एस. एम. जोशी कॉलेजमध्ये ‘काव्य संमेलन’ संपन्न
हडपसर (प्रतिनिधी) : कवितेमधून कवी आपल्या मनातील भावना व्यक्त करीत असतो. कवितेत एक अद्भुत शक्ती आहे. युवकांनी साहित्याचे वाचन केले पाहिजे. साहित्य मनाची मशागत करते. आभासी विश्वातही कविता आनंद देत आहे. साहित्यिकांच्या सहवासात काव्य मैफिलीतून आनंद मिळतो. असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे साहेब यांनी व्यक्त केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित केलेल्या काव्य संमेलनात अध्यक्ष म्हणून त्यांनी आपले विचार व्यक्त केले. एस. एम. जोशी कॉलेजमधील मराठी विभाग, मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम व वैश्विक कला पर्यावरण औंध, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा काव्य संमेलनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हॉलंडचे सुप्रसिद्ध कवी व चित्रकार भास्कर हांडे यांनी या संमेलनासाठी शुभेच्छा दिल्या.
या काव्य संमेलनात कवी अनंत राऊत (पुणे), कवी ज्ञानेश्वर तिखे (इंदोर), कवी बा...










