
हडपसर (प्रतिनिधी) : प्रत्येकाला जीवनात संघर्ष करावा लागतो. प्रामाणिकपणे कष्ट केल्यावर सन्मान प्राप्त होतो.कितीही अडचणी आल्या तरी यशाचा मार्ग सोडू नका.रागात कोणताही निर्णय घेऊ नका. स्वतःवर प्रेम करा. तरच इतरांबद्दल आपण सहिष्णुता ठेवू शकतो, असे विचार मुनेश मोहन कालिया यांनी मांडले. ते एस.एम. जोशी कॉलेजमध्ये सामाजिक सहिष्णुता दिन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन .एस. गायकवाड होते. ते म्हणाले की, सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी सहिष्णुतेची भावना फार महत्त्वाची आहे.सर्वधर्मसमभाव जोपासणे ही सुद्धा सहिष्णुतेची भावना आहे.जगात भारत देश त्याचे उत्तम उदाहरण आहे. प्रास्ताविक डॉ. निशा गोसावी यांनी केले. आभार डॉ. एस. बी. जगताप यांनी मानले. या समारंभाला सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, कार्यालयीन सेवक उपस्थित होते.
PIMPRI CHANCHWAD : उताऱ्यात नोंद लावण्यासाठी चार लाखांची लाच; मंडलाधिकारी अटकेत
पिंपरी : बंगल्याची सातबारा उताऱ्यात नोंद करण्यासाठी चार लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडलेल्या मं...
PIMPRI:पत्नीच्या आत्महत्येस कारणीभूत ठरू नये म्हणून पतीने रचला बनाव…
पिंपरी :- मुलीच्या मृत्यूला पत्नीला जबाबदार धरून पतीने तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. या त्रासाला कं...
MUMBAI:प्रतिज्ञापत्रासाठी पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ…
मुंबई :- राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच नागरिकांना मोठा दिलासा दिला. आता शासकीय काम...
Jagtik Mahila Din 2025 : जागतिक महिला दिन का साजरा केला जातो
जागतिक महिला दिन (International Women's Day) दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्य...