
हडपसर (प्रतिनिधी) : प्रत्येकाला जीवनात संघर्ष करावा लागतो. प्रामाणिकपणे कष्ट केल्यावर सन्मान प्राप्त होतो.कितीही अडचणी आल्या तरी यशाचा मार्ग सोडू नका.रागात कोणताही निर्णय घेऊ नका. स्वतःवर प्रेम करा. तरच इतरांबद्दल आपण सहिष्णुता ठेवू शकतो, असे विचार मुनेश मोहन कालिया यांनी मांडले. ते एस.एम. जोशी कॉलेजमध्ये सामाजिक सहिष्णुता दिन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन .एस. गायकवाड होते. ते म्हणाले की, सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी सहिष्णुतेची भावना फार महत्त्वाची आहे.सर्वधर्मसमभाव जोपासणे ही सुद्धा सहिष्णुतेची भावना आहे.जगात भारत देश त्याचे उत्तम उदाहरण आहे. प्रास्ताविक डॉ. निशा गोसावी यांनी केले. आभार डॉ. एस. बी. जगताप यांनी मानले. या समारंभाला सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, कार्यालयीन सेवक उपस्थित होते.
संवैधानिक अधिकारांसोबत कर्तव्यांचेही पालन करा; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे आवाहन
संविधान दिनी उद्देशिका पालनाची घेतली शपथ
पिंपरी, दि.२७ (लोकमराठी) – सामा…
बलशाली भारत घडवण्याच्या राष्ट्रकार्यात योगदान द्या; भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे आवाहन
नवनिर्वाचित कार्यकारिणीचा पदवाटप समारंभ
पिंपरी, दि.२३ (लोकमराठी) – संघटनेत काम करतान…
चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टचा व्यावसायासाठी युवकांना ‘आधार’
व्यवसायात सचोटी अन् प्रामाणिकपणा जपा
ट्रस्टचे सचिव विजय जगताप यांचे मार्गदर्शन
पिंपरी,…
पिंपरी चिंचवड शहर होणार राममय; २२ जानेवारी २०२४ रोजी श्रीराममंदिर अयोध्या लोकार्पण सोहळा
नागरिकांत प्रचंड उत्साह
विविध कार्यक्रमाचे भव्य आयोजन
नागरिकांसह विविध संस्था संघटना सहभ…