांची प्रकरणे आहेत....
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण : पश्चिम विभागात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित
राष्ट्रीय

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण : पश्चिम विभागात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली, (लोकमराठी) : स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाला आज केंद्रीय रसायने व खतेमंत्री सदानंद गौडा यांच्या हस्ते देशातील पश्चिम विभागातील दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने आज जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून येथील प्रवासी भारतीय केंद्रात आयोजित कार्यक्रमात ‘स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण-2019’ पुरस्कार प्रदान करण्यात आले. केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री रतनलाल कटारीया , पेयजल व स्वच्छता विभागाचे सचिव परमेश्वरन अय्यर यावेळी मंचावर उपस्थित होते. उत्कृष्ट कार्याकरिता यावेळी विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. पश्चिम विभागामधून महाराष्ट्राला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव तथा स्व...
महाराष्ट्रातील आगामी सरकार कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न नक्कीच सोडवेल: उज्ज्वलाताई संभाजी पाटील
राष्ट्रीय

महाराष्ट्रातील आगामी सरकार कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न नक्कीच सोडवेल: उज्ज्वलाताई संभाजी पाटील

बेळगाव (लोकमराठी) : महाराष्ट्रात जे सरकार आता येईल, ते नक्कीच कर्नाटक-बेळगाव सीमाप्रश्न सोडवेल. कन्नडिकांचे विविध अत्याचारांपासून सीमावासियांना मुक्ती मिळेल असा ठाम विश्वास; बेळगावसह संयुक्त महाराष्ट्रासाठी लढणारे ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख होती, असे दिवंगत माजी आमदार संभाजी पाटील यांच्या सुविद्य पत्नी उज्ज्वलाताई पाटील यांनी व्यक्त केला. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या प्रतिनिधींचा कोल्हापूर बेळगाव व गोवा दौरा राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. बेळगावातील मा आ संभाजी पाटील यांचे कार्यालयात एनयुजेमहाराष्ट्र प्रतिनिधींचे स्वागत करण्यात आले. त्याप्रसंगी पत्रकारांना संबोधित करताना उज्ज्वलाताई बोलत होत्या. "आगामी सरकारमधील प्रमुखांना सीमावासियांच्या वेदना माहिती आहेत. मात्र, महाराष्ट्रातील सध्याच्या पिढीला कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद हा विषयही ...
भारतीय जनता पार्टीला 700 कोटींचा ‘पार्टी फंड’
मोठी बातमी, राष्ट्रीय

भारतीय जनता पार्टीला 700 कोटींचा ‘पार्टी फंड’

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीला (भाजप) एका वर्षात तब्बल 700 कोटी रुपयांचा पार्टी फंड मिळाला आहे. ऑनलाईन पेमेंट आणि चेकच्या माध्यमातून सन 2018-19 या आर्थिक वर्षात भाजपला पक्षनिधी म्हणून विविध संस्था आणि व्यक्तींकडून 700 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. यापैकी जवळपास निम्मी रक्कम ही टाटाच्या अधिपत्याखालील इलेक्ट्रोल ट्रस्टकडून देण्यात आला आहे. भाजपानेच याबाबतची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. भाजप हा सध्या देशातील सर्वात मोठा पक्ष जगातील सर्वात मोठी पार्टी असल्याचा दावाही भाजपाकडून करण्यात येतो. त्यामुळेच, भाजपला मिळणारा निधीही कोट्यवधी रुपयांचा असतो. सन 2018-19 या आर्थिक वर्षात भाजपाला तब्बल 700 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. टाटा उद्योग समुहाशी संलग्नित इलेक्ट्रोल ट्रस्टकडून तब्बल 356 कोटी रुपयांचा निधी भाजपाला देण्यात आला आहे. तसेच, देशातील काही विश्वसनीय संस्थांकडूनही 54.25 कोट...