कवीची ओळख ही त्याच्या वैचारिक भूमिकेतून व्हायला हवी – कवी संतोष पवार
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये मराठी भाषा पंधरवडानिमित्त काव्यसंमेलन व पत्रकार गौरव समारंभ संपन्न
हडपसर (प्रतिनिधी) : समाजाला डोळसपणे पाहून जर काव्य लिहिले तर ते समाजमनाला आवडते. कवीची ओळख ही त्याच्या वैचारिक भूमिकेतून व्हायला हवी. आम्ही चळवळीच्या प्रदेशातील कवी आहोत. त्यामुळेच आमच्या कवितेत वैचारिकता दिसून येते. जिथे श्वास थांबतो तिथे कवितेची ओळ थांबते. जिथे विचार संपतो तिथे कविता संपते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी संतोष पवार (Santosh Pawar) यांनी येथे केले.
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये (SM Joshi College) मराठी विभाग व मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम, वैश्विक कला पर्यावरण यांच्या वतीने मराठी भाषा पंधरवडानिमित्त काव्य संमेलन व पत्रकार गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
त्यांच्या गांधीला टाळून, माहेराला माती होती, माती जन्माची सोबती, बाईपणाच्या जातीला घोर...