यशाचा कळस इच्छाशक्ती जिद्द व सराव या त्रिसूत्रीवर अवलंबून आहे – आयआरएस अधिकारी अभिजीत पाखरे
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये मुलींसाठी निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
हडपसर, दि. ५ मे २०२५ | प्रतिनिधी : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासाशिवाय दुसरा पर्याय नाही. जे विद्यार्थी सातत्यपूर्ण प्रयत्न करतात ते विद्यार्थी आयुष्यामध्ये यशस्वी होतात. विद्यार्थ्यांनी आपण अधिकारी होणारच असा आत्मविश्वास मनामध्ये बाळगणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता लक्षात घेऊन ध्येय ठरवल्यास आयुष्यामध्ये ते लवकर यशस्वी होतात. विद्यार्थ्याने दैनंदिन वाचनातून आणि अनुभवांमधून आपला विचारव्यूह तयार करायला पाहिजे. व्यवस्था बदलायची असेल तर विद्यार्थ्यांनी अगोदर व्यवस्थेमध्ये येणे आवश्यक आहे. यशाचा कळस इच्छाशक्ती जिद्द व सराव या त्रिसूत्रीवर अवलंबून असल्याचे मत अभिजीत पाखरे (IRS) यांनी व्यक्त केले.
रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेज, हडपसर येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र...