
हडपसर (प्रतिनिधी) : प्रत्येकाला जीवनात संघर्ष करावा लागतो. प्रामाणिकपणे कष्ट केल्यावर सन्मान प्राप्त होतो.कितीही अडचणी आल्या तरी यशाचा मार्ग सोडू नका.रागात कोणताही निर्णय घेऊ नका. स्वतःवर प्रेम करा. तरच इतरांबद्दल आपण सहिष्णुता ठेवू शकतो, असे विचार मुनेश मोहन कालिया यांनी मांडले. ते एस.एम. जोशी कॉलेजमध्ये सामाजिक सहिष्णुता दिन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन .एस. गायकवाड होते. ते म्हणाले की, सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी सहिष्णुतेची भावना फार महत्त्वाची आहे.सर्वधर्मसमभाव जोपासणे ही सुद्धा सहिष्णुतेची भावना आहे.जगात भारत देश त्याचे उत्तम उदाहरण आहे. प्रास्ताविक डॉ. निशा गोसावी यांनी केले. आभार डॉ. एस. बी. जगताप यांनी मानले. या समारंभाला सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, कार्यालयीन सेवक उपस्थित होते.
PUNE : लॉजमध्ये वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं, पत्रात लिहिलं कारण; पोलिस दलात खळबळ
पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : पुण्यातून एक खळबळजनक महिती समोर आली आहे. पुण्यातील एका पोलीस अधिकाऱ्…
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ उमेदवारांची यादी
प्रभाग क्रमांक १अ जागाविजय गोविंद झरे – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)म्हेत्रे सुरेश रंगनाथ – भारती…
Mamurdi : मामुर्डीत सोसायटी पार्किंगमध्ये गांजा जप्त
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (PCPC) खंडणी विरोधी पथकाने मामुर्डी येथील कुणाल आयकॉनिया सोसायटीच…
अहिल्यानगर जिल्ह्यातील गुन्हेगारीचा पूर्णपणे बीमोड करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात २८ नवीन वाहने दाखल
शिर्डी : “जिल्ह्याची प्रतिमा मलिन करणाऱ्या आर्थि…




