हडपसर (प्रतिनिधी) : प्रत्येकाला जीवनात संघर्ष करावा लागतो. प्रामाणिकपणे कष्ट केल्यावर सन्मान प्राप्त होतो.कितीही अडचणी आल्या तरी यशाचा मार्ग सोडू नका.रागात कोणताही निर्णय घेऊ नका. स्वतःवर प्रेम करा. तरच इतरांबद्दल आपण सहिष्णुता ठेवू शकतो, असे विचार मुनेश मोहन कालिया यांनी मांडले. ते एस.एम. जोशी कॉलेजमध्ये सामाजिक सहिष्णुता दिन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन .एस. गायकवाड होते. ते म्हणाले की, सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी सहिष्णुतेची भावना फार महत्त्वाची आहे.सर्वधर्मसमभाव जोपासणे ही सुद्धा सहिष्णुतेची भावना आहे.जगात भारत देश त्याचे उत्तम उदाहरण आहे. प्रास्ताविक डॉ. निशा गोसावी यांनी केले. आभार डॉ. एस. बी. जगताप यांनी मानले. या समारंभाला सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, कार्यालयीन सेवक उपस्थित होते.
महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघाचा स्नेहमेळावा उत्साहात साजरा
लोकमराठी न्यूज : पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास असलेल्या महाड पोलादपूर तालुका समाज सेवा संघ व ह…
KALEWADI : मुख्य रस्ता पाणीपुरवठा व जलनिस्सारण वाहिनीच्या कामाचे आमदार अश्विनी जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन
माजी नगरसेविका निता पाडाळे यांच्या पाच वर्षापासूनच्या पाठपुराव्याला यश
पिंपरी (प्रतिनिधी) …
विवाहितेच्या छळाप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीवर कौटुंबिक हिंसाचार व अॅट्रासिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल
कॉंग्रेस महिला शहराध्यक्षा सायली नढे यांच्या प्रयत्नामुळे पिडीतीच्या अन्यायला फुटली वाचा …
प्रबुद्ध संघातर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
पिंपरी : चिंचवडगाव येथे प्रबुद्ध संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या …